शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एक गोळी रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 08:34 IST

थायरॉईड हा आजार नाही, कमतरता आहे. एक गोळी रोज घेतल्यानं ही उणीव भरून काढता येते, मग इतका संशय का घेता?

- डॉ. यशपाल गोगटे

एकदा हायपोथायरॉईडीझमचं निदान झालं की मनात अनेक शंका-कुशंका घर करतात. अनेकांकडून मिळणारे सल्ले या दुविधेत भर घालतात. काय करावं कळत नाही. त्यावर उपाय एकच, ऐकावे जनाचे; पण करावे मनाचे. आपल्या डॉक्टरांच्या मताशी ठाम राहून औषध योजना सुरू करावी. खरं तर हायपोथायरॉईडीझमचा आजार हा थायरॉईड हार्मोन्सच्या एका छोट्या गोळीनं नियंत्रणात ठेवता येतो. शरीरामध्ये थायरॉईड हार्मोन्स ज्या घटकांपासून बनतात तेच रासायनिक घटक वापरून हे औषध तयार केलं जातं. शरीरात नैसर्गिकरीत्या बनणाऱ्या हार्मोन्सप्रमाणेच ही फॅक्टरीत बनलेली गोळी काम करते. शरीरामध्ये योग्य प्रमाणात असलेले थायरॉईड हार्मोन्स कधीही नुकसान करत नसतात, तसेच योग्य प्रमाणात घेतलेली थायरॉईडची गोळी काहीही अपाय करत नाही, उलट फायदाच करते. थायरॉईडच्या या गोळीचा डोस त्या व्यक्तीच्या टीसीएचचं वाढलेलं प्रमाण, वजन, वय व आजाराचा काळ इ. यावरून ठरत असते.प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगळी असते आणि शरीर प्रकृतीही भिन्न असते. जसे प्रत्येकाच्या बूट-चपलांचे माप वेगवेगळे असते, त्यानुसार फक्त चपलेचा नंबर न पाहता आपल्या पायात योग्य प्रकारे फिट होणाºया चपला आपण घेतो. तसेच हायपोथायरॉईडीझमच्या आजारावर उपचार करताना लागणारा थायरॉईडच्या गोळीचा डोस वेगवेगळा असू शकतो. काहींचे एकदम कमी डोसवर निभावते तर काहींना अगदी अव्वाच्यासवा डोस लागतो. त्यामुळे इतरांशी तुलना न करता, थायरॉईडच्या गोळीचा डोस न पाहता आजार नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं.डोस घ्या रोजआपल्या शरीराला थायरॉईड हार्मोन्सशी आवश्यकता अत्यल्प प्रमाणात असते; परंतु सुदृढ शरीराचा पाया या हार्मोन्सवरच उभा असतो. त्यामुळे या गोळीचा डोस रोज घेणं गरजेचं असतं. आपल्या दैनिक चयापचय क्रिया या हार्मोन्सवरच अवलंबून असतात. पोटात असलेल्या अन्नामुळे या गोळीच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो म्हणून ही गोळी उपाशी पोटी घेणं गरजेचं आहे. गोळी घेतल्यानंतर कमीतकमी अर्धा ते एक तास काही खाणंपिणं टाळल्यास त्याचा फायदा होतो.हार्मोन्स जिथे संदेश पोहोचवतात त्या पेशीवरील भागाला रिसेप्टर असं म्हणतात. हार्मोन्सची तुलना पोस्टमनशी केल्यास, पिनकोडच्या मदतीने पत्र अचूक पत्त्यावर पोहोचतं तसंच रिसेप्टरही हार्मोन्ससाठी पिनकोडचे काम करतात. हार्मोन्सचं प्रमाण व रिसेप्टरची संख्या यांचं प्रमाण बºयाचवेळा व्यस्त असतं. सविस्तरपणे सांगायचं झाल्यास रक्तात हार्मोन्सचं प्रमाण वाढलं, तर रिसेप्टरची संख्या कमी होते व हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं, तर रिसेप्टरची संख्या वाढते.हायपोथायरॉईडीझमच्या आजारात सुरुवातीच्या काळात, वरील गणिताप्रमाणे हार्मोन्स नसल्यामुळे रिसेप्टरची संख्या वाढलेली असते. त्यामुळे थायरॉईडच्या गोळीचा डोस कमी प्रमाणात पुरेसा होतो. या उलट थायरॉईडची गोळी चालू केल्यावर, नैसर्गिक नियमाप्रमाणे हळूहळू रिसेप्टरची संख्या रोडावते व हार्मोन्सच्या औषधाचा डोस वाढवावा लागतो. हे न समजल्यामुळे हार्मोन्सच्या आजारात नेहमी औषधाचा डोस वाढतच जातो हा भ्रम पसरला आहे.त्यामुळे हे सारं बाजूला ठेवा, उचित डोस घ्या, हे उत्तम.

आजार नव्हे, कमतरताहायपोथायरॉईडीझम हा आजार नसून ही शरीरात झालेली थायरॉईड हार्मोन्सची कमतरता आहे. त्यामुळे थायरॉईडची गोळी घेण्याशिवाय या आजाराला दुसरा कुठलाही पर्याय नाही. जशी पाण्याची तहान ही पाण्यानेच भागते, तसेच थायरॉईड हार्मोन्सची कमतरता फक्त थायरॉईडच्या गोळीनेच दूर होऊ शकते. हायपोथायरॉईडीझम पूर्णपणे बरा होऊन, गोळी घेणे कधी थांबेल हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. याचे उत्तर न मिळाल्यास इतर औषधपद्धतींमध्ये यावर इलाज आहे का? याचा तपास केला जातो. काही काही वेळेस कोणीतरी खोटी आशा दाखवून, आजार बरे करण्याचं आश्वासन देऊन पैशांची लूट करतात. कुठल्याही उपचारपद्धतीत या आजाराला कायमस्वरूपी उपाय नाही व निघणेदेखील अवघड आहे. मनातील सगळ्या शंका-कुशंका दूर सारून नियमित थायरॉईडचे औषध घेणं गरजेचं आहे. हीच हायपोथायरॉईडीझमला नियंत्रणात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन्सतज्ज्ञ आहेत.)dryashpal@findrightdoctor.com