शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

एक खत तबियतसे लिखो तो यारों

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:24 IST

रोजच तर भेटतो आपला मित्र रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? लिहायचं काय त्यात?

ठळक मुद्दे ‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज.

-ऑक्सिजन टीम

 

फ्रेण्डशिप डजण्ट हॅपन विथ स्पेशल पीपल, पीपल बिकम स्पेशल आफ्टर बिकमिंग फ्रेण्डस्! - मॉरल?

यू वेअर बॉर्न ऑर्डिनरी, आय मेड यू स्पेशल!

- असा एसएमएस भल्या सकाळी खणखणत येतो. आपण साखरझोपेत. मोबाईल कुठं पडलाय म्हणून वैतागत अवतीभोवती शोधतो. सापडतो एकदाचा

डाव्या-उजव्या हाताला. कसेबसे डोळे चोळत मोबाईलमध्ये नाक खुपसावं तर हा असा एसएमएस. संताप होतो. कशाला सकाळी सकाळी हे असले फॉरवर्ड पीजेछाप मेसेजेस पाठवतात? पण त्या संतापालाही तसा काही अर्थ नाही. कारण या मेसेजमधली गंमत पाठवणार्‍यालाही आवडते आणि वाचणार्‍यालाही. मग पुन्हा फॉरवर्डची साखळी सुरू होते. व्हॉट्सअ‍ॅप शायरीच्या या काळात मैत्रीवर ‘सेंटी’ मेसेजेस खरडणारे काही कमी नाहीत. त्या शायरीतल्या शब्दांना मीटरची तांत्रिक भानगड काही कळत नाही. ती असते हेदेखील अनेकांना माहिती नसतं. मराठी- हिंदी-उर्दू भाषांवर अन्याय होतो ही शायरी करता करता. पण त्याची कोण फिकीर करतंय? हे नव्या युगाचे नवे गुलजार कोण याचा कोणालाही पत्ता नसतो. पण तरी मेसेजेस तयार होत राहतात.

जीएम/जीएन (गुड मॉर्निग आणि गुड नाईट) मेसेसेजच्या नावाखाली असे भावुक संदेश दणादण खपवले जातात की वाचणार्‍याला वाटावे, क्या बात है, खास माझ्यासाठी असं कुणी मनापासून लिहू शकतो!’ - तसं नसतं हे खरं! पण नसलं म्हणून काय झालं? मित्रानं मित्राला पाठवलेला संदेश तर खराच असतो. त्यातल्या भावना तर सच्च्या असतात. आणि अवचित येणारा तो मेसेज चुकून कधी आपल्या डोळ्यात पाणी तरळवून जातो. ती डोळ्यात लकाकणारी चमक सच्चीच असते!

तुम्ही विचाराल, मैत्रीत असं परस्परांना काही सांगण्याची गरज असते का? मेसेज फॉरवर्ड करकरून का कधी मैत्री होते? फुलते? - भावना व्यक्त करणे म्हणजे नात्यात काही तरी घोळच असला पाहिजे असं आपण का मानतो? आपल्या जवळच्या माणसांविषयी जे वाटतं, ते सांगितलंच कधी मोजक्या शब्दातून, कृतीतून किंवा स्पर्शातून तर लगेच नातं उथळ होतं असं मानायचं कारण काय?

‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज. ‘तू मला कधी समजूनच घेत नाही. मला काय म्हणायचं होतं, तुला कधी कळलंच नाही!’ अशा शेरेबाजीतून तर वाद वाढतात. जे नातं निकोप होतं सशक्त व्हायला व्हावं ते अकारण मरगळायला लागतं. कारण, न बोलणं! न सांगणं! त्यातून अनकही कायमच अनसुनी होते आणि अनहोनीला जन्माला घालते. मनातली ही सारी अंतरं चार ओळींच्या मेसेजने साधणार असतील तर काय हा उल्लपणा असं संकुचित वृत्तीनं त्याकडे कशाला बघायचं? दिलखुलासपणे जगताना मनमोकळं बोलायलाही शिकलं तर मैत्रीची वीणा कायम झंकारेल! त्या सुरांतून आपल्या जगण्याला अर्थ येईल! वाईट याचंच की नाहीच करत आपण असं! आपल्याला वाटतं, रोजच तर भेटतो आपला मित्र. रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? समजा, पाठवलाच मेल किंवा केलाच एसएमएस तर तो केवळ कामाचा नाहीतर फॉरवर्ड! पूर्वी लोक परस्परांना पत्र लिहायची, पत्रमैत्रीविषयी तर आपण बरंच काही ऐकलंय. आयुष्यात केवळ एकदाच भेटलेले यांच्यासारखी पत्रमैत्री आजच्या काळात होण्याची कल्पना तरी करवते आपल्याला? कारण कोणाशी काही तरी शांतपणे शेअर करावं, बोलावं, मनातलं सांगावं असं वाटण्याची प्रक्रिया आपल्याही नकळत थांबते. आपण बोलतो, पण त्यात शेअरिंग नाही अशी तक्रारही स्वतर्‍च करतो! आपले हात चुकून कधी नाही चालत की-बोर्डवर. नाहीच घेत आपण पेन हातात पत्र लिहायला. आपली सारी भिस्त या फॉरवर्ड्सवर. आपण अजून फॉरवर्ड्सला कंटाळलो नाही. त्यातला आशय किमान आपल्यार्पयत पोहोचतोय, हे काय कमी आहे?