शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

एक खत तबियतसे लिखो तो यारों

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:24 IST

रोजच तर भेटतो आपला मित्र रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? लिहायचं काय त्यात?

ठळक मुद्दे ‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज.

-ऑक्सिजन टीम

 

फ्रेण्डशिप डजण्ट हॅपन विथ स्पेशल पीपल, पीपल बिकम स्पेशल आफ्टर बिकमिंग फ्रेण्डस्! - मॉरल?

यू वेअर बॉर्न ऑर्डिनरी, आय मेड यू स्पेशल!

- असा एसएमएस भल्या सकाळी खणखणत येतो. आपण साखरझोपेत. मोबाईल कुठं पडलाय म्हणून वैतागत अवतीभोवती शोधतो. सापडतो एकदाचा

डाव्या-उजव्या हाताला. कसेबसे डोळे चोळत मोबाईलमध्ये नाक खुपसावं तर हा असा एसएमएस. संताप होतो. कशाला सकाळी सकाळी हे असले फॉरवर्ड पीजेछाप मेसेजेस पाठवतात? पण त्या संतापालाही तसा काही अर्थ नाही. कारण या मेसेजमधली गंमत पाठवणार्‍यालाही आवडते आणि वाचणार्‍यालाही. मग पुन्हा फॉरवर्डची साखळी सुरू होते. व्हॉट्सअ‍ॅप शायरीच्या या काळात मैत्रीवर ‘सेंटी’ मेसेजेस खरडणारे काही कमी नाहीत. त्या शायरीतल्या शब्दांना मीटरची तांत्रिक भानगड काही कळत नाही. ती असते हेदेखील अनेकांना माहिती नसतं. मराठी- हिंदी-उर्दू भाषांवर अन्याय होतो ही शायरी करता करता. पण त्याची कोण फिकीर करतंय? हे नव्या युगाचे नवे गुलजार कोण याचा कोणालाही पत्ता नसतो. पण तरी मेसेजेस तयार होत राहतात.

जीएम/जीएन (गुड मॉर्निग आणि गुड नाईट) मेसेसेजच्या नावाखाली असे भावुक संदेश दणादण खपवले जातात की वाचणार्‍याला वाटावे, क्या बात है, खास माझ्यासाठी असं कुणी मनापासून लिहू शकतो!’ - तसं नसतं हे खरं! पण नसलं म्हणून काय झालं? मित्रानं मित्राला पाठवलेला संदेश तर खराच असतो. त्यातल्या भावना तर सच्च्या असतात. आणि अवचित येणारा तो मेसेज चुकून कधी आपल्या डोळ्यात पाणी तरळवून जातो. ती डोळ्यात लकाकणारी चमक सच्चीच असते!

तुम्ही विचाराल, मैत्रीत असं परस्परांना काही सांगण्याची गरज असते का? मेसेज फॉरवर्ड करकरून का कधी मैत्री होते? फुलते? - भावना व्यक्त करणे म्हणजे नात्यात काही तरी घोळच असला पाहिजे असं आपण का मानतो? आपल्या जवळच्या माणसांविषयी जे वाटतं, ते सांगितलंच कधी मोजक्या शब्दातून, कृतीतून किंवा स्पर्शातून तर लगेच नातं उथळ होतं असं मानायचं कारण काय?

‘अनकही और अनसुनी’ असा एक सुंदर शब्द आहे. पण मैत्रीतही अनेक गोष्टी ‘अनकही’च राहतात. एक बोलत नाही म्हणून दुसरा ऐकत नाही. त्याला त्या कळतच नाहीत. मग गैरसमज. ‘तू मला कधी समजूनच घेत नाही. मला काय म्हणायचं होतं, तुला कधी कळलंच नाही!’ अशा शेरेबाजीतून तर वाद वाढतात. जे नातं निकोप होतं सशक्त व्हायला व्हावं ते अकारण मरगळायला लागतं. कारण, न बोलणं! न सांगणं! त्यातून अनकही कायमच अनसुनी होते आणि अनहोनीला जन्माला घालते. मनातली ही सारी अंतरं चार ओळींच्या मेसेजने साधणार असतील तर काय हा उल्लपणा असं संकुचित वृत्तीनं त्याकडे कशाला बघायचं? दिलखुलासपणे जगताना मनमोकळं बोलायलाही शिकलं तर मैत्रीची वीणा कायम झंकारेल! त्या सुरांतून आपल्या जगण्याला अर्थ येईल! वाईट याचंच की नाहीच करत आपण असं! आपल्याला वाटतं, रोजच तर भेटतो आपला मित्र. रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? समजा, पाठवलाच मेल किंवा केलाच एसएमएस तर तो केवळ कामाचा नाहीतर फॉरवर्ड! पूर्वी लोक परस्परांना पत्र लिहायची, पत्रमैत्रीविषयी तर आपण बरंच काही ऐकलंय. आयुष्यात केवळ एकदाच भेटलेले यांच्यासारखी पत्रमैत्री आजच्या काळात होण्याची कल्पना तरी करवते आपल्याला? कारण कोणाशी काही तरी शांतपणे शेअर करावं, बोलावं, मनातलं सांगावं असं वाटण्याची प्रक्रिया आपल्याही नकळत थांबते. आपण बोलतो, पण त्यात शेअरिंग नाही अशी तक्रारही स्वतर्‍च करतो! आपले हात चुकून कधी नाही चालत की-बोर्डवर. नाहीच घेत आपण पेन हातात पत्र लिहायला. आपली सारी भिस्त या फॉरवर्ड्सवर. आपण अजून फॉरवर्ड्सला कंटाळलो नाही. त्यातला आशय किमान आपल्यार्पयत पोहोचतोय, हे काय कमी आहे?