शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

ME U & मोबाइल

By admin | Updated: November 27, 2014 22:05 IST

आठवतात ते जुने दिवस.तुमची पहिली ओळख.त्या ओळखीतच

 

 
आठवतात ते जुने दिवस.
तुमची पहिली ओळख.
त्या ओळखीतच 
‘काहीतरी’ खास वाटणं.
हळूच थॅँक्यू म्हणणं.
हे सारं किती सुंदर,
किती अलवार होतं.
<<<<
आणि मग एक दिवस 
आपण ‘तो’ हवाहवासा
मोबाइल नंबर मिळवला
किंवा आपण स्वत:हून 
एक्सचेंज केला.
त्यानंतर आला कहानी में ट्विस्ट!
<<<<
ते नवेनवे दिवस.
ते तासंतास बोलणं,
सतत चॅट करणं.
रात्री झोपताना  
डोक्यावर पांघरुण घेऊन
कुणाला ऐकूही जाणार नाही
इतक्या हळू आवाजात बोलणं.
बोलणंच कशाला,
मिस कॉल सुद्धा महत्त्वाचाच
सकाळी उठताक्षणी एक मिसकॉल
फोन कट केला,
समोर आईबाबा असतील
तर चोरून मिसकॉल,
कुठे पोहचलं की मिसकॉल
आठवण आली तरी मिसकॉल.
फोनवरच काय मिसकॉलवरही
बोलण्याचे फुलपाखरी दिवस
<<<<
पण मग अशा सुंदर
आयुष्यात कसा काय
जातो एकदम आपला 
‘कॉल वेटिंग’वर.
पाच रिंग वाजल्या तरी
उचलला नाहीस म्हणून भांडण.
ना एसएमएसला उत्तर
ना मिसकॉलला रिप्लाय?
<<<<
हे असं ‘कॉल वेटिंग’वर
जात आपलं रिलेशन 
कधी हॅँग झालं,
आठवतंय?
<<<<
आठवत असेल तर लिहा.
गंमत म्हणून,
आपलेच जुने दिवस 
आठवायचे म्हणून
किंवा आपलं नेमकं काय चुकलं
हे गवसायचं म्हणून
किंवा पुन्हा जगायचा 
तो आनंद म्हणून.
आपल्या मोबाइलमुळे 
आपण किती जवळ आलो, 
सदैव जवळ असतो
या भावनेचं सेलिब्रेशन म्हणून.
<<<<
एक मात्र नक्की,
सुरुवातीचं तासंतास बोलणं,
मग मोबाइल का उचलला नाही,
फोनच का केला नाही,
नॉट रिचेबलच का होतास,
कुणाशी बोलत होतीस.
या अशा भांडणांवर 
पोहचतंच अनेकांचं.
आपण काहीतरी महत्त्वाच्या कामात
किंवा अगदी कुणाच्या 
अंतिम संस्काराला गेलेलो
तेव्हा ‘मिस यू’चा 
एसएमएस आल्यावर
तत्क्षणी काय रिअँक्ट करावं 
हेच कळत नाही.
<<<<
हा मोबाइल नाही 
आपल्या गळ्यात बांधलेला 
कासरा आहे,
आणि त्यानं सगळा 
रोमान्सच संपवला 
असं अनेकांना वाटू लागतं.
<<<<
अशाच अवस्थेत जगताय
का तुम्ही?
मोबाइलने आपलं नातं
जमवलं, फुलवलं आणि बिघडवलं.
असं कधी कधी वाटतं तुम्हाला?
नेमकं काय केलं या मोबाइलनं तुमच्या नात्यात. जरा लिहाल.
स्पष्ट आणि अर्थातच मनमोकळं.
मी-यू अँण्ड मोबाइल.
नावाची ही तुमची गोष्ट सांगा.
त्या गोष्टीवर तुमचं नाव लिहा
किंवा नका लिहू.
पण सांगा दोघांच्या नात्यात
तिसरा मोबाईल आल्यानं नेमकं काय झालं.?
<<<<
पत्ता - शेवटच्या पानावर तळाशी
अंतिम मुदत -६ डिसेंबर २0१४
पाकिटावर-टी-व  मोबाईल असा उल्लेख करायला विसरू नका.

--------------------------------------

 

 

- हर्षद देशपांडे, बदलापूर

----------------

.जमलं !

मला वाटायचं की, मी उत्तम मुलाखत देते. मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाची छान उत्तरं देते, पण मी दिसायला चांगली नाही म्हणून माझं सिलेक्शन होत नाही. पण गेले काही महिने मी सतत ऋ1 कॉलम वाचतेय. त्यावरून माझ्या लक्षात आलं की, मी बोलते खूप पण चुकीचं किंवा चुकीच्या पद्धतीनं बोलते. नेमकं आणि तरीही कॉन्फिडण्ट कसं बोलायचं हे मी शिकले. गेल्याच आठवड्यात माझा एका बड्या कंपनीत इंण्टरव्ह्यू झाला आणि मला सेकंड राउण्डला बोलावलंय. जे जमत नव्हतं, ते तुमच्यामुळे जमलं. म्हणून हे शेअर करतेय.

- प्रांजली कुंभार, पुणे