शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

थेट आसाममध्ये जाऊन मानसोपचार करणार्‍या तरुण डॉक्टरची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:10 IST

मुंबईतला मनोविकारतज्ज्ञ तरुण डॉक्टर, तो ठरवतो मानसिक उपचारांची गरज दुर्गम भागात, खेडय़ापाडय़ातही आहे, आपण तिथं जायला हवं. आणि म्हणून तो सरळ आसाम गाठतो.

ठळक मुद्देमी ठरवलं की आपण फक्त सायकॅट्रिस्ट व्हायचं नाही तर कम्युनिट सायकॅट्रिस्ट व्हायचं.

डॉ. नीलेश मोहिते

एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षार्पयत माझं आयुष्य सुखा सुखी चाललं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबात, मुंबईत मी वाढलो. वडील बँकेत अधिकारी, तर आई गृहिणी. मुंबईतल्या ख्यातनाम टीएनएमसी आणि नायर हॉस्पिटलमध्ये मी शिकलो. आमच्या पीएसएम फिल्ड व्हिजिट सुरू झाल्या आणि आम्हाला झोपडपट्टी, दुर्गम गावं, रेड लाइट एरिया, अनाथआश्रम, अंध आणि अपंगांसाठीच्या संस्था आणि तुरुंग असं अनेक ठिकाणी नेण्यात आलं. हा अनुभवच माझ्यासाठी नवा आणि डोळे उघडणारा होता. निराशही झालो ते सारं पाहून.  त्याकाळात मला वाटू लागलं की, मी किती नशिबवान आहे. मला कुठलं व्यंग नाही, कुठलीही सामाजिक-राजकीय कारणं माझ्या जगण्यावर परिणाम करत नाहीत, माझं कुटुंब आहे, माझ्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी त्यांनी उत्तम तरतूद केली आहे. या भावनेनं बरं वाटलं तसं जबाबदारीची जाणीवही करून दिली. त्यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी काही लहानमोठे सामाजिक उपक्रम सुरू केले.त्याचकाळात मी डॉ. अभय बंग यांनी सुरू केलेल्या निर्माण उपक्रमातही सहभागी झालो.  निर्माणच्या प्रशिक्षणात सार्वजनिक आरोग्यासंदर्भात अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यातून प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. त्याचवेळी आमच्यापैकी अनेकांनी एक समस्या, प्रश्न निवडून त्यावर काम करायचं ठरवलं. मी विषय निवडला, मेण्टल हेल्थ अ‍ॅण्ड अ‍ॅडिक्शन्स. मानसिक आरोग्य आणि व्यसनं.  2011ची ही गोष्ट. पुढची प्रवेश परीक्षा तयारी किंवा प्रॅक्टिस असं काही ना करता मी काही काळ प्रत्यक्ष काम करून पाहिलं. विविध आरोग्य प्रकल्पांना भेटी दिल्या, सामाजिक कारणांचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासला. त्यावेळी सामाजिक घटक आणि त्यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यांचा जवळचा संबंध माझ्या लक्षात आला. त्याचवेळी मी ठरवलं की आपण फक्त सायकॅट्रिस्ट व्हायचं नाही तर कम्युनिट सायकॅट्रिस्ट व्हायचं. मात्र तसं काम करायचं तर मला दुर्गम भागात जाणं भाग होतं, मुंबईत काम करणं हा काही पर्यायच नव्हता. सायकॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करायचं होतं, आणि कामही. त्याच शोधात 2013 साली मी आसाममधल्या तेजपूरला गेलो. एलजीबी तेजपूरला भेट दिली. पाहताक्षणी मला आसाम आणि तेजपूर आवडलं.मग मी घरी परत आलो, प्रवेश परीक्षेचा जीवतोड अभ्यास केला. उत्तीर्ण झालो आणि पुढच्यावर्षी एलजीबी आसाम तेजपूरला दाखल झालो. तिथल्या सायकॅट्री विभागाच्या प्रमुख डॉ. अपराजीताना भेटलो आणि आपण फक्त पीजी नाही तर कम्युनिटी वर्कही करणार असल्याचं त्यांना सांगितलं. तिथं सुरुवातीचे काही दिवस अवघड गेले मात्र दुसर्‍यावर्षी मी बंगलोरला निम्हांसा गेलो आणि तिथं काम करण्याचा माझा आत्मविश्वास बळावला.माझं शिक्षण संपल्यावर माझ्याकडे दोन संस्थांच्या ऑफर होत्या. एक म्हणजे द अ‍ॅण्ट आणि दुसरी परिवर्तन. परिवर्तन ही संस्था तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केली. तिचं काम आसाममध्ये चालतं, सध्या डॉ. हमीद दाभोलकर ते काम पाहतात. मी दोन्ही संस्थात काम सुरू  केलं, अ‍ॅण्टमध्ये 20 दिवस आणि 10 दिवस परिवर्तन संस्थेचं काम.माझा ड्रिम जॉबच मला मिळाला होता. मी गावखेडय़ात, लोकांच्या सोबत राहिलो. मानसिक आरोग्याच्या समस्या, लोकांना औषधोपचार न मिळणं किंवा तिथंवर न पोहचता येणं हे सारं जवळून पाहता आलं.  साधी औषधं घेतली तर बरे होतील अशा शेकडो रुग्णांना मी भेटलो. मात्र आजाराविषयी गैरसमज, अंधश्रद्धा, जागृती नसणं, गरिबी, आणि सुविधा नसणं यामुळे हे मानसिक आजार अधिक बळावतात आणि गुंतागुंतीचे होतात असं लक्षात आलं.या भागात गावखेडय़ात जाऊन काम करणारा मी एकटाच सायकॅट्रिस्ट असल्याचं लक्षात आलं. अनेक लोकांनी तर मानसरोग तज्ज्ञ पहिल्यांदाच तिथं पाहिला होता.  गेली अडीच वर्षे मी आता इथं काम करतो आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या 15 जिल्ह्यांत काम सुरू आहे. प्रवास करतो आहे. अनेक तरुण मुलांना प्रशिक्षणही देतो आहे. त्यांच्या मदतीनं अनेकांना जगण्याची उमेद देण्याचा प्रय} करतो आहे.काम आता कुठं सुरू झालं आहे, आता आसाम हे माझं घरच झालं आहे. हा प्रवास अधिक समाधानाचा असेल आणि लोकांना शक्य ती मदत करता येऊ शकेल, अशी आशा मलाही आहेच..

(डॉ. नीलेश आसाममध्ये कार्यरत मनोविकार तज्ज्ञ आहेत.)