शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

फक्त ‘टच’मधे राहण्याचा अतिरेक, अर्थहीन होत जाणार्‍या संवादाची एक पायरी

By admin | Updated: December 5, 2014 11:56 IST

एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं.

 
एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं. वर्तमानपत्रं सुरु झाली त्या काळात वर्तमानपत्रातला प्रत्येक शब्द माणसं गांभीर्यानं घ्यायची, आदरानं वाचायची. मग टीव्ही आला. टीव्ही हे एक माहितीचे आणि मनोरंजनाचे साधन म्हणूनच लोकांनी त्याकडे पाहिले. सिनेमा म्हणजे वेळ घालवण्याचं, वैयक्तिक आनंद मिळवण्याचं माध्यम. आणि त्यानंतर इंटरनेट आणि आता मोबाइलवर इंटरनेट आले. फेसबुक-व्हॉट्स अँप, त्यांच्यावरचा संवाद ही फार कमी गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे, अशी एक भावनाच लोकांमधे तयार होते आहे. त्यावर जे बोलणं होतं, जे शेअर होतं, पुढे पाठवलं जातं ते सगळं तात्पुरतं, लाईटली घ्यायचं असतं असाच एकूण त्या माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कारण त्यांचा हेतूच मुळात ‘संपर्कात’ राहणं एवढाच आहे. तत्काल प्रतिक्रिया, तात्पुरता संबंध यापलीकडे तिथल्या संवादाला फार अर्थ नाही, असंच ती माध्यमं वापरणार्‍यांना नकळत वाटू लागतं. त्या माध्यमाचा लोक गंमत म्हणून वापर करतात. केवळ आपण ‘टच’मधे आहोत, एवढीच भावना ते माध्यम 
देतं ! आणि त्यातून सुरू होतं एक ‘अनइन्व्हॉल्व्ड’ कम्युनिकेशन. म्हणजेच कुठल्याही भावनिक गुंतवणुकीशिवाय असलेला संवाद. आपण प्रत्यक्षात माणसांशी जेव्हा बोलतो त्यात काहीतरी भावनिक गुंतवणूक असते. प्रेम, राग, लोभ, काहीतरी असतं. या माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे कुठल्याच संवादात अशी काही ‘इन्व्हॉल्वमेण्ट’ वाटत नाही अशी भीती आहे. त्यात वाईट म्हणजे अनेक तरुणांच्या आयुष्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगातला असा गुंतवणूक नसलेला संवाद वाढला आहे. आणि त्यातून मग संवादात पण भुसभुशीतपणा येण्याची शक्यता असते. आणि गंमत म्हणून, तिथं जे बोललं जातं, ते गांभीर्यानं न घेण्याची एक सवयच लागते.
माध्यमांच्या अतिरेकी सुलभ वापरातून हे पोकळपणाचे धोके आता दिसू लागले आहेत.
- विश्राम ढोले
संस्कृती आणि माहिती-संज्ञापनाचे अभ्यासक