शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

NO जरुरी होता है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 08:33 IST

एखादी गोष्ट नाही मिळाली, संधी नाकारली गेली, एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीनंच आपल्याला नकार दिला, नाकारलं तर किती दिवस आपण आयुष्य त्या नकारात कोंडून घालणार? बाहेर पडा त्यातून एक नकार नीट पचवला तर हजार होकार वाट पाहत उभे राहतील. पण त्यासाठी नकाराकडे पहायची नजर कमवावी लागेल...

- प्राची पाठक

कोणी आपल्याला नाकारलं, नाही म्हणालं तर आपण दुखावले जातोच. आपलं काही चुकलं का, समोरच्यानं आपल्याला का नाकारलं असेल, कोण नेमकं कसं वागलं, का वागलं याची उत्तरं मिळाली तर बरं होईल, असं वाटत असतं. उत्तरं मिळून आपण गप्प बसणार असू, असंही नसतं. आपण आपली बाजू मांडू लागतो. कोणाला तीसुद्धा ऐकण्यात रस, वेळ नसेल ही शक्यता असते. पण आपल्याला वाटत असतं की जर आपल्याला निदान कारण कळलं तर मी माझी भूमिका नीट स्पष्ट केली असती. आपण किंचित आशा बाळगून असतो की माझी बाजू कळली तर नकार मिळाला नसता. पण हीपण एक शक्यताच असते. कुणाला अशी बाजू मांडायची संधी मिळूनदेखील नकारच स्वीकारावा लागतो. कोणाला आपल्याला नकार का मिळालाय, याचे उत्तर आयुष्यभरदेखील मिळत नाही.

खरं तर अशी सगळी स्पष्टीकरणं आयुष्य आपल्याला सहजच आणि हवी तशी देत नाही. त्यामुळे त्या त्या घटनेचं आपलं आपलं व्हर्जन घेऊन आपण तो नकार पचवत राहतो. इतरांना सांगायला गेलं तर त्याचे काय अर्थ लावले जातील, ते माहीत नसल्यानं अनेकजण नकाराशी सामना करताना एकटे पडलेले असतात. क्वचित कुणाला सांगितलं तर पुढे मागे तेही नातं तुटू शकेल, तोच मुद्दा आपल्यासाठी परत वापरला जाईल, चार ठिकाणी तीच गोष्ट उगाच होईल अशी भीती असते. आपण विनाकारण कुरकुर तर करत नाही ना? कदाचित आपलीच योग्यता नाही होकार मिळायची, समोरचा कोण समजतो स्वत:ला, त्याचा बदलाच घेईनच अशाही सगळ्या विचारांच्या फेरी आतल्याआत घडतात. इतक्या टोकाला त्या जाऊ शकतात की ज्याचा होकार मिळण्यासाठी आपण इतके कासावीस झालेलो असतो एके क्षणी, तोच कसा वाईट आहे, त्याचं कसंकसं आणि काय काय चुकतं तेच आपण मोठं करून कायम मनात आणि समोर येईल त्याला सुनावत राहतो.

नकार पचवणं हे केवळ मानसिक नसतं. एखाद्याला शारीरिक इजा केली तर कसा त्रास होईल, तशा स्वरूपाच्या त्रासातून मन आणि शरीर आपल्याला घेऊन जातं. आपल्याविषयी प्रश्नचिन्ह उभं करतं. स्ट्रेस येतो, खजील वाटतं. आपण कोणीतरी कमी आहोत, असा न्यूनगंड ते आपल्याला देऊन जातं. झोप उडते, तेच ते विचार मनात येतात. एकट्यानं आपण त्या विचारांशी, अस्थिरतेशी झुंजत बसतो. हळूहळू जवळपास असलेल्या लोकांनाही टाळू लागतो. नकार सतत मनात मोठा होत राहतो.

आता प्रश्न यातून कसं बाहेर पडायचं?पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या नकारातच, त्याच टप्प्यात अडकलो आहोत, हे आपल्याशीच पक्कं केलं तर एक सोपी गोष्ट करता येते.

आपण इथं कितीवेळ अडकून पडायचे, याचं एक लिमिट स्वत:ला आखून द्यायचं. म्हणजे काय तर मी अमुक वेळ टीव्ही बघेन, अमुक वेळ फोन बघेन, अशी शिस्त लावायचा थोडाफार प्रयत्न आपण करतच असतो. कधी ताबा जातो; पण एरवी आपण हा विचार तरी करतो की यावर पूर्ण वेळ खर्च करणं योग्य नाही. तसंच वेळेचं एक लिमिट या भळभळणाºया जखमेला आखून देता येतं का, ते बघायचं. थोडक्यात, दु:ख खोटंखोटं विसरायचं नाही. ‘छे, छे मला काहीच फरक पडत नाही’, असंही म्हणायचं नाही. ‘हो, मी दुखावलो गेलोय/गेलेय आणि त्यावर नीट विचार करायला मी वेळ घेईन’, हे बजावायचं स्वत:ला.

अर्थात सगळीच उत्तरे लगोलग मिळणार नाहीत. कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे हे एक नाकारलं जाणं आहे का, असं आत्मपरीक्षण करता येतं. या नाकारल्या जाण्याला आपल्याला चांगलं काही करून/घडवून भिडायचं असेल, तर उत्तरं शोधायला, मागच्याच पानावर परत आणि सारखंसारखं अडून राहायला आजचा वेळ का घालवतो आहोत आपण याचा विचार करून त्याचं टाइम लिमिटच आखता येतं. म्हणजे चक्क आपण वेळ ठरवतो, चार दिवस, आठ दिवस घेतो. आणि मनात हे सॉर्ट आउट करतोच, हे असं ठरवून टाकायचं. तो वेळ उलटला की मात्र तेच ते परत होणार नाही याची काळजी घ्यायची. जमलं नाही तरी जमेल असा स्वत:लाच आधार द्यायचा. इतरांनी भलेही आपल्याला नाकारलं असेल, आपल्याला आपणच स्वीकारणं आणि समजून घेणं तर आपल्या हातात असते ना? ते कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. आपला टेकू आपल्यातच शोधता येतो.

अवघड वाटतं हे, पण अशक्य नसतं. सरावानं जमतं. अंगवळणीही पडतं..

(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेत, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)