शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:00 IST

प्रेम आपल्या समाजात आजही गुन्हाच आहे. प्रेमाच्या नावावर गळे चिरले जातातच; मात्र त्यापलीकडे प्रेमाचे वैरी आपणच पोसतोय, त्यांचं काय?

ठळक मुद्देअ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा. 1) बिझी, यू नो!

- अंकुश जोशी

व्हॅलेन्टाइन्स वीक सुरू झाला.बाजारपेठा सजतील, लालचुटुक फुगे, हॉटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारं सुरू होईल.हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडीओ पाहून भीती वाटतेच. आजही खेडय़ापाडय़ातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे प्रेमात आडवं येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्त्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतर्‍च ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहेच. मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो. ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.अ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा.

1) बिझी, यू नो!प्रेमात पडतात. पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. फोनवर बोललं की भांडणंच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यातून गैरसमज, भांडणं. ते काही संपत नाही.

2) पझेसिव्हत्यानं/ तिनं कुणा मित्र-मैत्रिणींशी बोलूच नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात. त्यातून पझेसिव्हनेस भयंकर त्रास देतो.

3) सोशल मीडियासोशल मीडिया खरंच शत्रू होतो प्रेमाचा. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं, कुणाला लाइक केलं, कुणाला नाही यावरुन वाद. त्यानं सगळंच बिघडतं.

4) अति बोलणंखाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहाणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की हे सतत शेअर करणंच समस्या बनलं आहे.

5) स्पेसची मागणीपूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम आता नसतेच, सतत स्पेसची मागणी. त्यातून कोण कुणाची स्पेस घालवतं, कोण नाही यावरून प्रेमाचा पार चुराडा होतो.