शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पुणे ते सिंगापूर बाइकवरून १७000 किलोमिटरचा एक प्रवास

By admin | Updated: February 19, 2015 20:19 IST

पुणे-भुतान-म्यानमार-थायलॅण्ड -कंबोडिया-मलेशिया-सिंगापूर असा प्रवास करणार्‍या एका दोस्ताचा थरार अनुभव

हिनाकौसर खान-पिंजार - 
बूमऽऽऽऽऽ बूमऽऽऽऽ बूम्बाट. बाइकला किक मारली की, सुसाट धावायचं. वेगाची नशा आणि त्यासाठी भटकंतीचा कैफ असला की वेगळे समीकरण तयार होतं. बाइकवरून अशी भटकंतीची आवड तर कित्येकांना असते; पण त्या भटकंतीला जर एखाद्या विचाराची जोड मिळाली तर तो अधिकच अर्थपूर्ण होतो आणि कधीकधी तर हा प्रवास एखादा विक्रमही घडवतो.
पुणेकर डॉ. सतीश पाटील या प्रवासवेड्या शास्त्रज्ञाची अशीच एक कहाणी. थक्क करणारा १७ हजार किलोमीटरचा प्रवास. बुलेटवरून ८ देशांची सफर करत आणि भिन्न संस्कृतीचा, विज्ञानाचा जवळून अनुभव घेऊन सतीश नुकताच परतला आहे. डॉ. सतीश आणि त्यांच्यासह ८ जण या बाइक सफरीवर गेले होते. प्रवास होता पुणं ते सिंगापूर! बाइकवरून निघायचं आपला देश ओलांडत, प्रवासात येणारी राज्यं, नवनवे देश, माणसं पाहत, त्यांच्याशी बोलत पुढं जायचं असं त्यांनी ठरवलं. ते निघाले आणि सलग ७१ दिवसांत त्यांनी हा पुणे, भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया-मलेशिया आणि सिंगापूर असा प्रवास पूर्ण केला. 
सतीश सांगतो, ‘गुवाहाटी-नागालॅण्डमार्गे आम्ही मणिपूरला गेलो. मणिपूर आणि म्यानमार ही बॉर्डर लागून आहे. बॉर्डरवरचं शेवटचं गाव मोर्‍हे. ते गाव ओलांडून पलीकडे गेलं की, समोर म्यानमार. तिथं गेलो तर कसलातरी उत्सव सुरू होता. लोक  नशेत  शस्त्रास्त्र घेऊन रस्त्यावर नाचत होते.  अशावेळी तुम्ही तिकडे फिरकू नका, ‘बाहेरचे’ म्हणून तुमच्या जिवाला धोका आहे, असं स्थानिक मित्रांनी सांगितलं. टेन्शन जाणवत होतंच. जिवाची भीती होती, परक्या नजरा होत्या. झारखंड, नागालॅण्ड, मणिपूर यासार्‍या टप्प्यात आपल्याच देशात ही असुरक्षितता जाणवली याचं वाईटच वाटलं! पण, पुढं शेजारी देशात मात्र बाइकवरून जग पहायला निघालेत म्हणत आम्हाला उत्तम आदरातिथ्य लाभलं. 
म्यानमार,  तिथून पुढे थायलॅण्ड, कंबोडिया, मलेशिया असा प्रवास त्यांनी केला. चकाचक रस्ते, शिस्त तर शहरात होतीच पण, खेड्यातही इको टुरिझम, इंग्रजी शिकण्याची धडपड जाणवली.’ असं सतीश सांगतो.
 म्यानमार-थायलंड-क्वालांलपूर या प्रवासात रोज किमान चार तास त्यांना पावसात बाइक चालवावी लागली. पाऊस, तुफान वारा आणि अनोळखी रस्ते, परका देश यासार्‍यात बाइक चालवणं म्हणजे स्वत:चाच कस पाहणं होतं, असं सतीशला वाटतं; पण फक्त बायकिंगपुरता हा आनंद महत्त्वाचा नाही, तर आपल्यापेक्षा वेगळी संस्कृती, भाषा, लोकजीवन, दुसर्‍या देशातली खेडी, तिथलं जगणं, हे सारं प्रत्यक्ष पाहणं आणि अनुभवणं देखील आपल्याला खूप काही शिकवतं असं सतीश आणि टीमचं ठाम मत आहे.
 
--------------
 आपली नजर बदलते! 
 
सतीश पाटील -
 
‘‘आपली संस्कृती, आपली माणसं तर आपण समजून घेतो; पण त्यापलीकडेही जग आहे, इतर देशात काय सुरू आहे, त्या माणसांचं जगणं कसं बदलतंय, हे स्वत: प्रवास करत अनुभवलं तर नीट कळतं. आपली नजरच विस्तारत जाते.  आपल्या शेजारी देशात राहणार्‍या माणसांची जीवनपद्धती, संस्कृती आपण प्रत्यक्ष पाहिली पाहिजे. देशोदेशी फिरताना हे जाणवतं की, आपली आणि या देशातील संस्कृती बर्‍याच अंशी सारखीच आहे. माणसांचं जगणं, आनंद, वेदना आणि पाहुण्या माणसाला मदत करण्याची वृत्तीही सारखीच आहे! मला वाटतं आपण आपली नजर बदलायची, आपलं आकलन वाढवायचं तर असे प्रवास हवेत, जे खर्‍या अर्थानं जग दाखवतात!’