शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

क्या करे. कैसे कहें की.  बहुत कुछ हुआ है.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:02 IST

कुछ कुछ होता है या सिनेमाची विशी उलटली. पण ही गोष्ट त्या सिनेमाची नाही तेव्हा विशीत असलेल्या तारुण्याची आहे. ती कशी?

ठळक मुद्देकुछ कुछ नहीं, बहोत कुछ हुआ है!

- प्रगती पाटील

मुलींच्या मागे फ्रेण्डशिप बॅण्ड घेऊन फिरणारा राहुल.. राहुलबरोबर सावलीसारखं वावरणारी अंजली.. अन् राहुलच काय कोणाही मुलाला सहज दिवानं करू शकेल अशी स्पायसी टीना ! या तिघांची ही गोष्ट. खरं तर टीपिकल हिंदी सिनेमातला प्रेमत्रिकोण. मात्र दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्नपटानं  त्यावेळी विशीत असलेल्या किंवा जेमतेम विशीत पोहोचलेल्या तरुणाईला अक्षरशर्‍ पागल केलं होतं. त्या सिनेमातली टीना म्हणजे राणी मुखर्जी तेव्हा स्वतर्‍ फक्त 19 वर्षाची होती.आणि त्याच वयाच्या आगेमागे असलेले सारे त्याकाळात सहज म्हणत होते.‘कुछ कुछ होता हैं राहुल तुम नही समझोगे.’!हे न समजणारं कुछ कुछ काय होतं याचा आज वीस वर्षानी विचार केला तर हाती नुसता आठवणींचा रोमॅण्टिसिझम येत नाही, तर त्यापलीकडे तारुण्याची एक गोष्ट लागते. ती त्या सिनेमाची कमी आणि त्या सिनेमाच्या वेळी तरुण असलेल्या, त्यासोबत तरुण होत गेलेल्या एका पिढीची गोष्ट आहे. तरुण मुलगा-मुलगी दोस्त असूच शकत नाही असं समजणार्‍या त्या काळात हा सिनेमा म्हणत होता, शी इज युअर बेस्ट फ्रेण्ड यार, ही इज युअर बेस्ट फ्रेण्ड यार.किंवाक्या है प्यार?या प्रश्नाचं उत्तर प्यार दोस्ती है, असंही याच सिनेमानं सांगितलं. हम एक बार जिते है, एक बार मरते है, और प्यारभी एकही बार करते है असं म्हणणार्‍या राहुललाच नाही तर त्यावेळच्या तारुण्यालाही मान्य करायला लावलं की, पहला प्यारच रोमॅण्टिसिझम बास झालं, परस्परांसोबत आयुष्य काढायचं तर प्यार ही काही वेगळी खास गोष्ट आहे..  चित्नपटातील त्या डायलॉगने तर त्या काळातील अनेक सामान्यांचं अडलेलं प्रेम प्रकरणही सुसाट सुटायला मदत केली होती.कॉलेज जीवनातील मैत्नी आणि त्याचे अनेक पैलू व्यापक पद्धतीनं या सिनेमानं मांडले. ते सारं त्या काळच्या तरुण पिढीचं समकालीन चित्र होतं का?  त्याच काळात स्त्नी-पुरु ष मैत्नीला काही प्रमाणात ओळख मिळत होती. अगदी त्याच टप्प्यात कॉलेज विश्वात रंगलेल्या अनेकांना उघडपणे आपण फक्त मित्र आहोत असं म्हणत आपली मैत्नी जाहीर करण्याचं धाडस आलं होतं. मुला-मुलींच्या मैत्नीला समाजमान्यता मिळण्याचा तो काळ होता.महत्त्वाचा ठरला तो त्या सिनेमाचा शेवटही. जरासा मेलोड्रामा आहेच पण नायिकेचा निर्णय, तिचं प्रेम महत्त्वाचं हे मान्य करण्याचं आणि तिलाच शेवटी त्याग करायला न लावण्याचं कामही या सिनेमानं केलं. त्याग मुलींनीच करायचा, एकदा लग्न ठरलं की ते मोडायचं नाही, घरच्यांचं काय होईल या विचारांना उघड वाट मिळण्याचं निदान ते बोलण्याचं तरी बळ त्यावेळी तरुण मुलांनी कमावलं ते काहीसं हा सिनेमा पाहून. म्हटलं तर एक साधा करण जोहर स्टाइल लव्हस्टोरी सिनेमा. पण तो सिनेमा त्यावेळी तरुण मुलांना का आवडला, असा शोध घेत सहज विचार करून पाहिलं तर वाटतं.त्यात एक मोकळेपणा होता.तो मोकळेपणा, खुलेपणानं जगण्याची आझादी, घरच्या सोबत असलेला थेट संवाद आणि शिक्षण-कॉलेज यातलाही जरा मोकळाढाकळा हसरा अनुभव यासाठी ते कुछ कुछ होणं त्यावेळच्या तरुण पिढीला आवडलं असावं. सिनेमात तुटलेल्या तार्‍यासोबत राहुल-अंजली काहीतरी विश मागतात.ती पूर्ण होते न होते, हा माग निराळा.पण त्यावेळी असं कुछ कुछ नाही तर बहुत कुछ आपल्या आयुष्यात घडावं म्हणून तुटते तारे अनेकांनी जगून घेतले हे खरंय.आज ते सारं रोमॅण्टिक वाटतं.एकेकाळी हा रोमॅण्टिसिझम एका तरुण पिढीच्या जगण्याचा भाग होता असं म्हणावं लागेल. हे जरा स्मरणरंजन वाटेल.पण क्या करे. कैसे कहें की. बहुत कुछ हुआ है.