शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ना बोले तूम, ना मैने कुछ कहां.

By admin | Updated: February 12, 2015 16:52 IST

प्यार इश्क मोहब्बत.या टप्प्यात ना भल्याभल्यांची बोबडी वळते.त्या रंगीलातल्या आमीर खानसारखं होतं.

प्यार इश्क मोहब्बत.या टप्प्यात ना भल्याभल्यांची बोबडी वळते.त्या रंगीलातल्या आमीर खानसारखं होतं.तो म्हणतो ना, रोज रोज हम सोचता यहीं की,आज हमको वो अगर, मील जाए कहीं,
साला, ऐसा बोलेगा, साला वैसा बोलेगा,
खुल्लमखुल्ला उसपे दिल का राज हम खोलेगा,
वो सामने जो आती है,
सांस ही अटकती है,
और ये जुबां जाती है फिसल.
हे सेमटूसेम आपल्याही बाबतीत घडताना अनेकांनी अनुभवलं आहेच.
एकतर काही बोलता येत नाही, शब्द सुचत नाहीत,
अनेकदा तर बोलतो खूप पण त्यात जे बोलायचं तेच राहून जातं.
आणि एवढं करून असं करता करता, प्रेमातबिमात पडलंच,
प्रपोज मारलंच, तो/ती हो म्हणाले,
प्रेमाची गाडी पुढं निघालीच की,
गडबड होते.
गैरसमज आणि भांडणाचे स्पीडब्रेकर समोर यायला लागतात.
रोमान्स आणि प्रेम राहतं बाजूलाच, 
एकमेकांच्या बोलण्यातून नको ते अर्थ तरी काढले जातात 
नाहीतर एक वाक्य हमखास चिपकवलं जातं.
‘तुला कळतंच नाही, मी काय म्हणतेय ते’
किंवा
‘तुला काय नेमकं म्हणायचं असतं ना, ते नीट सांगत जा.
उगीच कोडी सोडवा खेळ नको.’
या अशा चालवा डोकी-सोडवा कोडी खेळात जर 
तुम्ही व्हॅलेण्टाईन्स डे सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करत असाल, 
आणि त्या प्लॅनिंगचा पचका होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल..
तर काही सोप्या वाक्यांचे मोठे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे.
ते समजून घ्या, तरच इश्कवाला दिवस नीट सेलिब्रेट होईल; 
नाहीतर ऐन व्हॅलेण्टाईन्स डेलाच भांडण, 
हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो.
( कुणी तसं जाहीर कबूल करत नसलं तरीही.)
त्यामुळे ‘ती’ जे म्हणते ते
आणि ‘तो’ जे म्हणतो ते,
म्हणजे नक्की काय, हे तुम्हाला जरा माहितीच असायला हवं.
तरच तुमचा व्हॅलेण्टाईन्स डे ख:या अर्थानं हॅप्पी होऊ शकेल.
 
तो जेव्हा म्हणतो,
आय लव्ह यू !
एकतर त्याला जाम टेन्शन येतं, आय लव्ह यू म्हणायचं. 
(म्हणजे जे खरोखरच प्रेमात पडलेले असतात, तिच्यासाठी पुरते पागल झालेले असतात ते. 
पक्के फ्लर्ट असतात, 
त्यांच्याविषयी ही चर्चा नाही.)
तर त्याची अवस्था असते,
वो ना कहेंगे तो 
खुदकुशी कर जाऊंगा मै यारो, 
वो हां कहेंगे तो भी खुशी से मर जाऊंगा मैं यारो.
अशा अवस्थेत हिंमत एकवटून, रिहर्सल करकरून तो आय लव्ह यू म्हणतो.
पण त्याला ते पुन्हा पुन्हा म्हणणं जरा अवघड असतं.!
कारण त्याला वाटतं, सांगून टाकलं ना, एकदा झालं काम! पुन्हा काय तेच ते सांगायचं. येताजाता तेच ते काय म्हणायचं?
पण तिला वाटतं की, यानं सांगत राहिलं पाहिजे की, आय लव्ह यू. त्या शब्दात तिला बरंच काही ऐकू येतं. म्हणजे तू सुंदर दिसतेस, बाकीच्यांपेक्षा महत्त्वाची आहेस, मी तुला दगा देणार नाही. असं तिला त्यावेळी जे सोयीचं वाटतं, ते तिला ऐकू येतं.
पण तो हे म्हणतच नाही पुन्हा पुन्हा म्हणून तिची चिडचिड, ती म्हणते साधं आय लव्ह यू म्हणायचं, त्यात काय लागतं?
पण त्याला जमत नाही. कारण तो जेव्हाकेव्हा म्हणतो, ते म्हणणं, हे त्याचं मोकळं होणं, सुटणं असतं. एकदाच प्यार का इजहार पुन्हा पुन्हा नाही! त्यामुळे म्हण म्हण म्हणत त्याला छळणं, म्हणजे जरा अतीच होतं!
 
तो जेव्हा म्हणतो,
मला नकोय काही गिफ्ट!
एकतर आधीच प्रश्न असतो की, ‘त्याला’ काय गिफ्ट द्यायचं. त्यात तो म्हणतो की, मला नकोय गिफ्ट!
त्यानं तसं म्हटलं की, ती भडकते. चार दुकानं शोधून तिनं गिफ्ट आणलेलं असतं. आणि तो म्हणतोय, हे नकोय मला, या असल्या रंगाचा शर्ट मी नाही घालत, हा असला परफ्यूम मी नाही वापरत, हा बेल्ट आहे की रोपवे.?
असं तो काहीही म्हणू शकतो.
तर तो तसं म्हणाला, तर त्याच्या भावनेचा आदर करायला शिका. मुख्य म्हणजे एकटीनं जाऊन त्याच्यासाठी गिफ्ट घेऊच नये.
त्याला सरळ दुकानात न्यावं, बजेट सांगा, तुम्हाला त्याला काय घ्यायला आवडेल ते सांगा, आणि ते नको असेल त्याला तर त्याला जे हवं तेच त्याला घेऊ द्या. तरंच तो खूश होईल. कारण दुस:यानं आपल्याला काही देणं यातला रोमॅण्टिसिझम त्याला कळतच नाही. उलट आपण निर्णय घेऊन आपल्यासाठी काहीतरी निवडलं यात त्याला भयंकर आनंद होतो.
तो आनंद त्याला होऊ द्या, आणि जे घेतलं ते कितीही भुक्कड असलं किंवा वाटलं तरी त्याविषयी मतप्रदर्शन करू नका.
कारण तसं केलं की, तो चिडणार, वैतागणार!
 
ती जेव्हा म्हणते,
मला काहीच नको..
 
‘सांग ना, तुला काय गिफ्ट हवंय?’
असं मारे तो तिला विचारतो, त्याला वाटतं, देऊन द्यायचंच आहे तर तिच्या आवडीचं देऊ, कारण गिफ्ट दिल्यावर भुणभुण नको, हेच का दिलं, ते का नाही दिलं?
तो आपला गोष्टी सोप्या आणि सॉर्ट आऊट करण्याच्या मागे, म्हणून तो तिला विचारतो की, तुला काय गिफ्ट देऊ? एकदा नाही चारचारदा विचारतो. पुन्हा पुन्हा विचारतो. अनेकदा दुकानातही घेऊन जातो. ती सोबतही येते.
पण तिचं उत्तर ठरलेलं, ‘मला काहीच नको. खरंच नकोय!’
असं तिनं चारचारदा सांगितल्यावर त्याला वाटतं की, खरंच तिला काही नकोय, ती समंजस आहे. तिचं या फुटकळ वस्तूंवर नाही तर आपल्यावर प्रेम आहे. मग तोही गिफ्ट घेण्याचा विचार सोडून देतो. तिथंच सगळा घोळ होतो.
कारण ती जेव्हा म्हणते की, मला काहीच नकोय, याचा अर्थ एवढाच असतो की, तुला काय गिफ्ट हवंय हे असं तू पुन्हा पुन्हा विचारू नकोस, माझा संताप होतोय.
कारण तिच्या मते गिफ्ट विचारून देत नसतात. व्हॅलेण्टाईन गिफ्ट तर नाहीच नाही. तिला वाटतं, त्यानं विचार करावा हिला काय आवडेल, काय छान दिसेल, ते ठरवून चार दुकानं शोधून ते गिफ्ट आणावं, मस्त गिफ्ट पॅक करून हातात द्यावं. त्यात तिला रोमॅण्टिक वाटतं. तिचं प्रेम गिफ्टवर, त्याच्या किमतीवर नसतं.
तिला मस्त वाटतं ते, त्यानं आपला विचार करून गिफ्ट आणलं या भावनेनं.
पण ते त्याला कळत नाही.
आणि ती म्हणत राहते, मला काही नकोय. म्हणून म्हणून थकली की, फालतू कारणाचं खुसपट काढते, चिडते. बोलते.
त्याला वाटतं, मी तर विचारलं होतं, काय गिफ्ट देऊ, बजेटही सांगितलं नाही, पण हिचा पापड मोडकाच. घोळ होतो, तो इथेच!
 
ती जेव्हा म्हणते,
मला काहीही चालेल, तू ठरव!
 
‘आपण आधी सिनेमाला जाऊ, मग जेवायला जाऊ, का आधी लॉँगड्राईव्हला जायचं, तिकडून मग मॉलमधे जाऊ. काय चालेल ना?’
तो एकदम एक्साईट होऊन तिला विचारतो.
ती म्हणते, ‘मला काहीही चालेल, तू ठरव!’
मग तो ठरवतो, तिला इकडेतिकडे घेऊन जातो, जेवायला जातात. तर हिचा चेहरा एकदम उतरलेला. बोअर. त्यानं विचारलं तर ती म्हणते, मला जाम बोअर झालं, काही मजाच नाही आली. किंवा काही बोलतच नाही. हुप्पं होऊन बसते.
त्याला कळत नाही, एवढा वेळ हिच्या पाठी घालवला तरी हिचा पापड पुन्हा का मोडला? पागल तर नाहीये ही.
पण होतं काय, तिला वाटतं, आपण दोघं मिळून ठरवावं, यानं ठरवण्यापूर्वी आपल्याला विचारावं की, सांग तूला काय करावंसं वाटतंय?
किंवा असं काहीतरी प्लॅन करावं जे यापूर्वी कधी केलेलं नाहीये. काहीतरी सुपर एक्सायटिंग. पण याचं नेहमीसारखं ठरलेलं, लॉँग ड्राईव्ह, सिनेमा, जेवण की झालं.
त्यामुळे जेव्हा जेव्हा ती म्हणते की, मला काहीही चालेल, तू ठरव. त्यावेळेस गप्प राहून, तिला काही गोष्टी ठरवू देणंच हिताचं असतं असं खुशाल समजा!