शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

करायचं डेअरिंग

By admin | Updated: October 14, 2016 12:45 IST

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले, पण तरीही, ठरवलंच..

- मुकेश ताजणे

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले,पण तरीही, ठरवलंच..तसं गाडी चालवण्याचं काही टेन्शन नव्हतं, पण देशाच्या पूर्ण दोन टोकांपर्यंतचा प्रवास करायचा म्हणजे रोज किती किलोमीटर गाडी चालवायची याचं काही गणित नव्हतं!

‘साऊथ’ला रस्ते तर खूपच छान होते. सरळ, चकचकीत, मोठमोठ्या लेन्स. गाडी चालवणं सोपं होतं. फक्त हाल होते ते खाण्यापिण्याचे! ते ‘पोंगल आणि डोसे’ यांच्याशी काही माझं जमत नव्हतं. जेवायचे हाल नाही झाले, पण पोटापुरता आधार कुठंतरी होऊन जायचा!

पण पेडाकुट्टा तंडा नावाच्या हैद्राबादजवळच्या एका गावात पोहचलो एका रात्री. त्या गावातले खूप लोक हायवेवर अ‍ॅक्सिडेण्टमध्ये गेले होते. इतकी गरीबी, एक कुठली तरी फॅक्टरी फक्त होती तिथं लोकं कामाला जायचे. मला खूप वाईट वाटलं तिथं की, रस्त्यावर एवढी डेव्हलपमेण्ट दिसतेय, पण या लोकांना खायला नाही. इथं कधी येणार विकास? 

आणि पुढं नॉर्थला जाताना तर नागपूर सोडलं तसा रस्ता खराब. आणि जम्मूला पोहचलो, जवाहर टनेल क्रॉस केलं तसं तिथं लोक सांगत होते की, ‘अंदर, आगे मत जाओ!’पण इथवर आलोय तर काश्मिरला जायचंच असं सोबतचे पत्रकार म्हणत होते, त्यांनी ठरवलंच पुढं जायचं तर आपणही डेअरिंग करायचंच असं मी ठरवलं होतं.

निघालो पुढं. पण जम्मू-श्रीनगर रस्ता खार खराब, अवघड होता. उंच दरी, त्यातून ती झेलम नदी वाहत होती. सुंदर होतं दृश्य पण एक नजर तिच्याकडे पाहण्याची सोय नव्हती. एक सेकंद जरी नजर हलली असती तरी काहीही होऊ शकलं असतं.

एका तर एरियाचंच नाव होतं, शैताननाला. तिथं खूप अपघात होतात, पाण्यात गाड्या वाहून जातात असं लोक सांगत होते. अपघात झालेल्या गाड्या दिसतही होत्या. डेंजर होता तो रस्ता. पण ‘डेअरिंग’ केलं होतंच तर मागे हटणार नव्हतोच. परतीच्या वाटेवर तर रात्रीबेरात्री घाटातून गाडी चालवली. एकावेळेस दोनच गाड्या जातील असे रस्ते होते, तिथंही गाडी चालवताना खूप रिस्क होती.पण कशाचं टेन्शन नाही घेतलं, मी मनाला एकच सांगत होतो की, एवढ्या दूर आलोय तर, नवीन काहीतरी बघायला भेटेल!

खूप नवीन गोष्टी, पूर्ण देशच पहायला भेटला. अनुभव आले. एकदम लक्षात राहण्यासारखी, जन्मभर आठवेल अशी एक काही हजार किलोमीटरची ट्रीप झाली! खूप यादगार राहिला हा अनुभव..( लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वाहनचालक आहेत.)