शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:00 IST

प्रेम आपल्या समाजात आजही गुन्हाच आहे. प्रेमाच्या नावावर गळे चिरले जातातच; मात्र त्यापलीकडे प्रेमाचे वैरी आपणच पोसतोय, त्यांचं काय?

ठळक मुद्देअ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा. 1) बिझी, यू नो!

- अंकुश जोशी

व्हॅलेन्टाइन्स वीक सुरू झाला.बाजारपेठा सजतील, लालचुटुक फुगे, हॉटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारं सुरू होईल.हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडीओ पाहून भीती वाटतेच. आजही खेडय़ापाडय़ातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे प्रेमात आडवं येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्त्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतर्‍च ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहेच. मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो. ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.अ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा.

1) बिझी, यू नो!प्रेमात पडतात. पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. फोनवर बोललं की भांडणंच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यातून गैरसमज, भांडणं. ते काही संपत नाही.

2) पझेसिव्हत्यानं/ तिनं कुणा मित्र-मैत्रिणींशी बोलूच नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात. त्यातून पझेसिव्हनेस भयंकर त्रास देतो.

3) सोशल मीडियासोशल मीडिया खरंच शत्रू होतो प्रेमाचा. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं, कुणाला लाइक केलं, कुणाला नाही यावरुन वाद. त्यानं सगळंच बिघडतं.

4) अति बोलणंखाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहाणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की हे सतत शेअर करणंच समस्या बनलं आहे.

5) स्पेसची मागणीपूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम आता नसतेच, सतत स्पेसची मागणी. त्यातून कोण कुणाची स्पेस घालवतं, कोण नाही यावरून प्रेमाचा पार चुराडा होतो.