शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

फिजिकल डिस्टन्स पाळाच; इमोशनल डिस्टन्सचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:18 IST

फिजिकल डिस्टन्स पाळाच; पण मनांचं काय? मनानं दूर जाणं, मदत नाकारणं, माणसंच नाकारणं हे आपल्याला कुठं नेईल?

ठळक मुद्दे माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. 

- गणोश पोकळे

सात-आठ महिने झाले कोरोना उद्भवला.आज गावखेडय़ात लोक सहज म्हणतात की काय हा आजार, माणसात माणूस राहिला. कोरोनाने माणसा-माणसात अंतर पाडलं.सामाजिक अंतराचा शाप घेऊन हा आजार आला. जगभरातली मानवी गजबज होत्याची नव्हती केली. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेली शहरं मोकळी झाली. गावखेडय़ार्पयतचा मोकळा व्यवहार एका फटक्यात बंदिस्त झाला. गजबजलेल्या शहरासह गजबजलेले रस्ते एकाचवेळी निवांत झाले. प्रवाशांसह प्रवासही थांबला. पण शारीरिक दुरी राखता राखता माणसा-माणसात जे मानसिक अंतर पडत चाललंय त्याचं काय, असाही प्रश्न आहेच. कोण आणि कशी मिटवणार ही दरी. एक काळ असा येईल कोरोना साथ जगभरातून पूर्णपणो नाहीशी झालेली असेल. पण वाढलेलं मानसिक अंतर कसं कमी होणार?या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शारीरिक अंतर पाळायचे आहे ही गोष्ट खरीच. पण हे अंतर पाळलंजातं तेव्हा समोरच्या व्यक्तीला जी वागणूक दिली जाते त्या नजरा कशा बदलणार?शहरातून गावांत कुटुंब आले. काहींना आसरा आणि प्रेम मिळालंही. पण काहींच्या वाटय़ाला मात्र उपेक्षा आली. रक्ताच्या नात्याच्या माणसांनीही त्यांना जवळ करायला घरात घ्यायला नकार दिला. कुठं झाडाखाली त्यांना संसार मांडावा लागला. माणसांत, नात्यांत दुरावा आणि अविश्वास आला.मनानं माणसं दूर झाली. माणसांपासून, आपल्याच माणसांपासून धोका आहे असा अविश्वास नजरेत कसा काय रुजला.आणि तो आता कसा पुसला जाणार?संकट येत असतात, जात असतात. मात्र, या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, स्नेहाचा, मायेचा ओलावा सुकणार नाही हे तरी आपण पाहिलं पाहिजे.संकटकाळात माणसांना मदतीची गरज अस

ते, तेव्हा मदत नाही करणार तर कधी?तेव्हा माणुसकी नाही जपणार तर कधी?कोरोनाकाळात शारीरिक  दुरी-अंतर हे महत्त्वाचं आहे. पण ते करताना मनंही जपली पाहिजे. हे अंतर ठेवताना आपण जे शब्द वापरतोय, जी वागणूक देतोय, ती जर मनाच्या आत ठेच पोहचवणारी असेल तर.  शेवटी इतकंच की, वेळ आल्यावर हा आजार नक्की जाईल. तो जाण्यासाठी आणि आपल्याला न होण्यासाठी होईल ती काळजी जरूर घ्यावी. पण त्यापेक्षा अधिकची काळजी माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. (गणोश मुक्त पत्रकार आहे.)