शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

फिजिकल डिस्टन्स पाळाच; इमोशनल डिस्टन्सचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:18 IST

फिजिकल डिस्टन्स पाळाच; पण मनांचं काय? मनानं दूर जाणं, मदत नाकारणं, माणसंच नाकारणं हे आपल्याला कुठं नेईल?

ठळक मुद्दे माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. 

- गणोश पोकळे

सात-आठ महिने झाले कोरोना उद्भवला.आज गावखेडय़ात लोक सहज म्हणतात की काय हा आजार, माणसात माणूस राहिला. कोरोनाने माणसा-माणसात अंतर पाडलं.सामाजिक अंतराचा शाप घेऊन हा आजार आला. जगभरातली मानवी गजबज होत्याची नव्हती केली. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेली शहरं मोकळी झाली. गावखेडय़ार्पयतचा मोकळा व्यवहार एका फटक्यात बंदिस्त झाला. गजबजलेल्या शहरासह गजबजलेले रस्ते एकाचवेळी निवांत झाले. प्रवाशांसह प्रवासही थांबला. पण शारीरिक दुरी राखता राखता माणसा-माणसात जे मानसिक अंतर पडत चाललंय त्याचं काय, असाही प्रश्न आहेच. कोण आणि कशी मिटवणार ही दरी. एक काळ असा येईल कोरोना साथ जगभरातून पूर्णपणो नाहीशी झालेली असेल. पण वाढलेलं मानसिक अंतर कसं कमी होणार?या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शारीरिक अंतर पाळायचे आहे ही गोष्ट खरीच. पण हे अंतर पाळलंजातं तेव्हा समोरच्या व्यक्तीला जी वागणूक दिली जाते त्या नजरा कशा बदलणार?शहरातून गावांत कुटुंब आले. काहींना आसरा आणि प्रेम मिळालंही. पण काहींच्या वाटय़ाला मात्र उपेक्षा आली. रक्ताच्या नात्याच्या माणसांनीही त्यांना जवळ करायला घरात घ्यायला नकार दिला. कुठं झाडाखाली त्यांना संसार मांडावा लागला. माणसांत, नात्यांत दुरावा आणि अविश्वास आला.मनानं माणसं दूर झाली. माणसांपासून, आपल्याच माणसांपासून धोका आहे असा अविश्वास नजरेत कसा काय रुजला.आणि तो आता कसा पुसला जाणार?संकट येत असतात, जात असतात. मात्र, या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, स्नेहाचा, मायेचा ओलावा सुकणार नाही हे तरी आपण पाहिलं पाहिजे.संकटकाळात माणसांना मदतीची गरज अस

ते, तेव्हा मदत नाही करणार तर कधी?तेव्हा माणुसकी नाही जपणार तर कधी?कोरोनाकाळात शारीरिक  दुरी-अंतर हे महत्त्वाचं आहे. पण ते करताना मनंही जपली पाहिजे. हे अंतर ठेवताना आपण जे शब्द वापरतोय, जी वागणूक देतोय, ती जर मनाच्या आत ठेच पोहचवणारी असेल तर.  शेवटी इतकंच की, वेळ आल्यावर हा आजार नक्की जाईल. तो जाण्यासाठी आणि आपल्याला न होण्यासाठी होईल ती काळजी जरूर घ्यावी. पण त्यापेक्षा अधिकची काळजी माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. (गणोश मुक्त पत्रकार आहे.)