शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

प्रेमापायी तरुण मुलं थेट सुसाइड करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 07:00 IST

प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण..

ठळक मुद्देप्रेमातलं नैराश्य आणि त्यापायी घरच्यांचा होणारा जाच तरुण मुलांच्या गळ्याला भयंकर काच लावतो !

- डॉ.धरव शाह

प्रेमातलं नैराश्य तरुण मुलामुलींमध्ये सर्रास दिसतं याची साधारण दोन कारणं दिसतात.एक म्हणजे आता शाळा-कॉलेममधलं शिक्षण दीर्घकाळ चालतं. तरुण मुलं वयात येतात, त्यांना परस्परांविषयी निसर्गतर्‍ आकर्षण वाटतं हे सारं अगदी सहज आहे, निसर्गसुलभ आहे. त्यात ते एकत्रित वेळही मोठय़ा प्रमाणात घालवतात. मात्र हे सारं एकीकडे असताना लग्न  व्हायला बराच वेळ लागतो. बर्‍याच उशिरानं लग्न  होतात किंवा लग्नचा विचार केला जातो, कारण शिक्षण-नोकरी, स्थैर्य हे सारं बराच काळानं घडतं.मात्र तोर्पयत अनेकजण प्रेमात पडतात. खरोखर प्रेमात पडतात, ते प्रेम अत्यंत खरं आणि परस्परांना स्वीकारणारं असतं.असं समजा की, कुणाचा लग्न नंतर घटस्फोट झाला किंवा पतीपत्नीपैकी कुणी दगावलं तर तेव्हा होणारं दुर्‍ख हे अवतीभोवतीच्या माणसांना किंवा समाजालाही समजतं. त्यापायी सहानुभूती वाटते.मात्र प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते.मात्र त्यावेळी या मुलांना असणारी सहानुभूती, साथ किंवा त्यांच्या दुर्‍खाची जाणीव आजूबाजूच्यांना असतेच असं नाही. दुसरं म्हणजे वय, पैसा, जातपात, आयुष्यातलं स्थैर्य यासार्‍याचा टिपिकल लगA जुळवताना करतात तसा प्रॅक्टिकल विचार न करता ही मुलं प्रेमात पडलेली असतात, त्यामुळे त्या प्रेमभंगाचं दुर्‍ख त्यांना भयंकर नैराश्य देतं. आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास, कमिटमेण्ट तुटल्याचा किंवा तोडल्याचा त्रास, आपल्याला आपलं प्रेम न मिळाल्याचा त्रास हा लग्न नंतर होणार्‍या विभक्तीसारखाच भयंकर असतो किंवा कदाचित त्याहून जास्त कष्टप्रद असतो. आणि त्यावेळी या मुलामुलींची काय घुसमट होते, हे इतरांना कळत नाही. अनेकदा आपली घुसमट या मुलांनाही व्यक्त करता येत नाही आणि ते हरवत जातात स्वतर्‍ला.हे सारं होताना अजून घरातले काही घटक कारणीभूत असतात. आपल्याकडे अजूनही लग्न  करताना आईवडील आणि समाज यांची मंजुरी तरुण मुलामुलींना आवश्यक वाटते नव्हे, त्या मंजुरीवरच निर्णय ठरतात. मुलंमुली प्रेमात असतात आणि आईवडिलांचा आंतरजातीय लग्न ला विरोध असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लग्न  केलं तर ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या आईवडिलांशी कृतघAपणा करावा लागेल असं तरुणांना वाटतं, समाजाची भीती असते. दुसरीकडे आपलं प्रेम, त्यातली कमिटमेण्ट यांचं काय असाही प्रश्न असतो. त्यातून ते एका विचित्र पेचात सापडतात.खरं तर वय वर्षे 25-30 किंवा सज्ञान तरुणांनी कुणाशी लग्न  करावं हा परदेशात घरच्यांच्या निवडीचा प्रश्नच नसतो. प्रगतिशील समाजात हे निर्णय सर्वस्वी तरुणच घेतात. आपल्याकडे हा निर्णय सर्वस्वी पालक घेतात. मुलांचा निर्णय पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतो. पालक अनेकदा मुलांचा निर्णय चुकीचा ठरवतात. आणि मग तिथं संघर्ष होतो किंवा मनाविरुद्ध नातं तोडावं किंवा जोडावं लागतं.त्यापायी होणारी तरुण मुलांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाचं भय हे सारं अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.आता आपल्या समाजात एक बदल दिसतो आहे की, निदान मुलांच्या शिक्षणाच्या निर्णयात तरी आईवडिलांनी डोकं घालणं बंद केलं आहे. तेच लगAाच्या बाबतीत झालं तरी काही गोष्टी सोप्या होतील. हे मान्य आहे की, सर्वच गोष्टी मुलांच्या संदर्भात सारख्या नसतात, परिस्थिती वेगळी असते मात्र तरीही पालकांनी मुलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्यांचं नैराश्यात जाणं टळेल, त्यांची घुसमट थांबेल आणि नैराश्यातून मृत्यूच्या टोकार्पयत जाणं किंवा कुढत बसणं तरी थांबेल.यासगळ्याहून वेगळं अजून एक कारण तरुण मुलांच्या प्रेमाच्या कल्पना घडवतं आणि बिघडवतं ते म्हणजे आपले सिनेमे. आयुष्यात प्रेम फार महत्त्वाचं, ते मिळालं नाही तर आयुष्य व्यर्थ असंच सिनेमे सांगतात. जमाना छोड दुंगा तेरे लिए म्हणतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर संपलंच सगळं असंच तरुणांना वाटतं. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलांसमोर बाकी काही ध्येय नाहीत, आयुष्यात काय करायचं हे ठरत नाही. प्रेमात पडलं की ही एकमेव गोष्ट महत्त्वाची वाटते. कॉलेजात मुलं कविता करतात त्यातही बहुसंख्य कविता प्रेमाच्याच असतात.आयुष्य म्हणजे अनेक गोष्टींचा समतोल असतो, बॅलन्स असतो हेच अनेकांना कळत नाही. जगण्याचे अनेक सुंदर घटक आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, हे तरुणांर्पयत पोहचत नाहीत. आजच्या काळात ब्रेकअप ही कॉमन गोष्ट आहे. त्यानं त्रास होईल; पण त्यापलीकडे आयुष्यच नाही, असं वाटून घेता कामा नये, ते पचवून पुढं जात राहायला हवं, हे तरुणांनी स्वतर्‍लाही समजवायला हवं.घुसमट थांबवून मनमोकळं जगायला हवं.

(लेखक तरुण मुलांसाठी मानसोपचारांविषयक जगजागृती करणारे मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम