शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

प्रेमापायी तरुण मुलं थेट सुसाइड करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 07:00 IST

प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण..

ठळक मुद्देप्रेमातलं नैराश्य आणि त्यापायी घरच्यांचा होणारा जाच तरुण मुलांच्या गळ्याला भयंकर काच लावतो !

- डॉ.धरव शाह

प्रेमातलं नैराश्य तरुण मुलामुलींमध्ये सर्रास दिसतं याची साधारण दोन कारणं दिसतात.एक म्हणजे आता शाळा-कॉलेममधलं शिक्षण दीर्घकाळ चालतं. तरुण मुलं वयात येतात, त्यांना परस्परांविषयी निसर्गतर्‍ आकर्षण वाटतं हे सारं अगदी सहज आहे, निसर्गसुलभ आहे. त्यात ते एकत्रित वेळही मोठय़ा प्रमाणात घालवतात. मात्र हे सारं एकीकडे असताना लग्न  व्हायला बराच वेळ लागतो. बर्‍याच उशिरानं लग्न  होतात किंवा लग्नचा विचार केला जातो, कारण शिक्षण-नोकरी, स्थैर्य हे सारं बराच काळानं घडतं.मात्र तोर्पयत अनेकजण प्रेमात पडतात. खरोखर प्रेमात पडतात, ते प्रेम अत्यंत खरं आणि परस्परांना स्वीकारणारं असतं.असं समजा की, कुणाचा लग्न नंतर घटस्फोट झाला किंवा पतीपत्नीपैकी कुणी दगावलं तर तेव्हा होणारं दुर्‍ख हे अवतीभोवतीच्या माणसांना किंवा समाजालाही समजतं. त्यापायी सहानुभूती वाटते.मात्र प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते.मात्र त्यावेळी या मुलांना असणारी सहानुभूती, साथ किंवा त्यांच्या दुर्‍खाची जाणीव आजूबाजूच्यांना असतेच असं नाही. दुसरं म्हणजे वय, पैसा, जातपात, आयुष्यातलं स्थैर्य यासार्‍याचा टिपिकल लगA जुळवताना करतात तसा प्रॅक्टिकल विचार न करता ही मुलं प्रेमात पडलेली असतात, त्यामुळे त्या प्रेमभंगाचं दुर्‍ख त्यांना भयंकर नैराश्य देतं. आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास, कमिटमेण्ट तुटल्याचा किंवा तोडल्याचा त्रास, आपल्याला आपलं प्रेम न मिळाल्याचा त्रास हा लग्न नंतर होणार्‍या विभक्तीसारखाच भयंकर असतो किंवा कदाचित त्याहून जास्त कष्टप्रद असतो. आणि त्यावेळी या मुलामुलींची काय घुसमट होते, हे इतरांना कळत नाही. अनेकदा आपली घुसमट या मुलांनाही व्यक्त करता येत नाही आणि ते हरवत जातात स्वतर्‍ला.हे सारं होताना अजून घरातले काही घटक कारणीभूत असतात. आपल्याकडे अजूनही लग्न  करताना आईवडील आणि समाज यांची मंजुरी तरुण मुलामुलींना आवश्यक वाटते नव्हे, त्या मंजुरीवरच निर्णय ठरतात. मुलंमुली प्रेमात असतात आणि आईवडिलांचा आंतरजातीय लग्न ला विरोध असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लग्न  केलं तर ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या आईवडिलांशी कृतघAपणा करावा लागेल असं तरुणांना वाटतं, समाजाची भीती असते. दुसरीकडे आपलं प्रेम, त्यातली कमिटमेण्ट यांचं काय असाही प्रश्न असतो. त्यातून ते एका विचित्र पेचात सापडतात.खरं तर वय वर्षे 25-30 किंवा सज्ञान तरुणांनी कुणाशी लग्न  करावं हा परदेशात घरच्यांच्या निवडीचा प्रश्नच नसतो. प्रगतिशील समाजात हे निर्णय सर्वस्वी तरुणच घेतात. आपल्याकडे हा निर्णय सर्वस्वी पालक घेतात. मुलांचा निर्णय पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतो. पालक अनेकदा मुलांचा निर्णय चुकीचा ठरवतात. आणि मग तिथं संघर्ष होतो किंवा मनाविरुद्ध नातं तोडावं किंवा जोडावं लागतं.त्यापायी होणारी तरुण मुलांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाचं भय हे सारं अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.आता आपल्या समाजात एक बदल दिसतो आहे की, निदान मुलांच्या शिक्षणाच्या निर्णयात तरी आईवडिलांनी डोकं घालणं बंद केलं आहे. तेच लगAाच्या बाबतीत झालं तरी काही गोष्टी सोप्या होतील. हे मान्य आहे की, सर्वच गोष्टी मुलांच्या संदर्भात सारख्या नसतात, परिस्थिती वेगळी असते मात्र तरीही पालकांनी मुलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्यांचं नैराश्यात जाणं टळेल, त्यांची घुसमट थांबेल आणि नैराश्यातून मृत्यूच्या टोकार्पयत जाणं किंवा कुढत बसणं तरी थांबेल.यासगळ्याहून वेगळं अजून एक कारण तरुण मुलांच्या प्रेमाच्या कल्पना घडवतं आणि बिघडवतं ते म्हणजे आपले सिनेमे. आयुष्यात प्रेम फार महत्त्वाचं, ते मिळालं नाही तर आयुष्य व्यर्थ असंच सिनेमे सांगतात. जमाना छोड दुंगा तेरे लिए म्हणतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर संपलंच सगळं असंच तरुणांना वाटतं. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलांसमोर बाकी काही ध्येय नाहीत, आयुष्यात काय करायचं हे ठरत नाही. प्रेमात पडलं की ही एकमेव गोष्ट महत्त्वाची वाटते. कॉलेजात मुलं कविता करतात त्यातही बहुसंख्य कविता प्रेमाच्याच असतात.आयुष्य म्हणजे अनेक गोष्टींचा समतोल असतो, बॅलन्स असतो हेच अनेकांना कळत नाही. जगण्याचे अनेक सुंदर घटक आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, हे तरुणांर्पयत पोहचत नाहीत. आजच्या काळात ब्रेकअप ही कॉमन गोष्ट आहे. त्यानं त्रास होईल; पण त्यापलीकडे आयुष्यच नाही, असं वाटून घेता कामा नये, ते पचवून पुढं जात राहायला हवं, हे तरुणांनी स्वतर्‍लाही समजवायला हवं.घुसमट थांबवून मनमोकळं जगायला हवं.

(लेखक तरुण मुलांसाठी मानसोपचारांविषयक जगजागृती करणारे मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम