शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:46 IST

तरुण पोरंही डायलागबाजी करतात, ग्राम पंचायतीला शिव्या देत म्हणतात, आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. गावचा काय इकासच झाला नाही; पण तो व्हावा म्हणून तुम्ही काय केलं?

- मिलिंद थत्ते 

आमच्याकडे ग्रामसभा होतच नाय हो. कधी भरते काही कळतच नाही. पण तसंही आपल्याला काय करायचंय ग्रामसभेत जाऊन? तिथे नुसती भांडणं नि राजकारण! ते पंचायतीची मानसं सह्या घेत हिंडतात रजिस्टरवर, घरपोच सेवा म्हना की. आपण ग्रामपंचायतीत जायचं काही कामच पडत नाई बगा..अशी डायलॉगबाजी सगळीकडे ऐकू येते. तरुण पोरंही हेच बोलतात. आणि मग दर पाच वर्षानी ‘आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही’, ‘गावचा काय इकासच झाला नाही’ म्हणत ग्रामपंचायतीला शिव्या देत राहातात. आपणच निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, मग त्यांना नियंत्रितपण आपणच ठेवलं पाहिजे, आपणच नियंत्रित करण्याची असते ती ग्रामपंचायत. तसं केलं नाही तर आपण दिलेल्या शिव्या आरशावर आपटून परत आपल्याच मुस्काटीत बसतात. तेव्हा असंच आरशाशी खेळत राहण्यापेक्षा गावात काही बरं करायचं असेल तर ग्रामपंचायत कायदा थोडा समजून घेतला पाहिजे. फार मोठा नाही हा कायदा फक्त 90 पानांचा आहे, म्हणजे उशाखाली घ्यायला उपयोगाचा नाही. वाचायला फार मोठा नाही. सुरुवातीला कायदा वाचताना झोप येते खरी पण हळूहळू तो समजू लागतो. आपण एपिझोड करून कायदा वाचला तर लई सोपं जातंय. सुरू करूया? ओ, हा कायदा मिळणार कुठे पण? ही घ्या लिंक https://bhasha.maharashtra.gov.in/pdf/RajyaMarathiAdhiniyam/1959-3.pdf  

झाला ना डाउनलोड? प्रत्येक कायद्यात सुरुवातीला कलम ? मध्ये कायद्याचं नाव, कलम 2 मध्ये तो कायदा कुठे लागू असणार, व कलम 3 मध्ये कायद्यातील शब्दांच्या व्याख्या असतात. मग कायदा सुरू होतो. (‘कलम’ आसं कुटं लिवलेलं नस्तं. परिच्छेदाच्या सुरु वातीचा ठळक आकडा म्हंजी कलम)  आत्ता हा कायदा वाचताना आपण थेट उडी मारूया कलम 7 वर. का म्हणजे? तिथे तुमचं नाव लिहिलंय हो! बघा आहे का?1. ग्रामसभेच्या सभा ग्रामसभेच्या सभा निदान चार व्हायला हव्यात, दोन सभांमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त गॅप असता कामा नये, ग्रामसभेची सभा बोलावलीच नाही तर सरपंच व ग्रामसेवकावर कोणती कारवाई होऊ शकते असे सगळे या कलम 7 मध्ये आहे. त्यात अनेक पोटकलमे आहेत. त्यातले (9) बघा - ग्रामसभेतच पुढच्या ग्रामसभेची तारीख-वेळ-ठिकाण ठरवता येते. याचा अर्थ असा की तुम्ही ग्रामस्थ मतदारांनी मिळून मागणी केली तर दर महिन्याला/दर आठवडय़ालासुद्धा ग्रामसभा बसू शकते. आमच्या चळवळीतल्या अनेक गावांत अशा दरमहा ग्रामसभा होतात. त्यांची कामे लटकून राहात नाहीत, चालू कामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारले जातात. कामांच्या गुणवत्तेवर देखरेख राहाते. दुसरा अर्थ 7(9)चा असा की - ग्रामसभेचे ठिकाण व वेळसुद्धा तुम्ही ठरवू शकता. दरवेळी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आफिसातच भरली पाहिजे असं नाही. तुमच्या वस्तीतसुद्धा ग्रामसभा होऊ शकते. तुमच्या सोईच्या वेळी होऊ शकते. पुढच्या पोटकलमात म्हणजे 7(10)मधे आणखी भारी गोष्ट आहे.. पण मीच सगळं कशाला सांगू? बघा की वाचून.

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)