शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:46 IST

तरुण पोरंही डायलागबाजी करतात, ग्राम पंचायतीला शिव्या देत म्हणतात, आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. गावचा काय इकासच झाला नाही; पण तो व्हावा म्हणून तुम्ही काय केलं?

- मिलिंद थत्ते 

आमच्याकडे ग्रामसभा होतच नाय हो. कधी भरते काही कळतच नाही. पण तसंही आपल्याला काय करायचंय ग्रामसभेत जाऊन? तिथे नुसती भांडणं नि राजकारण! ते पंचायतीची मानसं सह्या घेत हिंडतात रजिस्टरवर, घरपोच सेवा म्हना की. आपण ग्रामपंचायतीत जायचं काही कामच पडत नाई बगा..अशी डायलॉगबाजी सगळीकडे ऐकू येते. तरुण पोरंही हेच बोलतात. आणि मग दर पाच वर्षानी ‘आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही’, ‘गावचा काय इकासच झाला नाही’ म्हणत ग्रामपंचायतीला शिव्या देत राहातात. आपणच निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, मग त्यांना नियंत्रितपण आपणच ठेवलं पाहिजे, आपणच नियंत्रित करण्याची असते ती ग्रामपंचायत. तसं केलं नाही तर आपण दिलेल्या शिव्या आरशावर आपटून परत आपल्याच मुस्काटीत बसतात. तेव्हा असंच आरशाशी खेळत राहण्यापेक्षा गावात काही बरं करायचं असेल तर ग्रामपंचायत कायदा थोडा समजून घेतला पाहिजे. फार मोठा नाही हा कायदा फक्त 90 पानांचा आहे, म्हणजे उशाखाली घ्यायला उपयोगाचा नाही. वाचायला फार मोठा नाही. सुरुवातीला कायदा वाचताना झोप येते खरी पण हळूहळू तो समजू लागतो. आपण एपिझोड करून कायदा वाचला तर लई सोपं जातंय. सुरू करूया? ओ, हा कायदा मिळणार कुठे पण? ही घ्या लिंक https://bhasha.maharashtra.gov.in/pdf/RajyaMarathiAdhiniyam/1959-3.pdf  

झाला ना डाउनलोड? प्रत्येक कायद्यात सुरुवातीला कलम ? मध्ये कायद्याचं नाव, कलम 2 मध्ये तो कायदा कुठे लागू असणार, व कलम 3 मध्ये कायद्यातील शब्दांच्या व्याख्या असतात. मग कायदा सुरू होतो. (‘कलम’ आसं कुटं लिवलेलं नस्तं. परिच्छेदाच्या सुरु वातीचा ठळक आकडा म्हंजी कलम)  आत्ता हा कायदा वाचताना आपण थेट उडी मारूया कलम 7 वर. का म्हणजे? तिथे तुमचं नाव लिहिलंय हो! बघा आहे का?1. ग्रामसभेच्या सभा ग्रामसभेच्या सभा निदान चार व्हायला हव्यात, दोन सभांमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त गॅप असता कामा नये, ग्रामसभेची सभा बोलावलीच नाही तर सरपंच व ग्रामसेवकावर कोणती कारवाई होऊ शकते असे सगळे या कलम 7 मध्ये आहे. त्यात अनेक पोटकलमे आहेत. त्यातले (9) बघा - ग्रामसभेतच पुढच्या ग्रामसभेची तारीख-वेळ-ठिकाण ठरवता येते. याचा अर्थ असा की तुम्ही ग्रामस्थ मतदारांनी मिळून मागणी केली तर दर महिन्याला/दर आठवडय़ालासुद्धा ग्रामसभा बसू शकते. आमच्या चळवळीतल्या अनेक गावांत अशा दरमहा ग्रामसभा होतात. त्यांची कामे लटकून राहात नाहीत, चालू कामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारले जातात. कामांच्या गुणवत्तेवर देखरेख राहाते. दुसरा अर्थ 7(9)चा असा की - ग्रामसभेचे ठिकाण व वेळसुद्धा तुम्ही ठरवू शकता. दरवेळी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आफिसातच भरली पाहिजे असं नाही. तुमच्या वस्तीतसुद्धा ग्रामसभा होऊ शकते. तुमच्या सोईच्या वेळी होऊ शकते. पुढच्या पोटकलमात म्हणजे 7(10)मधे आणखी भारी गोष्ट आहे.. पण मीच सगळं कशाला सांगू? बघा की वाचून.

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)