शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

ऑनलाइन सोशल

By admin | Updated: December 11, 2015 14:04 IST

कुणी आज काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसाला केलेल्या खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून वेगळा काय संपर्क ठेवायचा, असं तरुण मुलं का म्हणतात?

- घराबाहेर न पडताही ‘संपर्कात’ राहणारी एक नवीन जीवनशैली!
‘काय सारखं फोनवर टुकटुक,
शेजारी बसलेला माणूस जिवंतय की मेलाय, हे तरी बघा जरा!’
‘सगळं ऑनलाइन करा, ऑनलाइन जेवायला मिळतंय का फुकटात बघा जरा.’ 
- असं उपरोधानं तरुण मुलांना येताजाता ऐकावं लागतं. पण तरुण मुलं काही हे सहजी मान्य करत नाहीत. 
उलट त्यांना असं वाटतं की, प्रत्यक्षात थेट संवाद नसला तरी काय झालं, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं काय चाललंय हे तर आपल्याला ऑनलाइनही कळतं. कुणी काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा पाळीव कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लगAाच्या वाढदिवसाला केलेल्या  खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून संपर्क असा वेगळा काय वाटतो?
तिथल्या तिथे ऑनलाइनच कुणाला वाढदिवसाला विश केलं काय नी कुणाला श्रद्धांजली वाहिली काय, आपला ना वेळ खर्च होतो, ना फार इमोशनल गुंता होतो, असं अनेकांचं मत आहे.
आता एका सव्रेक्षणानं त्यांच्या या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे.  
या सव्रेक्षणाचं म्हणणं आहे की, वयाच्या पस्तिशीच्या आत असलेल्या अनेक तरुण मुलामुलींना आता प्रत्यक्ष सोशलायङिांगपेक्षा ‘ऑनलाइन सोशलायङिांगच’ जास्त कम्फर्टेबल अर्थात सोयीचं वाटतं.
म्हणजे काय तर मित्रमैत्रिणींनाही अनेकदा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आणि कुठल्यातरी कट्टय़ावर पडीक राहण्यापेक्षा अनेकांना आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच भेटणं आणि तिथंच सामूहिक कल्ला करणं हे जास्त आनंददायी वाटतं!
अनेकजण तर असंही मत नोंदवतात की, आपण मित्रला प्रत्यक्ष भेटल्यावर फार कमी बोलणं होतं आता, ब:याच दिवसांनी भेटल्यावर तर काय बोलायचं हेच सुचत नाही इतकं आम्ही रोज आणि सतत बोलतच असतो.
आणि तेही आता शब्दानं, प्रत्यक्षात बोलावं लागत नाही. अनेक मुलामुलींचं तर प्रत्यक्ष फोनवर बोलण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याऐवजी ते सतत लिहून बोलतात. सतत कीपॅडवर टुकटुक.
मात्र त्यातून एक गोष्ट घडली आहेच.
जी माणसं ऑनलाइन भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलणंच बंद होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे काय तर मुंबई, बंगळुरू, दिल्ली, लखनौ या शहरांतल्या सव्र्हेत सहभागी झालेल्या बहुतांश तरुण मुलांनी मान्य केलंय की, आपल्या शेजारी कोण राहतं, त्यांचं नाव, त्यांच्या घरातली सुखदु:ख हे आपल्याला काहीही माहिती नसतं. येताजाता चेहरे ओळखीचे झाले तर हसतोबिसतो त्यांच्याकडे पाहून. पण तेवढंच. त्यापेक्षा जास्त ओळख आसपास नाही.
या सा:यामुळे आपणच आपल्या समाजापासून, प्रत्यक्ष संवादापासून तुटतोय का? असं विचारल्यावर मात्र संमिश्र मतं येतात. काहींना वाटतं असं काही नाही. ज्यांच्याशी संपर्कात राहायचं त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. तो वाढवतोही. मग बाकीचं सारंच माहिती पाहिजे असा आग्रह कशाला?
काहींना मात्र वाटतं की, वरवरच्या या टेक्निकल संवादामुळे अनेकदा नातं कोरडं होत जातं. पण तो आता या नव्या काळाचा भाग आहे.
अशी मतमतांतरे असताना एक गोष्ट या सव्रेक्षणात जाणवली की, ऑनलाइन सोशलाइज झाल्यानं कुणी आपल्या रंगावर, व्यंगावर, बोलण्यावर, भाषेवर टिप्पणी करत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे ते त्यांना सुखावतं!
एक नक्की, ‘सोशल’ असण्याच्या या काळात ‘ऑनलाइन सोशल’ ही एक नवीनच जमात तयार होत आहे.
ज्यांचे नियम प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळे आहेत आणि जगण्याच्या अपेक्षाही ते बदलून घेत आहेत.
 
 
65}
तरुण-तरुणी म्हणतात,
ऑनलाइन सोशल
असणंच जास्त
सोयीचं.
 
7क्}
तरुण-तरुणींना वाटतं की, 
मित्रमैत्रिणी, नातेवाईक 
यांच्याबद्दल सगळंच 
त्यांना ऑनलाइन कळतं!
- निशांत महाजन