शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

NH 44 जायचंय ना रोड ट्रिपवर ?

By admin | Updated: October 20, 2016 16:16 IST

कन्याकुमारी ते श्रीनगर हा प्रवास करणारी एक भन्नाट रोड ट्रिप, पाहिली ना मागच्या अंकात तिची झलक? पूर्ण ट्रिपचीच गोष्ट वाचायची आहे, मग आता ‘लोकमत दीपोत्सव’ हा दिवाळी अंक आता सर्वत्र उपलब्ध आहेच..

..कोण म्हणतं देश फिरायला पैसे लागतात?
कन्याकुमारी ते काश्मीर..
या रोड ट्रिपवर आम्ही बाहेर पडलो..
तुम्हाला वाटलं असेल, मजा आहे, गाडीनं प्रवास, उत्तम सोय, काही आर्थिक चणचण नाही..
ते खरंय, ऑफिसनं खाण्यापिण्याची व्यवस्था, गाडीचं पेट्रोल यासाठी म्हणून पुरेसे पैसे सोबत दिले होतेच! पैशाची अडचण अजिबात नव्हती. पण आम्हीच ठरवलं की, ही रोड ट्रिप आहे, तो मूड सोडायचा नाही. रोडसाईड जे मिळेल ते खायचं, जिथे सोय होईल तिथं रहायचं! रस्ता हेच आपलं घर, आणि त्या रस्त्यावर भेटणारी माणसं जशी राहतात तसंच आपण रहायचं.. खायचं प्यायचं!
आणि पहिल्या काहीच दिवसात आमच्या लक्षात आलं की, फार पैसे नाही लागत आपला देश फिरायला, मनसोक्त भटकंती करायला!
कारण मुळात आम्ही कोण,कुठले, आमची पदं, त्यासाठीची ओळखपत्र असं काही कुणी विचारलं नाही. ( अपवाद फक्त हॉटेलात मुक्कामाची सोय करताना द्यावी लागलेली ओळखपत्रं!)
उलट आम्ही असे ‘देश’ पाहत फिरायला निघालोत असं कळलं की, लोक आवर्जुन बोलायचे. जेवणाखाण्याचा आग्रह करायचे आणि त्याचे पैसेही नकोत म्हणून दोस्तीच्या नात्यानं आम्हाला निरोप द्यायचे, असंही घडलं.
कन्याकुमारीजवळच्या एका छोट्या गावात तर झोपडीवजा घरातली एक बाई माझ्या घरीच जेवायला या असा आग्रह करत होती, तो ही खाणाखुणा करुन! दुपारच्या टळटळीत उन्हात आम्ही तिला विचारलं की, जवळ कुठं हॉटेल आहे का, जेवायला?
तर ते नव्हतंच, म्हणून त्या बाई आम्हाला आग्रह करत खाणाखुणा करत म्हणत होता, ‘ हॉटेल इल्ले, कम, कम, कम!’
ही अशी किती उदाहरणं सांगता येतील. किती माणसं, किती किस्से. ज्यांनी प्रेमानं, अगत्यानं आम्हाला आपण या रोड ट्रिपवर मायेनं साथ दिली. त्यामुळे देशात प्रवास करणं, फिरणं हे काही फार महागडं प्रकरण नव्हे. अट एकच, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास करावा, सुरक्षित, सोयीची, स्वच्छ जागा बघून मुक्काम करावा. आणि साधंसुधं जे जे म्हणून ‘लोकल’ जेवण मिळतं, ते जेवावं!
अजून काय लागतं फिरायला..
तरीही आम्ही जी काय भटकंती केली, त्यातून तुमच्यासाठी या काही टिप्स..
* रोडसाईड उत्तम,सुरक्षित, रात्री पाठ टेकवण्यापुूरती अनेक हॉटेल्स मिळतात. एसीबिसीची चंगळ केली नाही तर काही शे रुपयात उत्तम सोय होऊ शकते.
* याशिवाय धर्मशाळा, धार्मिक स्थळं इथंही अत्यंत माफक दरात राहण्याची सोय होते. देशात सर्वत्र धार्मिक पर्यटन जोरात असल्यानं राहणं आणि आंघोळीपुरतं गरम पाणी एवढी सोय अत्यंत कमी पैशात होऊ शकते.
* तेच खाण्यापिण्याचंही. रोडसाईड खाण्यापिण्याची सोय कमी पैशात कुठल्याही हॉटेलात होते. जे जे स्थानिक ते ते खायचं. बिंधास्त. स्वस्तात. नाकं मुरडायची नाहीत.
* याशिवाय बस, ट्रेननं प्रवास केला तर कमीत कमी पैशात आपला देश पाहून होऊ शकतोच!
* हे एवढं केलं तरी मायेनं माणसं तुमची विचारपूस करतात, परत येताना श्रीमंत झाल्यासारखं वाटतंच..
-टीम एनएच ४४
 
 
स्वत::साठी घ्या, स्नेहीजनांना दिवाळी भेट पाठवा ! याशिवाय भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था : deepotsav.lokmat.com