शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

ऑनलाइन सोशल

By admin | Updated: December 11, 2015 14:04 IST

कुणी आज काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसाला केलेल्या खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून वेगळा काय संपर्क ठेवायचा, असं तरुण मुलं का म्हणतात?

- घराबाहेर न पडताही ‘संपर्कात’ राहणारी एक नवीन जीवनशैली!
‘काय सारखं फोनवर टुकटुक,
शेजारी बसलेला माणूस जिवंतय की मेलाय, हे तरी बघा जरा!’
‘सगळं ऑनलाइन करा, ऑनलाइन जेवायला मिळतंय का फुकटात बघा जरा.’ 
- असं उपरोधानं तरुण मुलांना येताजाता ऐकावं लागतं. पण तरुण मुलं काही हे सहजी मान्य करत नाहीत. 
उलट त्यांना असं वाटतं की, प्रत्यक्षात थेट संवाद नसला तरी काय झालं, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं काय चाललंय हे तर आपल्याला ऑनलाइनही कळतं. कुणी काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा पाळीव कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लगAाच्या वाढदिवसाला केलेल्या  खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून संपर्क असा वेगळा काय वाटतो?
तिथल्या तिथे ऑनलाइनच कुणाला वाढदिवसाला विश केलं काय नी कुणाला श्रद्धांजली वाहिली काय, आपला ना वेळ खर्च होतो, ना फार इमोशनल गुंता होतो, असं अनेकांचं मत आहे.
आता एका सव्रेक्षणानं त्यांच्या या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे.  
या सव्रेक्षणाचं म्हणणं आहे की, वयाच्या पस्तिशीच्या आत असलेल्या अनेक तरुण मुलामुलींना आता प्रत्यक्ष सोशलायङिांगपेक्षा ‘ऑनलाइन सोशलायङिांगच’ जास्त कम्फर्टेबल अर्थात सोयीचं वाटतं.
म्हणजे काय तर मित्रमैत्रिणींनाही अनेकदा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आणि कुठल्यातरी कट्टय़ावर पडीक राहण्यापेक्षा अनेकांना आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच भेटणं आणि तिथंच सामूहिक कल्ला करणं हे जास्त आनंददायी वाटतं!
अनेकजण तर असंही मत नोंदवतात की, आपण मित्रला प्रत्यक्ष भेटल्यावर फार कमी बोलणं होतं आता, ब:याच दिवसांनी भेटल्यावर तर काय बोलायचं हेच सुचत नाही इतकं आम्ही रोज आणि सतत बोलतच असतो.
आणि तेही आता शब्दानं, प्रत्यक्षात बोलावं लागत नाही. अनेक मुलामुलींचं तर प्रत्यक्ष फोनवर बोलण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याऐवजी ते सतत लिहून बोलतात. सतत कीपॅडवर टुकटुक.
मात्र त्यातून एक गोष्ट घडली आहेच.
जी माणसं ऑनलाइन भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलणंच बंद होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे काय तर मुंबई, बंगळुरू, दिल्ली, लखनौ या शहरांतल्या सव्र्हेत सहभागी झालेल्या बहुतांश तरुण मुलांनी मान्य केलंय की, आपल्या शेजारी कोण राहतं, त्यांचं नाव, त्यांच्या घरातली सुखदु:ख हे आपल्याला काहीही माहिती नसतं. येताजाता चेहरे ओळखीचे झाले तर हसतोबिसतो त्यांच्याकडे पाहून. पण तेवढंच. त्यापेक्षा जास्त ओळख आसपास नाही.
या सा:यामुळे आपणच आपल्या समाजापासून, प्रत्यक्ष संवादापासून तुटतोय का? असं विचारल्यावर मात्र संमिश्र मतं येतात. काहींना वाटतं असं काही नाही. ज्यांच्याशी संपर्कात राहायचं त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. तो वाढवतोही. मग बाकीचं सारंच माहिती पाहिजे असा आग्रह कशाला?
काहींना मात्र वाटतं की, वरवरच्या या टेक्निकल संवादामुळे अनेकदा नातं कोरडं होत जातं. पण तो आता या नव्या काळाचा भाग आहे.
अशी मतमतांतरे असताना एक गोष्ट या सव्रेक्षणात जाणवली की, ऑनलाइन सोशलाइज झाल्यानं कुणी आपल्या रंगावर, व्यंगावर, बोलण्यावर, भाषेवर टिप्पणी करत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे ते त्यांना सुखावतं!
एक नक्की, ‘सोशल’ असण्याच्या या काळात ‘ऑनलाइन सोशल’ ही एक नवीनच जमात तयार होत आहे.
ज्यांचे नियम प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळे आहेत आणि जगण्याच्या अपेक्षाही ते बदलून घेत आहेत.
 
 
65}
तरुण-तरुणी म्हणतात,
ऑनलाइन सोशल
असणंच जास्त
सोयीचं.
 
7क्}
तरुण-तरुणींना वाटतं की, 
मित्रमैत्रिणी, नातेवाईक 
यांच्याबद्दल सगळंच 
त्यांना ऑनलाइन कळतं!
- निशांत महाजन