शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

जाऊ का पळून?

By admin | Updated: September 11, 2014 17:24 IST

मुलं पळून जातात म्हणून त्यांना नालायक ठरवता, मग जातीच्या बेड्या त्यांच्या पायात घालताच कशाला ?

हा विषय तुमच्याशी बोलावा की बोलू नये? जाहीरपणे बोलावा की बोलू नये?
अशा कोंडीत असताना मी हे पत्र लिहितेय.
मला खरंच सांगा, कुठल्या मुलीला वाटतं हो, पळून जाऊन लग्न करावं? आपल्या घरच्यांना दुखवावं?
कुणाला वाटत नाही की घरच्यांनी लाडाकोडानी पाठवणी करावी? डोळ्यात अभिमानाचं पाणी यावं?
नसतेच ना, मुलींनाच काय मुलांनाही नसतेच पळून जाऊन लग्न करायची हौस! पण घरचे मुलांच्या भावना समजूनच घेत नसतील तर करायचं काय? इतके दिवस पेपरमधल्या पळून जाऊन लग्नाच्या कहाण्या मी वाचत होते, तेव्हा वाटायचं काहीतरीच, असं कुठं होतं का?
मग नंतर हेच सारं माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत घडायला लागलं. तेव्हा वाटायचं त्यांनी करावं कन्व्हिन्स घरच्यांना, पण ते सोपं नाही हे कळायचं. भीतीही वाटायची.
मात्र आता हे सारं माझ्याच बाबतीत सुरू झालं आणि मी हादरले. 
नोकरीत आम्ही एकत्र होतो, दोन वर्षे एकाच कंपनीत नोकरी करतोय. तो चांगला, सालस, होतकरु तरुण आहे. आमच्या भेटी वाढल्यावर त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी घरी विचारून सांगते म्हणाले. खरंतर जातीपातीचाही काही प्रश्न नाही. आम्ही दोघंही मराठाच आहोत. मला वाटलं होतं मुख्य अडचण संपली. हो, खोटं कशाला बोला. जातीपाती मानत नाही म्हणतो आपला समाज पण प्रत्यक्षात लग्नात जात किती छळते हे एकदा मान्यच करुन टाकलेलं बरं! 
आमच्या बाबतीत आम्ही एकाच जातीचे असूनही कुळ जुळत नाहीत, आमचं श्रेष्ठ, त्याचं नाही असं काहीतरी कारण सांगून घरचे त्याच्याशी लग्नाला त्याला न भेटताच नाही म्हणाले.
आता माझ्यासाठी मुलं शोधताहेत.
अशावेळी मुलींनी पळून जायचं नाही तर काय करायचं? किती दिवस या जातीपाती आणि एकाच जातीपातीतल्या या सगळ्या सतराशे साठ गोष्टींसाठी स्वत:चा बळी द्यायचा?
हा असा विचार करुनच आईबाबा, नातेवाईक मुलांच्या स्वप्नांचा बळी देतात आणि मग मुलं पळून गेलीच तर म्हणतात की पोरं नालायक निघाली.
आम्ही कसे नालायक, सांगा तरी?
किती काळ हे असंच चालणार? किती काळ जातीपातीवरुन आणि गोत्र-कुळावरुन मनं मारली जातात?
सुशिक्षित, शहाणी व्हावीत मुलं म्हणून आम्हाला शिक्षण देणार्‍या आईबाबांना कोणी आणि कसं समजवायचं?
या अशा अनेक प्रश्नांनी माझं डोकं उठलंय! काय करायचं?
कसं ठरवायचं?
जाऊ का मी पण पळून?
नकोच ही जातीपातीची बंधनं, टाकावीत तोडून एकदाची!
-सातार्‍या जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली मुलगी मी, माझं नाव छापू नका.