शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:28 IST

लोक वाईट नसतात, माणसाची वेळ वाईट असते याचा अनुभव पहिल्यांदा आला तो मुंबईत. माझ्यातली मी सापडले ती ही मुंबई. वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांसोबत राहायला शिकवलं तेही मुंबईनेच.

ठळक मुद्देमुंबई हे शहर नाही, त्याहून मोठं काही आहे, जे तुमच्यात भिनतं.

-अस्मिता मस्के

ऑक्टोबरमधली गोष्ट असेल. माझा मुंबईमधला पहिला दिवस. एका खासगी कंपनीमध्ये इण्टरव्ह्यू होता, अंधेरीला. आई-बाबा नको म्हणत असताना मुंबईला आले. दादाकडे थांबणार होते. दादा शिवडीला राहात होता. लोकलने जायची भीती वाटत होती, तर तो म्हणाला माझी स्कूटी घेऊन जा. मुंबई लोकलबद्दल मनात एवढी भीती की मी लगेच तयार झाले. त्यावेळी हेही माहीत नव्हतं की अंधेरी आहे कुठं? जायचं कसं? गूगल मॅप चालू केला आणि निघाले. साधारण तास-दीड तासाच्या प्रवासानंतर अंधेरीला पोहोचले. मुलाखत झाली, जॉब मिळाला त्या आनंदात परतीच्या प्रवास चालू झाला. हिवाळा होता अर्थात मुंबईमध्ये कसली आलीय थंडी, घामाच्या धारा वाहत होत्या. दिवसभराचा प्रवास आणि दमट वातावरण यामुळे फार चिडचिड झाली होती माझी. नवीन जॉब मिळाला याचा आनंद होता; पण खूप प्रश्न होते. राहू शकेन का मी या शहरात? चिंता लागली होती, जमेल का हे मला? पुण्याबद्दल प्रचंड प्रेम होतं मला नेहमीच. पुणेकरांचा तो स्वभाव, तो स्पष्टवक्तेपणा माझ्या स्वभावाला साजेसा होता; पण तरी निर्णय घेतला मी माझ्या क्षेत्नात काही करायचं असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही असा. मला मुंबईला जॉबला पाठविण्यासाठी कोणीच तयार नव्हतं; पण मी हट्टी निर्णय घेतला आणि निघाले. ट्रेनचं तिकीट बुक केलं गडबडीत, तिही एलटीटीला जाणारी. आता हे एलटीटी नेमकं कुठं आहे याचा जरादेखील अंदाज नव्हता. त्यात ओएलएक्सवरून राहण्याची जागा शोधली. पैसे भरले, सगळं सुपरफास्ट काम झालं, आणि सुरू झाला मुंबईचा प्रवास.  त्या फ्लॅटवर कोणी नसायचं, का तर मुंबईचं नाइट लाइफ. त्यात अस्सल पुणेरी वरण, भात, भाजी, चपाती खाणार्‍या मला अंधेरीसारख्या ठिकाणी बंगाली, बिहारी कामवाल्या बायकांनी बनविलेलं जेवण काही पचनी पडेना. समस्या वाढत आहेत हे जाणवायला लागलं होतं. अजून ऑफिसमध्ये कामात निभाव लागायचा होता. अचानक ऑफिसला जाताना मोबाइल चोरीला गेला. नवीन शहर, नवीन लोक, नवीन ऑफिस या सर्वात माझं करमणुकीचं साधन होता तो मोबइल. पार संताप झाला काय हे शहर आहे. ना नीट जेवण, नुसती धावपळ, चोरी, लोकदेखील चांगले नाहीत अशा सर्व विचारांनी मुंबईचा राग आला. एका क्षणाला वाटलं सारं सोडून पुण्याला परत जाऊया पण ते आता शक्य नव्हतं. हळूहळू माझं रूटीन जमलं. एरव्ही कधी आईला साधी मदत ना करणारी मी स्वतर्‍ स्वयंपाक करायला सुरुवात केली. सकाळी स्वयंपाक, मग ऑफिस, मग थोडी भटकंती असा काहीसा दिनक्रम सुरू झाला. खाण्याची आवड तर माझी होतीच; पण आता कळलं की साध्या साध्या भाज्या बनवत असतानादेखील एखादा छोटा जिन्नस टाकायचा राहिला तरी भाजीची चव किती बदलते. मला स्वयंपाक करायला आवडतो हे मला नव्यानंच समजलं. या शहरात रात्नी फिरण्याची काय नशा आहे हे अनुभवूया म्हणून एकदा रात्नी फिरण्याचा बेत आखला. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेले. किती ते लोक, काय त्यांचा तो उत्साह, ती प्रचंड ऊर्जा पाहून मी मोहून गेले. दिवसभर ऑफिस करून थकून गेल्यावरही कुठून येत असेल हे सारं? प्रश्न पडला मला. एकीकडं पुण्यात ग्राहक दारात उभा असला तरी 9 वाजले की दार तोंडावर बंद करणारे लोक आणि इथं मात्न उलट चित्न पाहायला मिळालं. माझं कुतूहल अजून वाढायला लागलं होतं. या शहरात रात्नीची नशाच वेगळी असते, असं वाटलं.हळूहळू या शहराची नशा मला कधी चढली हेच कळलं नाही. सगळ्या खाऊ गल्ल्या फिरले, वेगळे वेगळे पदार्थ खाल्ले. फोर्टला बडेमियापासून ते मीरारोडला असणार्‍या  ढाब्यार्पयत, सीएसटीला गाडय़ांवर मिळणार्‍या अंडाभुर्जीपासून आलिशान मराठी रेस्टॉरंटर्पयत सारं पालथं घातलं. साऊथ मुंबईमधल्या कमानी असणार्‍या टोलेगंज इमारती पाहिल्या की छाती गर्वाने फुगून जाते. आपण त्यांच्याकडे आकर्षित होतोय का असं काहीसं वाटतं. मरीन ड्राइव्हच्या समुद्राकडे पाहिलं तर हेवा वाटतो. लोक त्या किनार्‍यावर येऊन गप्पा मारत बसतात, किती गोष्टींचा साक्षीदार आहे तो! जगातल्या कुठल्याच शहराच्या समुद्रकिनार्‍याच्या नशिबात इतकं सुख नसावं. एकटं जगायला, स्वतर्‍चा विचार करायला शिकवलं या शहराने. लोक वाईट नसतात, माणसाची वेळ वाईट असते याचा पण अनुभव देऊन गेलं हे शहर. वेगवेगळ्या संस्कृती, समाजाचे लोक आहेत या शहरात तरी खर्‍या अर्थाने भारतीय व्हायला शिकवलं या शहरानं. या शहराच्या वेगाला जो सामावून घेऊ शकतो तोच त्या वेगाने पुढे जाऊ शकतो हेही तितकंच खरं आहे. सळसळतं चैतन्य, उत्साह, गती, स्वातंत्र्य, गर्दीमधली शांतता, प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य देतं आपलंस करून घेतलं आहे मला मुंबईने. प्रत्येकाला एकदा तरी वाटतं यावं इथं अशी ही जादूनगरी आहे. चांगली-वाईट दोन्ही प्रकारची माणसं भेटतील; पण दोन्ही माणसं खूप काही शिकवून गेली इतकं मात्न नक्की. माझ्यातल्या मला शोधायला मुंबईने शिकवलं, माझ्या लिखाणाला वाचा फुटली, माझ्यातला प्रवासी जागा करून दिला, वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ बनवलं, सहनशीलता वाढवली, शांत आणि स्टेबल व्हायला मदत केली. अ‍ॅडजस्टमेन्ट म्हणजे नेमकं काय, ते शिकवलं.मी मुंबईत आयुष्यभर राहीन की नाही माहीत नाही; पण शेवटी इतकं म्हणेन लोक देश सोडून गेलेली पाहिली आहेत, पण मुंबई सोडून गेलेला कोणी पाहिलं नाही. कारण मुंबई हे शहर नाही, त्याहून मोठं काही आहे, जे तुमच्यात भिनतं.