शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्माच्या आधारावर केले जाणारे राजकारण यापुढच्या काळात यशस्वी होईल, असे वाटते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:52 IST

निम्म्याहून अधिक तरुण-तरुणींना वाटते, मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत; राजकारणालाही बदलावेच लागेल. दर 10 मधल्या 2 मुला-मुलींसाठी जातीय/धार्मिक अभिमानाचे रक्षण महत्त्वाचे!!

ठळक मुद्देबदल अपरिहार्यच आहे; पण डोक्यातल्या किचाटाचे काय करणार?

-ऑक्सिजन  टीम जात-धर्म नंतर आधी कामाचं बोला.हे तर तरुण मतदार पुरेशा ठामपणे सांगतात. मतदारांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत आणि यापुढे केवळ जाती-धर्माची कार्ड चालवून मतं मागता येणार नाहीत आणि आम्ही देणारही नाहीत असं हे तरुण मतदार ठणकावतात.रोजच्या जगण्यातल्या समस्या कशा सोडवाल सांगा, असा या तरुण मतदारांचा प्रश्न आहेच.आणि 60 टक्के तरुण मतदार या मताशी सहमत आहेत की, आता मतदारांना जाती-धर्मात विभागता येणार नाही.मात्र उरलेल्या 40 टक्के मतदारांचं काय?म्हणजे 20 टक्के तरुण-तरुणी कानावर हात ठेवतात की, काही सांगता येणार नाही की भविष्यात जाती-धर्माचं राजकारण यशस्वी होईल की नाही.हे असं तळ्यात-मळ्यात करणारे मतदार भविष्यात नक्की कुणाला मतं देतील याचा अंदाज या आकडेवारीहून मांडता येत नाही. ते जात-धर्माच्या राजकारणाच्या बाजूनं झुकतील का?-प्रश्नच आहे.उरलेले वीस टक्के. म्हणजे दर दहात दोघांना वाटतं की, आपल्या राजकीय नेतृत्वानं आपल्या जातीचं आणि धर्माचं रक्षणच करायला हवं.जगण्याच्या रोजच्या समस्यांपेक्षा आपल्या जातीय आणि धार्मिक अस्मिता अधिक महत्त्वाच्या हे या तारुण्याच्या मनात उघड सांगावं इतकं घट्ट नेमकं कशामुळे झालं असेल? याचं तपशीलवार विश्लेषण नंतर करू. मात्र वास्तव हे ‘असं’ आहे.तरुण मनातही असा हा किचाट दिसतोच.विशेष म्हणजे आपल्या जातीचं आणि धर्माचं रक्षण व्हायला हवं असं मुलींना वाटतं, बाकी कुठं नाही तरी मुलींनी या मताशी मुलांशी बरोबरी साधलेली दिसते.व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातलीच आकडेवारी खरी मानणारं, पुस्तकांपासून लांब असलेलं आणि सोशल मीडियात जे येतं ते खरं मानून ढकलपंची करणारं हे तारुण्य आहे का?असा प्रश्नच पडावा.पण तरीही उमेद हीच की सुमारे 60 टक्के तरुण तरी म्हणतात की, जातीपातीचं राजकारण भविष्यात यशस्वी होणार नाही, आमच्या राजकीय नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत.हे समीकरण सोपं नाही. सरळ तर नाहीच नाही!

***

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचंच आहे - 20.62 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत - 56.32 %* नक्की सांगता येणार नाही - 20.91 %

एकूण सहभागींपैकी 2.15 %  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.मुली म्हणतात * अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचेच आहे - 19.75 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत -  56.39 %* नक्की सांगता येणार नाही - 22.23 % एका बाजूला 56 टक्के मुली म्हणतात, की आता मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत, राजकारणालाही त्यानुसार बदलावेच लागेल.पण त्याचवेळी दर 10 मधल्या 2 मुलींना आपली धार्मिक/जातीय अस्मिता महत्त्वाची वाटतेच आहे. बाकी याबाबतीत मुलींनी मुलांशी बरोबरी साधल्याचं आकडेवारी तरी सांगते. मुलगे म्हणतात ..* अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचंच आहे - 21.50 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत -  56.24 %* नक्की सांगता येणार नाही - 19.58 % जातीय आणि धार्मिक अस्मितांच्या लढाया लढायला रस्त्यावरउतरणार्‍या गर्दीतल्या शंभरातल्या नव्याण्णव डोकी मुलांची असली तरी त्या डोक्यांच्या आत विचार मात्र काही वेगळाच असल्याचं चित्र या आकडेवारीतून समोर येते. परिस्थिती बदलते आहे, हे कृतीमध्ये आलं नसलं तरी किमान विचारांच्या पातळीवर तरी मान्य होऊ लागलेलं असावं.*** 

2009- ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स -दहा वर्षात नेमकं काय बदललं?

जात-धर्माचे काच  आज जास्त पक्के??

 * तो सोशल मीडियापूर्व काळ होता. मोबाइलवर आजच्यासारखं नेट नव्हतं आणि व्हॉट्सअ‍ॅपही नव्हतं. त्यामुळे आजच्या इतका माहितीचा धबधबा नव्हता. तेव्हा 70} तरुण म्हणत होते की जाती-धर्माचं राजकारण या देशात यशस्वीच होणार नाही.* आता दहा वर्षानंतर हे प्रमाण 10 टक्केंनी घटलेलं दिसतं. ते का?