शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमापायी तरुण मुलं थेट सुसाइड करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 07:00 IST

प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण..

ठळक मुद्देप्रेमातलं नैराश्य आणि त्यापायी घरच्यांचा होणारा जाच तरुण मुलांच्या गळ्याला भयंकर काच लावतो !

- डॉ.धरव शाह

प्रेमातलं नैराश्य तरुण मुलामुलींमध्ये सर्रास दिसतं याची साधारण दोन कारणं दिसतात.एक म्हणजे आता शाळा-कॉलेममधलं शिक्षण दीर्घकाळ चालतं. तरुण मुलं वयात येतात, त्यांना परस्परांविषयी निसर्गतर्‍ आकर्षण वाटतं हे सारं अगदी सहज आहे, निसर्गसुलभ आहे. त्यात ते एकत्रित वेळही मोठय़ा प्रमाणात घालवतात. मात्र हे सारं एकीकडे असताना लग्न  व्हायला बराच वेळ लागतो. बर्‍याच उशिरानं लग्न  होतात किंवा लग्नचा विचार केला जातो, कारण शिक्षण-नोकरी, स्थैर्य हे सारं बराच काळानं घडतं.मात्र तोर्पयत अनेकजण प्रेमात पडतात. खरोखर प्रेमात पडतात, ते प्रेम अत्यंत खरं आणि परस्परांना स्वीकारणारं असतं.असं समजा की, कुणाचा लग्न नंतर घटस्फोट झाला किंवा पतीपत्नीपैकी कुणी दगावलं तर तेव्हा होणारं दुर्‍ख हे अवतीभोवतीच्या माणसांना किंवा समाजालाही समजतं. त्यापायी सहानुभूती वाटते.मात्र प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते.मात्र त्यावेळी या मुलांना असणारी सहानुभूती, साथ किंवा त्यांच्या दुर्‍खाची जाणीव आजूबाजूच्यांना असतेच असं नाही. दुसरं म्हणजे वय, पैसा, जातपात, आयुष्यातलं स्थैर्य यासार्‍याचा टिपिकल लगA जुळवताना करतात तसा प्रॅक्टिकल विचार न करता ही मुलं प्रेमात पडलेली असतात, त्यामुळे त्या प्रेमभंगाचं दुर्‍ख त्यांना भयंकर नैराश्य देतं. आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास, कमिटमेण्ट तुटल्याचा किंवा तोडल्याचा त्रास, आपल्याला आपलं प्रेम न मिळाल्याचा त्रास हा लग्न नंतर होणार्‍या विभक्तीसारखाच भयंकर असतो किंवा कदाचित त्याहून जास्त कष्टप्रद असतो. आणि त्यावेळी या मुलामुलींची काय घुसमट होते, हे इतरांना कळत नाही. अनेकदा आपली घुसमट या मुलांनाही व्यक्त करता येत नाही आणि ते हरवत जातात स्वतर्‍ला.हे सारं होताना अजून घरातले काही घटक कारणीभूत असतात. आपल्याकडे अजूनही लग्न  करताना आईवडील आणि समाज यांची मंजुरी तरुण मुलामुलींना आवश्यक वाटते नव्हे, त्या मंजुरीवरच निर्णय ठरतात. मुलंमुली प्रेमात असतात आणि आईवडिलांचा आंतरजातीय लग्न ला विरोध असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लग्न  केलं तर ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या आईवडिलांशी कृतघAपणा करावा लागेल असं तरुणांना वाटतं, समाजाची भीती असते. दुसरीकडे आपलं प्रेम, त्यातली कमिटमेण्ट यांचं काय असाही प्रश्न असतो. त्यातून ते एका विचित्र पेचात सापडतात.खरं तर वय वर्षे 25-30 किंवा सज्ञान तरुणांनी कुणाशी लग्न  करावं हा परदेशात घरच्यांच्या निवडीचा प्रश्नच नसतो. प्रगतिशील समाजात हे निर्णय सर्वस्वी तरुणच घेतात. आपल्याकडे हा निर्णय सर्वस्वी पालक घेतात. मुलांचा निर्णय पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतो. पालक अनेकदा मुलांचा निर्णय चुकीचा ठरवतात. आणि मग तिथं संघर्ष होतो किंवा मनाविरुद्ध नातं तोडावं किंवा जोडावं लागतं.त्यापायी होणारी तरुण मुलांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाचं भय हे सारं अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.आता आपल्या समाजात एक बदल दिसतो आहे की, निदान मुलांच्या शिक्षणाच्या निर्णयात तरी आईवडिलांनी डोकं घालणं बंद केलं आहे. तेच लगAाच्या बाबतीत झालं तरी काही गोष्टी सोप्या होतील. हे मान्य आहे की, सर्वच गोष्टी मुलांच्या संदर्भात सारख्या नसतात, परिस्थिती वेगळी असते मात्र तरीही पालकांनी मुलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्यांचं नैराश्यात जाणं टळेल, त्यांची घुसमट थांबेल आणि नैराश्यातून मृत्यूच्या टोकार्पयत जाणं किंवा कुढत बसणं तरी थांबेल.यासगळ्याहून वेगळं अजून एक कारण तरुण मुलांच्या प्रेमाच्या कल्पना घडवतं आणि बिघडवतं ते म्हणजे आपले सिनेमे. आयुष्यात प्रेम फार महत्त्वाचं, ते मिळालं नाही तर आयुष्य व्यर्थ असंच सिनेमे सांगतात. जमाना छोड दुंगा तेरे लिए म्हणतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर संपलंच सगळं असंच तरुणांना वाटतं. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलांसमोर बाकी काही ध्येय नाहीत, आयुष्यात काय करायचं हे ठरत नाही. प्रेमात पडलं की ही एकमेव गोष्ट महत्त्वाची वाटते. कॉलेजात मुलं कविता करतात त्यातही बहुसंख्य कविता प्रेमाच्याच असतात.आयुष्य म्हणजे अनेक गोष्टींचा समतोल असतो, बॅलन्स असतो हेच अनेकांना कळत नाही. जगण्याचे अनेक सुंदर घटक आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, हे तरुणांर्पयत पोहचत नाहीत. आजच्या काळात ब्रेकअप ही कॉमन गोष्ट आहे. त्यानं त्रास होईल; पण त्यापलीकडे आयुष्यच नाही, असं वाटून घेता कामा नये, ते पचवून पुढं जात राहायला हवं, हे तरुणांनी स्वतर्‍लाही समजवायला हवं.घुसमट थांबवून मनमोकळं जगायला हवं.

(लेखक तरुण मुलांसाठी मानसोपचारांविषयक जगजागृती करणारे मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम