शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जाऊ का पळून?

By admin | Updated: September 11, 2014 17:24 IST

मुलं पळून जातात म्हणून त्यांना नालायक ठरवता, मग जातीच्या बेड्या त्यांच्या पायात घालताच कशाला ?

हा विषय तुमच्याशी बोलावा की बोलू नये? जाहीरपणे बोलावा की बोलू नये?
अशा कोंडीत असताना मी हे पत्र लिहितेय.
मला खरंच सांगा, कुठल्या मुलीला वाटतं हो, पळून जाऊन लग्न करावं? आपल्या घरच्यांना दुखवावं?
कुणाला वाटत नाही की घरच्यांनी लाडाकोडानी पाठवणी करावी? डोळ्यात अभिमानाचं पाणी यावं?
नसतेच ना, मुलींनाच काय मुलांनाही नसतेच पळून जाऊन लग्न करायची हौस! पण घरचे मुलांच्या भावना समजूनच घेत नसतील तर करायचं काय? इतके दिवस पेपरमधल्या पळून जाऊन लग्नाच्या कहाण्या मी वाचत होते, तेव्हा वाटायचं काहीतरीच, असं कुठं होतं का?
मग नंतर हेच सारं माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत घडायला लागलं. तेव्हा वाटायचं त्यांनी करावं कन्व्हिन्स घरच्यांना, पण ते सोपं नाही हे कळायचं. भीतीही वाटायची.
मात्र आता हे सारं माझ्याच बाबतीत सुरू झालं आणि मी हादरले. 
नोकरीत आम्ही एकत्र होतो, दोन वर्षे एकाच कंपनीत नोकरी करतोय. तो चांगला, सालस, होतकरु तरुण आहे. आमच्या भेटी वाढल्यावर त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी घरी विचारून सांगते म्हणाले. खरंतर जातीपातीचाही काही प्रश्न नाही. आम्ही दोघंही मराठाच आहोत. मला वाटलं होतं मुख्य अडचण संपली. हो, खोटं कशाला बोला. जातीपाती मानत नाही म्हणतो आपला समाज पण प्रत्यक्षात लग्नात जात किती छळते हे एकदा मान्यच करुन टाकलेलं बरं! 
आमच्या बाबतीत आम्ही एकाच जातीचे असूनही कुळ जुळत नाहीत, आमचं श्रेष्ठ, त्याचं नाही असं काहीतरी कारण सांगून घरचे त्याच्याशी लग्नाला त्याला न भेटताच नाही म्हणाले.
आता माझ्यासाठी मुलं शोधताहेत.
अशावेळी मुलींनी पळून जायचं नाही तर काय करायचं? किती दिवस या जातीपाती आणि एकाच जातीपातीतल्या या सगळ्या सतराशे साठ गोष्टींसाठी स्वत:चा बळी द्यायचा?
हा असा विचार करुनच आईबाबा, नातेवाईक मुलांच्या स्वप्नांचा बळी देतात आणि मग मुलं पळून गेलीच तर म्हणतात की पोरं नालायक निघाली.
आम्ही कसे नालायक, सांगा तरी?
किती काळ हे असंच चालणार? किती काळ जातीपातीवरुन आणि गोत्र-कुळावरुन मनं मारली जातात?
सुशिक्षित, शहाणी व्हावीत मुलं म्हणून आम्हाला शिक्षण देणार्‍या आईबाबांना कोणी आणि कसं समजवायचं?
या अशा अनेक प्रश्नांनी माझं डोकं उठलंय! काय करायचं?
कसं ठरवायचं?
जाऊ का मी पण पळून?
नकोच ही जातीपातीची बंधनं, टाकावीत तोडून एकदाची!
-सातार्‍या जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली मुलगी मी, माझं नाव छापू नका.