शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

प्लीज.. डोण्ट ’Kill' युवरसेल्फ

By admin | Updated: October 9, 2014 18:36 IST

तारुण्य हे जगण्याच्या लढाया लढण्यासाठी असतं, अशी शस्त्रं टाकून हार मानली तर कसं चालेल?

- ऑक्सिजन टीम
 
स्ट्रेस आणि सायबर बुलिंग
 
आत्महत्त्येच्या टोकावर पोहोचवणारे दोन नवे शत्रू.?
 
भारत ‘तरुणांचा’ देश. जगातला सर्वात तरुण देश. असं आपण नेहमी ऐकतो आणि जगातल्या सर्वाधिक ‘तरुण’ आत्महत्त्याही याच देशात व्हाव्यात? १५ ते २९ वर्षे या वयोगटात सर्वाधिक आत्महत्त्या भारतात होतात असा जागतिक आरोग्य संघटनेचा नुकताच आलेला रिपोर्ट सांगतो.
दर दोन मिन्टाला भारतात एक व्यक्ती आत्महत्त्या करते, असं हा रिपोर्ट म्हणतो ते वाचून धक्का बसतोच.
प्रेमभंग, शिक्षणातलं अपयश, नोकरीच न मिळणं, नोकरीच्या ठिकाणी वाढता स्ट्रेस, कौटुंबिक कारणं, प्रेमभंग, मानसिक आजार, डिप्रेशन ही अशी नेहमीची कारणं आहेतच,
मात्र सध्या दोन नवीच कारणं तरुण मुलांच्या जिवावर उठली आहेत. 
त्यातलं एक कारण आहे, स्ट्रेस.
भयंकर प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन.
आणि त्यापायी रोज होणारी तरुण मुलांची कुतरओढ. घरच्यांच्या अपेक्षा, बदललेली लाईफस्टाईल, नोकरीच्या ठिकाणचे मोठमोठे टार्गेट्स, घरांसाठी घेतलेली कर्ज, त्याचे इएमआय, घरातली आपली दुरावलेली माणसं, कुणीच जिवाभावाचं नसणं, कुणावरही विश्‍वासच न ठेवता येणं, मित्रही नसणं किंवा दुरावणं यासार्‍या कारणांमुळे तरुण मुलांचा स्ट्रेस प्रचंड वाढतो आहेत.
आणि या स्ट्रेसशी अजिबातच कोप-अप करता न आल्यानं म्हणजे त्यावर तोडगेच न शोधता आल्यानं, अनेक तरुण मुलं या स्ट्रेसच्या भोवर्‍यात अडकतात. आणि मग त्यातून बाहेरच पडता न आल्यानं, स्वत:ला संपवायचं ठरवतात.
हे सारं एकीकडे वाढत असतानाच बंगरुळूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेसमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असा अभ्यास करताय की, ‘सायबर बुलिंग’ हे तरुण मुलांच्या संदर्भात आत्महत्त्येचं नवं कारणं ठरतंय का.?
म्हणजे काय तर बहुतांश तरुण मुलं हल्ली चोवीस तास ‘कनेक्टेड’ असतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअँप सुरूच असतं. इथे चेष्टा मस्ती चालते, वाद प्रतिवाद होतात. मग त्या अड्यांवरचे युक्तिवाद झेपत नाहीत, मनस्ताप होतो, तिथं कुणी जाणीवपूर्वक नालस्ती करतं, ईल एसएमएस किंवा मेसेजेस येतात, या सगळ्याला सायबर बुलिंग म्हणतात. त्यासार्‍या त्रास असह्य झाला की अनेकांना डिप्रेशन येतं. त्यातूनही सुटका झाली नाही तर अनेकजण आत्महत्त्येचा प्रयत्न करतात.
असे सुसाईड अटेम्प्ट केलेल्या अनेकजणांशी बोलून या सायबर आणि टेक्नॉलॉजिकल बिहेव्हिअरचा काय परिणाम होतो आहे, त्यातून आत्महत्त्येच्या टोकावर कसं जातात तरुण याचा अभ्यास मानसोपचार तज्ज्ञ करत आहेत.
अजून शंभर टक्के माहिती यासंदर्भात उपलब्ध नसली तरी दुर्दैवानं हे कारण आत्महत्त्येच्या दिशेनं घेऊन जातं, असा मानसोपचार तज्ज्ञांचा अभ्यास म्हणतो आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेसच्या मेण्टल हेल्थ एज्युकेशन विभागात काम करणार्‍या असिस्टण्ट प्रोफेसर डॉ. के. एस. मीना यांच्याशी ‘ऑक्सिजन’ने याविषयी तपशीलवार चर्चा करत हा विषय समजून घेतला. डॉ. मीना आत्महत्त्या प्रतिबंधात्मक उपचार याविषयातल्या तज्ज्ञही आहेत.
स्वत:ला संपवू पाहणार्‍या तरुण मुलांच्या मन:स्थितीची काही लक्षणं दिसतात का?
कारणं काय सापडतात?
आणि उपाय काय करता येतील?
 
 
 
जीव नको केव्हा होतो.
आत्महत्त्येची कुठली लक्षणं तरुण मुलांमध्ये दिसतात?
आत्महत्त्या करणार्‍या, अस्वस्थ मुलांमध्ये कुठली लक्षणं दिसतात. याची ही यादी. अर्थात ही लक्षणं अनेकजणांमध्ये दिसतात. मानसिक आजारातही दिसतात. ही लक्षणं आहेत म्हणजे तो माणूस आत्महत्त्याच करील असं कुणी घरच्याघरी ठरवू नये. पण लक्ष ठेवावं. वर्तनबदल टिपत राहून, योग्य औषधोपचारांची मदत घ्यावी. मुख्य म्हणजे उत्तम डॉक्टरला भेटावं. घरगुती उपाय करत बसू नये.
अनेक तरुण मुलं मित्रांनाही भेटणं टाळतात. एकदम गप्प गप्प होतात. फोनसुद्धा उचलत नाहीत. कुणाशी बोलत नाहीत. घरच्यांशीही बोलत नाहीत.
त्यांना कशातच रस वाटत नाहीत. काहीच करावंसं वाटत नाहीत.
अभ्यासात, खाण्यापिण्यात, कशातच इंटरेस्ट वाटत नाही. त्यांचं वर्तन बदलतं. नजर बदलते. झोपेचे पॅटर्न बदलतात. कपडे मळकट कळकट घालणं, आंघोळ करणं, यातसुद्धा नियमित बदल दिसतात.
ते स्वत:च्याच तंद्रीत असतात. स्वत:च्याच विचारात हरवल्यासारखे दिसतात.
या मुलांचा कॉन्फिडन्स एकदम कमी झालेला असतो. भकास दिसतात. 
अनेकजण नेहमी बोलता बोलता म्हणतातही, आयुष्यात काहीच राम उरलेला नाही. माझं काही खरं नाही, मला मरून जावंसं वाटतं. नको हे आयुष्य.
काहीजण एकदम चिडतात. खूप रडतात. अनेक जण प्रचंड रागवतातही.
नॉर्मल माणसांसारखं आयुष्य जगणंच त्यांना अवघड होतं.
काहीजण आजारपणाला कंटाळलेले असतात. तेव्हाही असेच हताश होतात.
काहीकाही जण तर इतके विचित्र वागतात, घरच्यांना त्रास देतात. त्यांचं वागणंच कळत नाही.
 
 
 
का नको होतो जीव? कुठल्या कारणांमुळे मुलं आत्महत्त्येच्या टोकावर पोहोचतात?
 
 
आपल्या मनातलं बोलायलाच कुणी नाही, विश्‍वासाचं कुणी नाही. मनावरचा ताण हलकाच होत नाही. कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येत नाही आणि मग हे सारं काचायला लागलं की त्यापेक्षा गळफास बरा असं अनेक तरुण मुलांना वाटू लागतं.
त्यापैकी ही काही प्रमुख कारणं.
घरात सतत भांडणं. आईवडिलांचं न पटणं किंवा पालकांनी सतत रागवणं, धारेवर धरणं. अभ्यासासह अनेक गोष्टींचं प्रेशर देणं मुलांच्या अस्वस्थतेला कारण ठरतं.
अभ्यासातलं अपयश. जी शाखा निवडली, तो अभ्यासच न जमणं, सतत नापास होणं.
इंटरनेट/मोबाइल अँडिक्शन. पालकांनी ते काढून घेतलं किंवा ते मिळालंच नाही तरी पिसाटून आत्महत्त्या केल्याच्या काही घटना अलीकडे घडल्या. किंवा आत्महत्येचा प्रयत्न काहीजणांनी केला.
एकेकटं कुटुंब. घरात माणसंच नसणं. एकटेपणा. त्यातून आलेला मानसिक विकार. तसंच डिप्रेशन, स्क्रिझोफेनियासारखे आजार. काही गंभीर आजारपणं, अपघात, जवळच्या माणसाचा मृत्यू यातूनही आत्महत्त्या घडतात.
अनेक मुलांना ड्रग्ज किंवा दारूचं व्यसन असतं. त्यासाठी पैसा लागतो. तो पैसा मिळेनासा झाला, त्यासाठी वाईट संगतीतून काही गुन्हे घडले तर त्या अपराधभावनेपोटी तरुण मुलं आत्महत्त्या करतात.
नोकरीच्या जागी कामाचं टेन्शन असणं, कामच न जमणं, व्यावसायिक अपयश हे आत्महत्त्येचं आणखी एक कारण.
ब्रेकप, मित्रानं किंवा मैत्रिणीनं फसवणं, रॅगिंग, मित्रांनी छळणं, यातूनही काहीजण जगणं नाकारतात.
काहीजणांचा कम्युनिकेशनचा प्रश्न असतो. कुणाला मनातलं काही सांगता येत नाही, लोकांना विश्‍वासातच घेता येत नाही म्हणूनही मनावरचा ताण वाढून जीव नको होतो.
अपयश हाताळताच न येणं हा एक तरुण पिढीचा नवा प्रश्न आहे, त्यातून अनेकजण जगणं नाकारतात. अपयशात हरवून जातात.
जिवाभावाचे दोस्तच अनेकजणांना नसतात, म्हणून एकटेपणा आयुष्य पोखरताना दिसतो.
 
 
 
.डरपोक कुठचा? घरच्या घरी काय करू नये? 
 
हे सारं वाचून अनेकजणांना वाटेल की आपण घरच्या घरी जर आपल्या अशा ‘अस्वस्थ’ मित्रांशी बोललो तर प्रश्न सुटेल.
तो सुटत नाही वाढतो. आत्महत्त्या करू पाहणार्‍यांची मानसिकता ही सोपी गोष्ट नाही, फार जटिल विषय आहे.
त्यामुळे उपदेश करू नका. 
काय मरायच्या बाता मारतोस, तू डरपोक आहेस असं तर अजिबात म्हणू नका. आपल्याला बाकीचे डरपोक म्हणतात या भावनेनंही अनेकांचा जीव घेतलाय. त्यामुळे फुकट सल्ले देऊ नका. तुम्ही कौन्सिलिंग करू नका. कारण माणसं आपल्याला सांगतात तरी आपण ऐकत नाही, जगावंसं वाटत नाही याचा त्या माणसाला जास्त त्रास होतो. त्यामुळे असं कुणी जवळचं वागत असेल तर तुम्ही काहीबाही सांगण्यापेक्षा त्यांना उत्तम डॉक्टरकडे न्या. औषधोपचार करून घ्या. गप्पा मारा, नॉर्मल बोला. त्यांना धीर द्या. आधार बना. एकटं, एकाकी सोडू नका.
तुमचा मित्र एका अवघड काळातून जातोय एवढं लक्षात ठेवून त्याला सोबत करा.
आणि मुख्य म्हणजे त्याच्या वागण्याचा दोष देऊ नका, गिल्ट देऊ नका. आणि अति सहानुभूतीही दाखवू नका.
 
विशेष मुलाखत
डॉ. के.एस. मीना
असिस्टण्ट प्रोफेसर, मेण्टल हेल्थ एज्युकेशन विभाग 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेस, बंगलूरु 
......................
जॉन्सन थॉमस
संचालक, आसरा हेल्पलाईन