शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

एक वारी पुणे ते सासवड

By admin | Updated: June 22, 2016 13:00 IST

एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.

 एका मित्रानं सुचवलं होत,‘श्रेया,यंदा आषाढीला जायचं, सुट्टी पण आहे आणि वारी रविवारी पुण्यातच आहे, मी टाइमटेबल केलयं.’ मग काय त्या दिवसापासून वेध लागले दिंडीचे-माऊली भेटीचे.जास्त कोणाला सांगितलं नाही पण एक-दोन जणांना व्हॉट्स अ‍ॅप केलं ‘येणार का?’ त्यातल्या रोहयाने रिप्लाय केला की आम्ही दरवळेसच जातो,तु येणार का? मग काय ठरलं तर निघायचं. सुदैवानं एका मित्रानं कॅमेऱ्याची सोय करून दिली. घरी सारं सोईस्कर पडलं आणि इतर कार्यकर्त्यांबरोबर जाता येईल म्हणून शनिवारीच सायंकाळी घरी गेलो. मग रात्री एक भावासारखा काय, भशू-मित्रालच व्हॉट्सअ‍ॅप केलं कारण मला कोणाची नाही पण त्याची गॅरण्टी होती. त्याचा लगेच रिप्लाय आला. आणि सकाळी ८ वाजेपर्यंत शिवाजीनगरला यायचं ठरलं. मग काय लवकर उठायचं होतं त्यामुळं लवकर झोपलो पण झोप लागत नव्हती कुतुहुल होतं. एक्साईटमेण्ट होती. सकाळ झाली खेडच्या स्टॅण्डवर वर १०-१५ जणांचा घोळका हातात भगवा घेऊन आपल्या पारंपरिक वेशात मला येऊन मिळाला आणि तासा-दिडतासात आम्ही शिवाजीनगर गाठलं. पुढे रोहया आणि अजुन एक-दोनजण आम्हाला जॉईन झाले आणि आमचा १५ जणांचा काफिला हडपसरकडं निघाला. आणि पुढे एका पालखीचे झालो. तो आपला अष्टगंध, बुक्का लावून, सेल्फी काढून झालं. आणि नंतर माऊली-माऊली गजरात हातातल्या कॅमेऱ्यानं हे सर्व टिपायला सुरु वात झाली.पहिल्या टप्प्यात पुण्यातल्या गर्दीमुळे मी आणि दिप्तेश कार्यकर्त्यांपासून मागे राहिलो मग खूप कष्टाने माऊलींच्या पादुकांचे दर्शन म्हणजे अगदी हात लावून बरं का ! त्यानंतर त्या काकांनीच माझ्याकडून कॅमेरा घेऊन माझा त्याक्षणाचा एक फोटो काढून दिला. अजुन काय पाहिजे होतं मला? मग पुढे सर्वजण परत एकत्र आलो. मग हळूहळू आम्हीही दिंडीतल्या लोकांबरोबर गवळण,अभंग (नसले येत तरी) म्हणत होता. कारण का कुणास ठाऊक तेच भारी वाटतं होतं. पुढं मग पाव आणि भज्यांचा भुगा खाऊन,थोडंसं थांबत पालखीचा विसावा म्हणजे दिवे घाटाच्या अलीकडे पोहोचलो.घाट चढायचा होता त्यामुळ थोड ंथांबून घेतलं. तिथ दोन मावशींनी आग्रहानं भाजी-भाकरी देऊ केली होती , ते अजून आठवतं. मग दिवे घाटात चढण सुरु झाली .पावसाची खुप आस धरून होते सगळेजण पण थोड्याशा थेबांपलिकडे अपेक्षांवर पाणीच पडलं.आतापर्यंत पेपरमधे,टिव्हीत याच दिवे घाटाचे फोटो आपण पहायचो याची आठवण मात्र झाली. घाटाच्या मध्यात आल्यावर पाय दुखायला लागले कारण जवळ-जवळ २०-२५ किलोमीटर चालणं झालं होतं. एका पुणेरी काकुंनी विचारलं,‘ का रे दमलास का?कुठून आलास?’ म्हटलं,‘राजगुरु नगर हुन,कसे चालतात ही लोकं एवढे वयस्कर, पण न दमता?’ तर त्या म्हणाल्या,‘हाच तर फरक आहे शहरी आणि ग्रामीण जीवनात!’ पुढे दिवे घाट संपून सासवडचा जरा मोठा हायवे लागला. त्यामुळे चालणं सोप्पं झालं होतं पण पाय खुप दुखत होते मग एका चहाने थोडी तरतरी आली आणि सासवड ची मंडळी दिंडी पाहायला यायला सुरु वात झाली. त्यात सूर्यास्ताची वेळ त्यामुळं फोटो काढायला मजा आली. सुर्यस्ताबरोबर माऊलींचा निरोप घेत आम्ही यात्रा स्पेशल गाडीनं पुन्हा पुण्याकडे यायला निघालो... आता दिंड्या निघाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, आणि मागच्या वर्षीचा हा प्रसंग आठवला.. केवळ अद्भूत आनंददायी! श्रेयस आहिरे