शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

एक वारी पुणे ते सासवड

By admin | Updated: June 22, 2016 13:00 IST

एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.

 एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.जास्त कोणाला सांगितलं नाही पण एक-दोन जणांना व्हॉट्स अ‍ॅप केलं ‘येणार का?’ त्यातल्या रोहयाने रिप्लाय केला की आम्ही दरवळेसच जातो,तु येणार का? मग काय ठरलं तर निघायचं. सुदैवानं एका मित्रानं कॅमेऱ्याची सोय करून दिली. घरी सारं सोईस्कर पडलं आणि इतर कार्यकर्त्यांबरोबर जाता येईल म्हणून शनिवारीच सायंकाळी घरी गेलो. मग रात्री एक भावासारखा काय, भशू-मित्रालच व्हॉट्सअ‍ॅप केलं कारण मला कोणाची नाही पण त्याची गॅरण्टी होती. त्याचा लगेच रिप्लाय आला. आणि सकाळी ८ वाजेपर्यंत शिवाजीनगरला यायचं ठरलं. मग काय लवकर उठायचं होतं त्यामुळं लवकर झोपलो पण झोप लागत नव्हती कुतुहुल होतं. एक्साईटमेण्ट होती. सकाळ झाली खेडच्या स्टॅण्डवर वर १०-१५ जणांचा घोळका हातात भगवा घेऊन आपल्या पारंपरिक वेशात मला येऊन मिळाला आणि तासा-दिडतासात आम्ही शिवाजीनगर गाठलं. पुढे रोहया आणि अजुन एक-दोनजण आम्हाला जॉईन झाले आणि आमचा १५ जणांचा काफिला हडपसरकडं निघाला. आणि पुढे एका पालखीचे झालो. तो आपला अष्टगंध, बुक्का लावून, सेल्फी काढून झालं. आणि नंतर माऊली-माऊली गजरात हातातल्या कॅमेऱ्यानं हे सर्व टिपायला सुरु वात झाली.पहिल्या टप्प्यात पुण्यातल्या गर्दीमुळे मी आणि दिप्तेश कार्यकर्त्यांपासून मागे राहिलो मग खूप कष्टाने माऊलींच्या पादुकांचे दर्शन म्हणजे अगदी हात लावून बरं का ! त्यानंतर त्या काकांनीच माझ्याकडून कॅमेरा घेऊन माझा त्याक्षणाचा एक फोटो काढून दिला. अजुन काय पाहिजे होतं मला? मग पुढे सर्वजण परत एकत्र आलो. मग हळूहळू आम्हीही दिंडीतल्या लोकांबरोबर गवळण,अभंग (नसले येत तरी) म्हणत होता. कारण का कुणास ठाऊक तेच भारी वाटतं होतं. पुढं मग पाव आणि भज्यांचा भुगा खाऊन,थोडंसं थांबत पालखीचा विसावा म्हणजे दिवे घाटाच्या अलीकडे पोहोचलो.घाट चढायचा होता त्यामुळ थोड ंथांबून घेतलं. तिथ दोन मावशींनी आग्रहानं भाजी-भाकरी देऊ केली होती , ते अजून आठवतं. मग दिवे घाटात चढण सुरु झाली .पावसाची खुप आस धरून होते सगळेजण पण थोड्याशा थेबांपलिकडे अपेक्षांवर पाणीच पडलं.आतापर्यंत पेपरमधे,टिव्हीत याच दिवे घाटाचे फोटो आपण पहायचो याची आठवण मात्र झाली. घाटाच्या मध्यात आल्यावर पाय दुखायला लागले कारण जवळ-जवळ २०-२५ किलोमीटर चालणं झालं होतं. एका पुणेरी काकुंनी विचारलं,‘ का रे दमलास का?कुठून आलास?’ म्हटलं,‘राजगुरु नगर हुन,कसे चालतात ही लोकं एवढे वयस्कर, पण न दमता?’ तर त्या म्हणाल्या,‘हाच तर फरक आहे शहरी आणि ग्रामीण जीवनात!’ पुढे दिवे घाट संपून सासवडचा जरा मोठा हायवे लागला. त्यामुळे चालणं सोप्पं झालं होतं पण पाय खुप दुखत होते मग एका चहाने थोडी तरतरी आली आणि सासवड ची मंडळी दिंडी पाहायला यायला सुरु वात झाली. त्यात सूर्यास्ताची वेळ त्यामुळं फोटो काढायला मजा आली. सुर्यस्ताबरोबर माऊलींचा निरोप घेत आम्ही यात्रा स्पेशल गाडीनं पुन्हा पुण्याकडे यायला निघालो... आता दिंड्या निघाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, आणि मागच्या वर्षीचा हा प्रसंग आठवला.. केवळ अद्भूत आनंददायी! श्रेयस आहिरे