शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सोशल

By admin | Updated: December 11, 2015 14:04 IST

कुणी आज काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसाला केलेल्या खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून वेगळा काय संपर्क ठेवायचा, असं तरुण मुलं का म्हणतात?

- घराबाहेर न पडताही ‘संपर्कात’ राहणारी एक नवीन जीवनशैली!
‘काय सारखं फोनवर टुकटुक,
शेजारी बसलेला माणूस जिवंतय की मेलाय, हे तरी बघा जरा!’
‘सगळं ऑनलाइन करा, ऑनलाइन जेवायला मिळतंय का फुकटात बघा जरा.’ 
- असं उपरोधानं तरुण मुलांना येताजाता ऐकावं लागतं. पण तरुण मुलं काही हे सहजी मान्य करत नाहीत. 
उलट त्यांना असं वाटतं की, प्रत्यक्षात थेट संवाद नसला तरी काय झालं, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं काय चाललंय हे तर आपल्याला ऑनलाइनही कळतं. कुणी काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा पाळीव कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लगAाच्या वाढदिवसाला केलेल्या  खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून संपर्क असा वेगळा काय वाटतो?
तिथल्या तिथे ऑनलाइनच कुणाला वाढदिवसाला विश केलं काय नी कुणाला श्रद्धांजली वाहिली काय, आपला ना वेळ खर्च होतो, ना फार इमोशनल गुंता होतो, असं अनेकांचं मत आहे.
आता एका सव्रेक्षणानं त्यांच्या या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे.  
या सव्रेक्षणाचं म्हणणं आहे की, वयाच्या पस्तिशीच्या आत असलेल्या अनेक तरुण मुलामुलींना आता प्रत्यक्ष सोशलायङिांगपेक्षा ‘ऑनलाइन सोशलायङिांगच’ जास्त कम्फर्टेबल अर्थात सोयीचं वाटतं.
म्हणजे काय तर मित्रमैत्रिणींनाही अनेकदा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आणि कुठल्यातरी कट्टय़ावर पडीक राहण्यापेक्षा अनेकांना आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच भेटणं आणि तिथंच सामूहिक कल्ला करणं हे जास्त आनंददायी वाटतं!
अनेकजण तर असंही मत नोंदवतात की, आपण मित्रला प्रत्यक्ष भेटल्यावर फार कमी बोलणं होतं आता, ब:याच दिवसांनी भेटल्यावर तर काय बोलायचं हेच सुचत नाही इतकं आम्ही रोज आणि सतत बोलतच असतो.
आणि तेही आता शब्दानं, प्रत्यक्षात बोलावं लागत नाही. अनेक मुलामुलींचं तर प्रत्यक्ष फोनवर बोलण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याऐवजी ते सतत लिहून बोलतात. सतत कीपॅडवर टुकटुक.
मात्र त्यातून एक गोष्ट घडली आहेच.
जी माणसं ऑनलाइन भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलणंच बंद होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे काय तर मुंबई, बंगळुरू, दिल्ली, लखनौ या शहरांतल्या सव्र्हेत सहभागी झालेल्या बहुतांश तरुण मुलांनी मान्य केलंय की, आपल्या शेजारी कोण राहतं, त्यांचं नाव, त्यांच्या घरातली सुखदु:ख हे आपल्याला काहीही माहिती नसतं. येताजाता चेहरे ओळखीचे झाले तर हसतोबिसतो त्यांच्याकडे पाहून. पण तेवढंच. त्यापेक्षा जास्त ओळख आसपास नाही.
या सा:यामुळे आपणच आपल्या समाजापासून, प्रत्यक्ष संवादापासून तुटतोय का? असं विचारल्यावर मात्र संमिश्र मतं येतात. काहींना वाटतं असं काही नाही. ज्यांच्याशी संपर्कात राहायचं त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. तो वाढवतोही. मग बाकीचं सारंच माहिती पाहिजे असा आग्रह कशाला?
काहींना मात्र वाटतं की, वरवरच्या या टेक्निकल संवादामुळे अनेकदा नातं कोरडं होत जातं. पण तो आता या नव्या काळाचा भाग आहे.
अशी मतमतांतरे असताना एक गोष्ट या सव्रेक्षणात जाणवली की, ऑनलाइन सोशलाइज झाल्यानं कुणी आपल्या रंगावर, व्यंगावर, बोलण्यावर, भाषेवर टिप्पणी करत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे ते त्यांना सुखावतं!
एक नक्की, ‘सोशल’ असण्याच्या या काळात ‘ऑनलाइन सोशल’ ही एक नवीनच जमात तयार होत आहे.
ज्यांचे नियम प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळे आहेत आणि जगण्याच्या अपेक्षाही ते बदलून घेत आहेत.
 
 
65}
तरुण-तरुणी म्हणतात,
ऑनलाइन सोशल
असणंच जास्त
सोयीचं.
 
7क्}
तरुण-तरुणींना वाटतं की, 
मित्रमैत्रिणी, नातेवाईक 
यांच्याबद्दल सगळंच 
त्यांना ऑनलाइन कळतं!
- निशांत महाजन