शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

त्यांचा स्पर्श हरवतोय पण म्हणून त्यांनी जिद्द सोडलेली नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:45 IST

स्पर्श आणि गंध ही त्यांची ताकद आहे, मात्र शारीरिक दुरीच्या नियमांनी स्पर्शच दूर लोटले त्यामुळे रोजीरोटी ते स्वावलंबन, अगदी बाहेर पडणंही अंध तारुण्यासाठी अवघड झालं आहे.

ठळक मुद्देत्यांच्या अडचणी डोळस लोकांपेक्षा जास्त तीव्र आहेत.

- शाहीन शेख ऑनररी सेक्रेटरी , नॅब

कोरोनाने सगळं जग उलटंपालटं करून टाकलंय. त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि त्याहीपेक्षा बेरोजगारीच्या समुद्रात हजारो लाखो लोक जगभर गटांगळ्या खात आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने हातपाय मारून आपण या बेरोजगारीच्या लाटेत बुडून जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. हातातली नोकरी टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. समजा ही नोकरी गेलीच, तर निदान दुसरी लवकर मिळावी यासाठी नवीन स्किल्स शिकताहेत, ऑनलाइन कोर्सेस करताहेत.या नाही तर दुस:या इंडस्ट्रीत काम मिळेल का? आत्ताइतका नाही; पण निदान त्याच्या जवळपास येणारा तरी पगार मिळेल का, यासाठी लक्ष ठेवून आहेत.  मात्र हे सारं सुरू असताना दुसरीकडे आपल्याच समाजाचाच एक लहान हिस्सा त्याच्या त्याच्या परीने या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या समोरच्या अडचणींचा डोंगर आपल्या शंभर पट तरी मोठा आहे; पण तरीही ही माणसं काठीने रस्त्यातल्या खाचखळग्यांचा अंदाज घेत, कुठेतरी ठेचकाळत, त्यातून उभी राहात पुढे जायचा प्रयत्न करताहेत, कारण त्यांच्यासमोरसुद्धा आपल्यासारखाच दुसरा काहीही पर्याय नाहीये.आणि त्याहून मोठी अडचण अशी आहे की दुसरा काही पर्याय असला तरी त्यांना तो दिसणार नाहीये. कारण त्यांना काहीच दिसत नाही. त्यांना डोळ्यांनी दिसत नाहीये.ज्यांचं संपूर्ण आयुष्य ध्वनी आणि स्पर्श या दोनच संवेदनांवर चालतं, त्यांचं आयुष्य या क्षणी किती कठीण झालं असेल याची इतर माणसं केवळ कल्पना करू शकतात. कोरोनाने त्यांच्या आयुष्यातून त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आधार हिरावून घेतला आहे, तो म्हणजे स्पर्श !आज कोणीही माणूस होता होईल तो दुस:या माणसाला स्पर्श करायचं टाळतो आहे. त्यामागची कारणं अगदी खरी आहेत. पण त्याची मोठी किंमत दृष्टिहीन माणसं मोजत आहेत. कारण आपल्याकडे दृष्टिहीन लोकांना सोईच्या कुठल्याही व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी नाहीत, त्यामुळे त्यांचा सामाजिक वावर हा बहुतांश इतर समाजाच्या चांगुलपणावर अवलंबून आहे. मात्न एरव्ही दृष्टिहीनांशी अत्यंत सहानुभूतीने वागणा:या समाजाने स्वत:च्याही नकळत कोरोनाच्या भीतीने मदतीचा हात आखडता घेतला आहे. परिणामत: दृष्टिहीन लोकांना घराबाहेर पाडण्यासाठी संपूर्णत: त्यांच्या घरातल्या इतर व्यक्तींवर अवलंबून राहायला लागतं आहे. मुळात त्यांचं घराबाहेर पडणंच कमी झालं आहे; पण निदान बँकेची कामं, काही महत्त्वाची खरेदी अशा कामांसाठीसुद्धा त्यांना घरातल्या व्यक्तींवर अवलंबून राहायला लागतं आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी आपला कोणाला तरी त्नास होतोय ही भावना अतिशय त्नासदायक असते. कारण नेमकं  तेच टाळण्यासाठी त्यांची सगळी धडपड चाललेली असते.त्यातही बहुतांश दृष्टिहीन तरुणही त्यांच्या सर्व अडचणींशी दोन हात करून शक्यतो आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी, कामांसाठी इतर कोणावर अवलंबून राहाणं त्यांना नको वाटतं. नेमकं ते स्वावलंबन या कोविड-19ने त्यांच्याकडून हिरावून घेतलेलं आहे.

मात्न असं असलं तरीही दृष्टिहीन तरुणांकडून निराशेचा सूर फार क्वचित ऐकू येतो. जी काही परिस्थिती असेल तिच्याशी अॅडजस्ट करून घेण्याचा ते कायम प्रयत्न करतात. त्यामुळेच याही परिस्थितीशी ते जुळवून घेत आहेत. बहुतेक दृष्टिहीन बाहेर पडताना मास्क तर लावतातच; पण हाताशी सॅनिटायझरपण ठेवतात. कारण काहीही झालं तरी त्यांना अनेक ठिकाणी स्पर्श करावाच लागतो. तो स्पर्श केल्या केल्या हाताला सॅनिटायझर लावायची सवय त्यांनी लावून घेतली आहे. कारण कुठलंही आजारपण येणं हा त्यांच्यासाठी इतरांपेक्षा जास्त मोठा प्रॉब्लेम असतो. आपल्यामुळे आपल्या घरचे आजारी पडू नयेत याबद्दलही ते अत्यंत सजग असतात. त्यामुळेच दृष्टिहीन तरुण सामान्यत: सगळे नियम काटेकोरपणो पाळताना आढळतात.यापलीकडे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी काही दृष्टिहीन लोक एक भारी शक्कल लढवताहेत. त्यांच्याकडे असलेली लाल-पांढरी अंधांची काठी ते स्वत:भोवती मधून मधून गोल फिरवतात. त्यामुळे दोन फायदे होतात. पहिला म्हणजे त्यांच्या जवळ कोणी आलं तर त्यांच्या ते लक्षात येतं. आणि काठी बघून जवळ आलेल्या व्यक्तीला दृष्टिहीन व्यक्ती लक्षात येते.अनेक सुशिक्षित दृष्टिहीन तरुणांनी शोधलेला अजून एक मार्ग म्हणजे ऑनलाइन काम करणं. अनेक ठिकाणी तर तरुणांच्या गाण्यांच्या, कवितांच्या स्पर्धा आता ऑनलाइन रंगल्या आहेत.मात्न या सगळ्यात बेरोजगारीचं संकट त्यांच्यावरही घोंघावतंय. दृष्टिहीन तरुणांच्या बाबतीत ते संकट अजून तीव्र आहे, कारण ते पटकन त्याचं काम बदलू शकत नाही. एखादा डोळस माणूस जर कष्टाचं काम करणारा असेल, तर तो दुकानात सेल्समन असण्यापासून ते शेतात मजुरी करण्यार्पयत कुठलंही काम करू शकतो. मात्न दृष्टिहीन तरुणांचं तसं होत नाही. ते कुठलं काम करू शकतात त्याला मर्यादा असतात. आताही ते कोरोनाकाळात आपली लढाई जिद्दीने लढतच आहेत मात्न त्यांची दोन वेळची स्वाभिमानाची भाकरी त्यांच्याकडून हिरावली जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे..

अंध तरुणांना एवढी मदत करता येईल.

1. शक्यतो त्यांना मालकांनी नोकरीवरून काढू नये. सध्याच्या असुरक्षित काळात त्यांना इतर कुठलं काम करणं कठीण आहे.2. दृष्टिहीन व्यक्ती दिसली तर त्यांना मदत करा. मदत करून झाली की हात सॅनिटाइझ करा. त्यांचा सुखरूप वावर आपल्यावर अवलंबून आहे. यामुळे तो स्पर्श टाळू नका, सुरक्षित खबरदारी मात्र घ्या.3. त्यांच्या अडचणी डोळस लोकांपेक्षा जास्त तीव्र आहेत याचं भान ठेवा.4. वर्कफ्रॉम होममध्ये अंधांना कुठे सामावून घेता येईल का, याचा विचार करा.