शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रडे पाकिस्तानी खेळाडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:09 IST

पाकिस्तान आपला रडीचा डाव कधी सोडणार आहे? मैदानात आणि मैदानाबाहेरही रडारड करणं त्यांनी कधीच थांबवलेलं नाही. आताही आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घातल्यामुळे त्यांचा तीळपापड झाला. भारतीय संघावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी आयसीसीकडे केली, पण आयसीसीनं त्यांचेच दात त्यांच्या घशात घातले!..

ठळक मुद्देपाकिस्तानचे दात आता आयसीसीनंच घशात घातले असले, त्यांचं हसं झालं असलं तरी त्यातून ते काही शिकतील, सुधारतील याची सुतराम शक्यता नाही.

- सोहम गायकवाडमैदानावर असो, की मैदानाबाहेर, रडीचा डाव खेळणं पाकिस्ताननं कधीच सोडलं नाही.कुठेही काहीही खुट्ट झालं की लगेच भारतावर आरोप करायचे आणि रडारड करायचं हे त्यांनी कधीच सोडलं नाही.हा रडीचा डाव त्यांनी परत एकदा खेळला, तो क्रिकेटच्या मैदानावर.काश्मीरात, भारतात दहशतवादी घुसवून, कारगीलसारख्या छुप्या कारवाया करून हा देश अशांत कसा राहील याचाच प्रयत्न पाकिस्ताननं कायम केला.आता भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेट सिरीज सुरू आहे. खरं तर यात नाक खुपसायची त्यांची काहीच गरज नव्हती. तरीही त्यांनी नाक खुपसलंच. आणि कारण काय शोधून काढलं तर भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डेमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी आर्मीच्या कॅप घातल्या, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा!पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान ठार झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्याप्रति आदर दाखवण्यासाठी आणि सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी भारतीय संघानं आॅस्ट्रेलियासोबतच्या तिसºया वन डे सामन्यात आर्मीच्या कॅप घातल्या होत्या.भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घातल्याच कशाला, हा त्यांचा प्रमुख आक्षेप!भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घालून खेळात ‘राजकारण’ आणलं, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे, विराट कोहली आणि टीमवर बंदी घातलीच पाहिजे, नाहीतर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा डरकाळ्याही त्यांनी फोडल्या. भारतीय खेळाडूंवर बंदी आणावी या मागणीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं थेट आयसीसीकडे अधिकृत तक्रारही केली. खुद्द पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही आयसीसीकडे त्यासाठी गाºहाणं मांडलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन अहसान मनीही त्यासाठी हटून बसले.अशा मागणीसाठी त्यांच्याकडे दोन प्रमुख कारणं, खरं तर ‘आधार’ होते, तेही पाकिस्तानचेच.पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर मोईन अलीनं ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेले रिस्ट बॅण्ड घालून सामना खेळला होता, तर पाकिस्तानी पॉप सिंगर जुनेद जमशेदचे छायाचित्र असलेला टी शर्ट घालून इमरान ताहीर मैदानात आला होता. त्यांचे हे कृत्य अवैध ठरवून आयसीसीनं त्यांच्यावर कारवाई केली होती.आमच्यावर कारवाई केली, मग भारतीय खेळाडूंवर का नको, यामुळे चिडलेल्या पाकिस्ताननं भारतीय खेळाडूंवर बंदीची मागणी केली. पण त्याआधी भारतीय खेळाडूंनी असं का केलं, त्यासंदर्भाची परवानगी त्यांनी आयसीसीकडून घेतली होती की नाही, याची चौकशी, माहिती घेण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही आणि परत एकदा पाकिस्तान तोंडावर आपटलं.यासंदर्भात आता खुद्द आयसीसीनंच खुलासा केला आहे, की आर्मीच्या टोप्या घालून सामना खेळण्याआधी बीसीसीआयनं आमच्याकडून तशी अधिकृत परवानगी मागितली होती आणि आम्ही ती त्यांना दिली होती, त्यामुळे भारतीय खेळाडूंवर बंदी घालण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी काही चुकीचं केलेलंही नाही!पाकिस्तानचे दात आता आयसीसीनंच घशात घातले असले, त्यांचं हसं झालं असलं तरी त्यातून ते काही शिकतील, सुधारतील याची सुतराम शक्यता नाही.मुळात पाकिस्ताननं जे काही केलं, तेच ‘खेळातलं राजकारण’ होतं. असं राजकारण करण्यापेक्षा पाकिस्ताननं खेळावरच लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच बरं..(छायाचित्र आंतरजालावरुन साभार.)