शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

प्रेम = स्ट्रेस! हा कुठला प्रेमाचा नवाच घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 07:00 IST

प्रेमात पडणं म्हणजे फक्त सेल्फी काढणं आणि रिलेशनशिप स्टेट्स बदलणं नव्हे, त्यापलीकडे या नात्याचा काही विचारच होत नाही आणि मग प्रेमात पडून स्ट्रेसने जीव नको केलाय असं अनेकजण सांगतात. त्यांचं खरंच असतं एकमेकांवर प्रेम? की नुस्ता प्रेमाचा आभास? त्यांना नेमका स्ट्रेस कशाचा येतो?

ठळक मुद्देप्यार का इमोशल लोचा हे कोणतं नवीन समीकरण जुळवतंय?

प्राची पाठक    

माझं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहिलं नाही?- तू माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोस. माझ्या डीपीला भारी म्हटलं नाही?तुला माझं काहीच आवडेनासं झालंय. तुझ्या डोक्यात वेगळं काही सुरू असेल, लक्षात येतंय मला.मी मेजेस केला की ते ब्लू टिकमार्क अलीकडे खूप उशिराने दिसतात. माझे मेसेजेस तू चटकन वाचत नाहीस. आधीसारखी उत्तरं देत नाहीस.. मला सध्या जास्त पॅकेज नाही जॉबमध्ये, म्हणून तू असं वागत आहेस.मी सांगितलेला ड्रेस मुद्दाम घालत नाहीस तू, कळतंय मला.     ****ही वाक्यं कोण कुणाला म्हणाली हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे ही वाक्यं अलीकडे सतत बोलली जातात. ‘ऑक्सिजन’साठी लेखमाला लिहीत होते तेव्हा अनेकजण आपल्या प्रेमातल्या ताणतणांबाबत हेच सारं लिहून पाठवायचे. हे ‘असं’ वागणं आहे, माझ्यासाठी वेळच नाही, आम्ही ब्रेकअप करू का वगैरे सल्ले विचारायचे.ते विचारणार्‍यांच्या मनात एक ना अनेक लहानमोठय़ा शंका असतात. आपण ज्याच्या प्रेमात आहोत त्याच्या प्रत्येक कृतीविषयी, वागण्याबद्दल काहीतरी मत तयार झालेलं असतं. या सर्व शंका मनात येतात आणि मग त्यामुळे आधी सुरळीत असलेलं नातं कुरतडायला लागतं असं अनेकजण सांगतात.  आधी सगळं नीट सुरू होतं. हे हे आणि हे अमुक ढमुक घडलं म्हणून सगळं हातातून जात चाललं आहे, अशी फिलिंग मनात येते. माझी किंमत तुला दाखवूनच देईन, असे खेळ मनात सुरू होतात. प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये मला कसं वागवलं, नीट भाव दिला की नाही, नीट वेळ दिला की नाही, यावर मनात आपलीच मतं, नात्यातली असंख्य गणितं, हेवेदावे, शंका- कुशंका यांचं तांडव नृत्य सुरू होतं. ठरवून वेगळं वागणं सुरू होतं. मनात जे सुरू असतं, ते समोर दाखवायचं नाही, नीट मनमोकळं बोलायचं नाही. वरतून, समोरच्याने काय करावं, कसं वागावं याची आपल्या सोयीनुसारची भली मोठी जंत्नीच सतत तयार असणं.हे सारं असं असेल तर त्या नात्यामध्ये तेढ निर्माण होईल नाहीतर काय?आणि त्याचा परिणाम काय होतो?मग येतो तो स्ट्रेस. मला वाटतंय तेच खरं आहे, असं जाणवून देणारी एखादी घटना घडली, तरी आधी एकदम ‘जनम जनम का साथ’ वगैरे वाटलेलं नातं पटरीवरून खाली घसरतं. मग ते घरात गुमसुम वगैरे बसून राहणं, काहीच सुचेनासं होणं, काही करावंसं न वाटणं, झोप उडणं, भूक उडणं सगळं चक्र  आलंच. निमित्त काय असतं, तर माझ्या मेसेजला ब्लू टिक उशिरा आल्या. त्या त्या वेळी ते ते कारण अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय मोठ्ठं असतंसुद्धा. पण नंतर मात्न हे आपल्याच मनात फुगवलेलं कारण असू शकतं कदाचित, अशीही विचारांची गाडी जराशी फिरून यायला हवी. नसेल वेळ मिळाला, वेळ मिळूनही नसेल वेळेत उत्तर द्यायला जमलं, वाट पाहू जरा किंवा चक्क स्पष्ट बोलूनच सॉर्ट आउट करून घेऊ हे सगळं असं सारं बोलणं होतंच नाही. बोलणं झालं तर डायरेक्ट आरोप आणि भांडणंच. कारणं नाहीच डायरेक्ट निकालच.आणि त्यामुळे होतं काय की मनातला कडवटपणा वेगाने वाढत जातो. त्यात आणखीन आपल्याच मनात ठाण मांडून बसलेल्या शंका-कुशंका- दुसर्‍याकडूनच्या अपेक्षा आणि स्वतर्‍चं ते सर्व बरोबरच आहे, असं ठामपणे वाटणं. फारच केमिकल लोचा होऊन जातो हा! त्यामुळे प्रेमप्रकरण असो नाहीतर प्रेमभंग काही गोष्टींची उत्तरं आपण आपल्याला द्यायला हवी. म्हणजे अतिरेकी घुसमट आणि अतिरेकी स्ट्रेस हे टाळता येऊ शकेल.या मुद्दय़ांचा नीट विचार केला, तर नात्यांमधला अनावश्यक स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होईल. जरा लार्जर, बिगर आणि  बेटर आयुष्य आपण समजून घेऊ शकू. छोटय़ा छोटय़ा गोष्टी आणि लहान सहान मुद्दे कुरतडण्यापासून जरा दूर जाऊ ! मुळात आपलं एकमेकांसोबत जमतंय ते का याची चांगली स्पष्टता येईल. हा सगळा ‘केमिकल लोचा’ एकमेकांच्या प्रगतीसाठी वापरता येईल !प्रेमानं जगणं समृद्ध करावं ते नैराश्याच्या टोकावर नेणार असेल तर ते प्रेम आहे का?या प्रश्नासह आणखी काही हे प्रश्न स्वतर्‍ला विचारून पहा.* मुळात कोणी आपल्याला कसं आणि का क्लिक होतं याचा तरी नीटसा विचार केलेला असतो का? * अमुक व्यक्ती आपल्याला आवडते, तर का आवडते? आपण तिला आवडतो का? *या आवडीनिवडी पलीकडे आयुष्य बरंच मोठं आहे, तर त्यातले काय काय आपण एकमेकांच्या साथीने एकमेकांसाठी करू शकतो? * आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपल्या सवयी आणि आपल्याला आवडणारी व्यक्ती याबद्दल किती स्पष्टता आहे आपल्या मनात? * आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीच्या साथीने आपण काय-कसं जगणार आहोत, याबद्दल विचार करतो का आपण? * केवळ आता कुणीतरी आवडलं आहे ना कोणी मग आता आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत का? * सिनेमांत दाखवतात तसं तू माझ्याकडे पाहिलं आणि मी तुझ्याकडे पाहिलं, म्हणून प्रेम म्हणायचं का त्या नात्याला? * नेमकी काय आहे आपली प्रेमाची व्याख्या, कधी विचार केलाय? * बरं सगळं व्याख्येत बसलेलं असूनसुद्धा स्ट्रेस का वाटतोय मग? का येतात मनात अनेक शंका-कुशंका? पक्का विश्वास का वाटत नाही समोरच्यावर? प्रत्येक गोष्टीत ‘तो असा असता तर’ आणि ‘ती तशी असती तर’, अशी हातघाईची लढाई का होतेय?* आपलं नातं एक छान बुके का नाही होऊ शकत? एक फूल माझं - एक तुझं असं? म्हणजे प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहेच आणि सोबत येऊनसुद्धा आणखीन काही सुंदर समृद्ध व्हायची शक्यता असलेलं?  विचार तर करा.. 

( लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)