शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

प्रेमापायी तरुण मुलं थेट सुसाइड करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 07:00 IST

प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण..

ठळक मुद्देप्रेमातलं नैराश्य आणि त्यापायी घरच्यांचा होणारा जाच तरुण मुलांच्या गळ्याला भयंकर काच लावतो !

- डॉ.धरव शाह

प्रेमातलं नैराश्य तरुण मुलामुलींमध्ये सर्रास दिसतं याची साधारण दोन कारणं दिसतात.एक म्हणजे आता शाळा-कॉलेममधलं शिक्षण दीर्घकाळ चालतं. तरुण मुलं वयात येतात, त्यांना परस्परांविषयी निसर्गतर्‍ आकर्षण वाटतं हे सारं अगदी सहज आहे, निसर्गसुलभ आहे. त्यात ते एकत्रित वेळही मोठय़ा प्रमाणात घालवतात. मात्र हे सारं एकीकडे असताना लग्न  व्हायला बराच वेळ लागतो. बर्‍याच उशिरानं लग्न  होतात किंवा लग्नचा विचार केला जातो, कारण शिक्षण-नोकरी, स्थैर्य हे सारं बराच काळानं घडतं.मात्र तोर्पयत अनेकजण प्रेमात पडतात. खरोखर प्रेमात पडतात, ते प्रेम अत्यंत खरं आणि परस्परांना स्वीकारणारं असतं.असं समजा की, कुणाचा लग्न नंतर घटस्फोट झाला किंवा पतीपत्नीपैकी कुणी दगावलं तर तेव्हा होणारं दुर्‍ख हे अवतीभोवतीच्या माणसांना किंवा समाजालाही समजतं. त्यापायी सहानुभूती वाटते.मात्र प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते.मात्र त्यावेळी या मुलांना असणारी सहानुभूती, साथ किंवा त्यांच्या दुर्‍खाची जाणीव आजूबाजूच्यांना असतेच असं नाही. दुसरं म्हणजे वय, पैसा, जातपात, आयुष्यातलं स्थैर्य यासार्‍याचा टिपिकल लगA जुळवताना करतात तसा प्रॅक्टिकल विचार न करता ही मुलं प्रेमात पडलेली असतात, त्यामुळे त्या प्रेमभंगाचं दुर्‍ख त्यांना भयंकर नैराश्य देतं. आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास, कमिटमेण्ट तुटल्याचा किंवा तोडल्याचा त्रास, आपल्याला आपलं प्रेम न मिळाल्याचा त्रास हा लग्न नंतर होणार्‍या विभक्तीसारखाच भयंकर असतो किंवा कदाचित त्याहून जास्त कष्टप्रद असतो. आणि त्यावेळी या मुलामुलींची काय घुसमट होते, हे इतरांना कळत नाही. अनेकदा आपली घुसमट या मुलांनाही व्यक्त करता येत नाही आणि ते हरवत जातात स्वतर्‍ला.हे सारं होताना अजून घरातले काही घटक कारणीभूत असतात. आपल्याकडे अजूनही लग्न  करताना आईवडील आणि समाज यांची मंजुरी तरुण मुलामुलींना आवश्यक वाटते नव्हे, त्या मंजुरीवरच निर्णय ठरतात. मुलंमुली प्रेमात असतात आणि आईवडिलांचा आंतरजातीय लग्न ला विरोध असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लग्न  केलं तर ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या आईवडिलांशी कृतघAपणा करावा लागेल असं तरुणांना वाटतं, समाजाची भीती असते. दुसरीकडे आपलं प्रेम, त्यातली कमिटमेण्ट यांचं काय असाही प्रश्न असतो. त्यातून ते एका विचित्र पेचात सापडतात.खरं तर वय वर्षे 25-30 किंवा सज्ञान तरुणांनी कुणाशी लग्न  करावं हा परदेशात घरच्यांच्या निवडीचा प्रश्नच नसतो. प्रगतिशील समाजात हे निर्णय सर्वस्वी तरुणच घेतात. आपल्याकडे हा निर्णय सर्वस्वी पालक घेतात. मुलांचा निर्णय पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतो. पालक अनेकदा मुलांचा निर्णय चुकीचा ठरवतात. आणि मग तिथं संघर्ष होतो किंवा मनाविरुद्ध नातं तोडावं किंवा जोडावं लागतं.त्यापायी होणारी तरुण मुलांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाचं भय हे सारं अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.आता आपल्या समाजात एक बदल दिसतो आहे की, निदान मुलांच्या शिक्षणाच्या निर्णयात तरी आईवडिलांनी डोकं घालणं बंद केलं आहे. तेच लगAाच्या बाबतीत झालं तरी काही गोष्टी सोप्या होतील. हे मान्य आहे की, सर्वच गोष्टी मुलांच्या संदर्भात सारख्या नसतात, परिस्थिती वेगळी असते मात्र तरीही पालकांनी मुलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्यांचं नैराश्यात जाणं टळेल, त्यांची घुसमट थांबेल आणि नैराश्यातून मृत्यूच्या टोकार्पयत जाणं किंवा कुढत बसणं तरी थांबेल.यासगळ्याहून वेगळं अजून एक कारण तरुण मुलांच्या प्रेमाच्या कल्पना घडवतं आणि बिघडवतं ते म्हणजे आपले सिनेमे. आयुष्यात प्रेम फार महत्त्वाचं, ते मिळालं नाही तर आयुष्य व्यर्थ असंच सिनेमे सांगतात. जमाना छोड दुंगा तेरे लिए म्हणतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर संपलंच सगळं असंच तरुणांना वाटतं. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलांसमोर बाकी काही ध्येय नाहीत, आयुष्यात काय करायचं हे ठरत नाही. प्रेमात पडलं की ही एकमेव गोष्ट महत्त्वाची वाटते. कॉलेजात मुलं कविता करतात त्यातही बहुसंख्य कविता प्रेमाच्याच असतात.आयुष्य म्हणजे अनेक गोष्टींचा समतोल असतो, बॅलन्स असतो हेच अनेकांना कळत नाही. जगण्याचे अनेक सुंदर घटक आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, हे तरुणांर्पयत पोहचत नाहीत. आजच्या काळात ब्रेकअप ही कॉमन गोष्ट आहे. त्यानं त्रास होईल; पण त्यापलीकडे आयुष्यच नाही, असं वाटून घेता कामा नये, ते पचवून पुढं जात राहायला हवं, हे तरुणांनी स्वतर्‍लाही समजवायला हवं.घुसमट थांबवून मनमोकळं जगायला हवं.

(लेखक तरुण मुलांसाठी मानसोपचारांविषयक जगजागृती करणारे मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम