शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जरा मन आवरायला घेऊ

By admin | Updated: November 5, 2015 21:38 IST

बोलू मनापासून आपल्या जिवाभावाच्या माणसांशी. एफबी आणि व्हॉट्सअॅपवर उधानउसनवारीच्या स्मायली नकोत. खांद्यावर डोकं ठेवून प्रत्यक्ष बोलू काय ते सांगून मोकळे होऊ.

 

- चिन्मय लेले
बोलू मनापासून 
आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर
उधानउसनवारीच्या स्मायली नकोत.
खांद्यावर डोकं ठेवून प्रत्यक्ष बोलू
काय ते सांगून मोकळे होऊ.
राग-संताप असेल तर तो सांगू.
प्रेम असेल तर तेही सांगू.
पण जरा बोलूच.
एकदा!
ॅकिती तो मनावर ताण?
किती तो वैताग?
खरं तर हाताशी आहे सारं?
शेअरिंग करणं तर फार सोपं!
वाटलं बोलून टाकावं?
सांगावं अगदी मनातलं, 
सलणारं, डाचणारं, रुतणारं नि काचणारं.
कुणालाही.
अगदी ओळखपाळख नसणा:यांनाही.
पण ते सांगून तरी कुठं मोकळं वाटतं?
बोलावंसं आताशा कुठं कुणी भेटतं?
का बरं असं मनातलं अंधारलं आकाश
आपल्यालाच छळतं.
काहूर करत राहतं?
***
तशी आहेतच की 
माणसं आपल्या अवतीभोवती.
किती ग्रुप्स नि किती फ्रेण्ड्स.
किती भावनांची आयती चिन्हं,
किती चेह:यांच्या वेगवेगळ्या भावना.
मग एवढं सारं असूनही
आपण व्यक्त कसे होत नाही.
मनावरचं ओझं उतरवून का ठेवत नाही?
आणि दुस:या कुणाच्या मनावरचा बोजा
आपल्यालाही चुकून कसा जाणवत नाही.
आपलंच आपल्यात असं काय आहे
जे मिट्टं अंधारात चाचपडत ठेवतंय.
छळतंय.
रडवतंय.
आतल्या आत.
***
या दिवाळीत सारं घर 
झाडूनपुसून लख्खं केलं.
माळे काढले.
नकोशा वस्तू काढून टाकल्या.
काहीत रुतल्या होत्या आठवणी.
त्या हातात धरून पाहिल्या.
पण नको आता ही अडगळ, 
काय उपयोग म्हणून सरळ
भंगारमधे दिल्या.
जुने कपडे,
मोडकी भांडी,
तुटक्या खुच्र्या,
विरले पडदे,
फाटके अभ्रे.
नकोत आता असं बजावलंत
ना स्वत:ला.
आणि ते बाहेर काढून 
जरा मोकळी केली जागा.
सांगितलं आणि
नवीन काही घेऊ तेव्हा घेऊ पण
आता जुन्याची अडगळ नको.
पसारा नको.
आणि हा हावरटपणाही नको.
नाही नाही ते जमवण्याचा.
त्यानंतर कसं सारं स्वच्छ,
मोकळं. आणि सुटं झालं.
***
हे असं सारं या दिवाळीत आपल्या
मनाचंही केलं तर?
मनातली अशी अडगळ.
कधीचे सायडिंगला पडलेले माळे.
त्या माळ्यावर टाकून दिलेल्या आठवणी,
त्यातले काच.
संताप.
चिडचिड.
आणि काही मनभर पसरलेला पसारा.
त्यावर बसलेली धूळ
अस्ताव्यस्त भावनांचे तुकडे
नकोशा आठवणी
द्वेष.
असूया.
जिव्हारी लागलेले अपमान.
बदल्याची भावना.
सुडाची आग.
हे सारं आपण काढून टाकू शकू
मनातून या दिवाळीला?
मोकळी करू जरा जागा
नव्या आनंदासाठी?
***
जुनाच पसारा तसाच ठेवला तर
नव्या गोष्टींना जागा कशी व्हायची?
नव्या माणसांना प्रवेश कसा मिळायचा?
आणि आपल्याला तरी हलकं,
फ्रेश, ताजतवानं कसं वाटायचं?
***
म्हणून वाटतंय  की,
या दिवाळीत एवढं करूच.
जरा मन आवरायला घेऊ.
अडगळ काढून टाकू.
रडून घेऊ वाटलं तर
म्हणजे त्या पाण्यात स्वच्छ होतील
काही आठवणी.
बोलू मनापासून 
आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर
उधानउसनवारीच्या स्मायली नको.
प्रत्यक्ष बोलू,.
खांद्यावर डोकं ठेवून.
काय ते सांगून मोकळे होऊ.
राग-संताप असेल तर तो सांगू.
प्रेम असेल तर तेही सांगू.
पण जरा बोलूच.
***
कशाला उगीच जिवाला जाळायचं?
कशाला काजळी धरून द्यायची मनावर?
कशाला हवी उदास मेणचट वतरुळं?
आणि कशाला उगीच धरून बसायच्या
छोटछोटय़ा गोष्टी?
या दिवाळीत विचारू ना हे प्रश्न स्वत:ला?
आणि लख्खं उजळवून टाकू मन.
आपलंच. 
आपल्यासाठी!
आपणच!
***
जमेल का?
का नाही?
एक दिवा जर सारा अंधार उजळवतो
तर तसाच एक सुंदर प्रकाशाचा किरण
आपल्या मनाला का उजळवणार नाही?
 -उजळेलच की!
त्या ‘उजाल्याचीच’ खरी गरज आहे!!