शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

जाऊ का पळून?

By admin | Updated: September 11, 2014 17:24 IST

मुलं पळून जातात म्हणून त्यांना नालायक ठरवता, मग जातीच्या बेड्या त्यांच्या पायात घालताच कशाला ?

हा विषय तुमच्याशी बोलावा की बोलू नये? जाहीरपणे बोलावा की बोलू नये?
अशा कोंडीत असताना मी हे पत्र लिहितेय.
मला खरंच सांगा, कुठल्या मुलीला वाटतं हो, पळून जाऊन लग्न करावं? आपल्या घरच्यांना दुखवावं?
कुणाला वाटत नाही की घरच्यांनी लाडाकोडानी पाठवणी करावी? डोळ्यात अभिमानाचं पाणी यावं?
नसतेच ना, मुलींनाच काय मुलांनाही नसतेच पळून जाऊन लग्न करायची हौस! पण घरचे मुलांच्या भावना समजूनच घेत नसतील तर करायचं काय? इतके दिवस पेपरमधल्या पळून जाऊन लग्नाच्या कहाण्या मी वाचत होते, तेव्हा वाटायचं काहीतरीच, असं कुठं होतं का?
मग नंतर हेच सारं माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत घडायला लागलं. तेव्हा वाटायचं त्यांनी करावं कन्व्हिन्स घरच्यांना, पण ते सोपं नाही हे कळायचं. भीतीही वाटायची.
मात्र आता हे सारं माझ्याच बाबतीत सुरू झालं आणि मी हादरले. 
नोकरीत आम्ही एकत्र होतो, दोन वर्षे एकाच कंपनीत नोकरी करतोय. तो चांगला, सालस, होतकरु तरुण आहे. आमच्या भेटी वाढल्यावर त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी घरी विचारून सांगते म्हणाले. खरंतर जातीपातीचाही काही प्रश्न नाही. आम्ही दोघंही मराठाच आहोत. मला वाटलं होतं मुख्य अडचण संपली. हो, खोटं कशाला बोला. जातीपाती मानत नाही म्हणतो आपला समाज पण प्रत्यक्षात लग्नात जात किती छळते हे एकदा मान्यच करुन टाकलेलं बरं! 
आमच्या बाबतीत आम्ही एकाच जातीचे असूनही कुळ जुळत नाहीत, आमचं श्रेष्ठ, त्याचं नाही असं काहीतरी कारण सांगून घरचे त्याच्याशी लग्नाला त्याला न भेटताच नाही म्हणाले.
आता माझ्यासाठी मुलं शोधताहेत.
अशावेळी मुलींनी पळून जायचं नाही तर काय करायचं? किती दिवस या जातीपाती आणि एकाच जातीपातीतल्या या सगळ्या सतराशे साठ गोष्टींसाठी स्वत:चा बळी द्यायचा?
हा असा विचार करुनच आईबाबा, नातेवाईक मुलांच्या स्वप्नांचा बळी देतात आणि मग मुलं पळून गेलीच तर म्हणतात की पोरं नालायक निघाली.
आम्ही कसे नालायक, सांगा तरी?
किती काळ हे असंच चालणार? किती काळ जातीपातीवरुन आणि गोत्र-कुळावरुन मनं मारली जातात?
सुशिक्षित, शहाणी व्हावीत मुलं म्हणून आम्हाला शिक्षण देणार्‍या आईबाबांना कोणी आणि कसं समजवायचं?
या अशा अनेक प्रश्नांनी माझं डोकं उठलंय! काय करायचं?
कसं ठरवायचं?
जाऊ का मी पण पळून?
नकोच ही जातीपातीची बंधनं, टाकावीत तोडून एकदाची!
-सातार्‍या जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली मुलगी मी, माझं नाव छापू नका.