शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मोजकेच फ्रेंड्स असावेत, म्हणजे ‘फोमो’ येत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 06:15 IST

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

प्रतीक्षा माशाल  

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?

सर्वात भारी गोष्ट म्हणजे मी शिक्षण घेत आहे. सर्वात चांगला विषय म्हणजे पुस्तके. शिक्षण आणि वाचन यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्याने मी काय स्वीकारावं आणि काय नाकारावं हे ठरवू शकते. ही लवचीकता नसेल, तर माणूस त्या भिंतीपलीकडे वाकून बघूच शकत नाही किंवा मनाविरुद्धची गोष्ट लवकर स्वीकारू शकत नाही, कदाचित यामुळे विचारांमध्ये प्रगल्भता येत नाही.

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

करिअर, लग्न, समाजाची मागासलेली मानसिकता या तीन गोष्टींचा!कारण, आधुनिक शिक्षणाचा अभाव यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये वाढ होते आहे. लग्नाचे निर्णय आजही तरुणांना स्वतंत्र घेता येत नाहीत. फक्त मुलगी आहे म्हणून रात्री घराबाहेर फिरता येत नाही. मित्र-मैत्रिणी फक्त चर्चा करत थांबले तरी सगळ्यांच्या नजरा वळतात. काही मुलांचा मुलींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, सर्व घरची कामे मुलींनी केली पाहिजेत. या सर्वांची चीड येते आणि स्ट्रेस येतो. कधी आणि कसा सुधारणार समाज, असा विचारही येतो.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?खूप जण ओळखीचे आहेत; परंतु जवळचे मोजकेच मित्र-मैत्रिणी असल्यामुळे ‘फोमो’ येत नाही. एकटं वाटलंच तर शेअर करता येतं लगेच. व्यक्त व्हायला, विचार मांडायला ऑक्सिजननेच शिकवलं, यामुळे आनंदी कसं राहायचं हे शिकता आलं.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?  माफ करा, पण हे दोन्ही पर्याय टोकाचे वाटतात. कारण कोणाएका पिढीला गंडलेली आहे असं नाही म्हणता येणार. आजची जनरेशन अजूनही कनेक्ट करायचा प्रयत्न करते. काहींना जमतं, काहींना नाही आणि काही असेही आहेत की कौटुंबिक विश्व आणि बाहेरचं विश्व (मित्र मंडळी) हे मिक्स नाही करत. कारण एकच, घरात वाद नको. जो-तो आपापला मार्ग शोधतो. 

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

तरुण प्रेमात पडताना नोकरी, घर, आई-वडील, जात पाहत नाहीत वा विचार करत नाहीत नंतर भानावर आल्यावर या सगळ्यांचा परिणाम लव्ह-लाइफवर होतो. मग सगळच कॉम्प्लिकेटेडहोऊन बसतं.

6. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?अभिमान वाटावा अशा खूप गोष्टी; पण शिथिल कायदे, ऊठसूट कोणत्याही कारणावरून हमरीतुमरीवर येणे, ध्वनिप्रदूषण, स्रियांवरील अत्याचार, अस्वच्छता, पर्यावरण जागृतीचा अभाव, कुठेही पचापच थुंकणे, या संतापजनक व लाज वाटणार्‍या गोष्टी भारतात आहेत.