शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

पुणे ते सिंगापूर बाइकवरून १७000 किलोमिटरचा एक प्रवास

By admin | Updated: February 19, 2015 20:19 IST

पुणे-भुतान-म्यानमार-थायलॅण्ड -कंबोडिया-मलेशिया-सिंगापूर असा प्रवास करणार्‍या एका दोस्ताचा थरार अनुभव

हिनाकौसर खान-पिंजार - 
बूमऽऽऽऽऽ बूमऽऽऽऽ बूम्बाट. बाइकला किक मारली की, सुसाट धावायचं. वेगाची नशा आणि त्यासाठी भटकंतीचा कैफ असला की वेगळे समीकरण तयार होतं. बाइकवरून अशी भटकंतीची आवड तर कित्येकांना असते; पण त्या भटकंतीला जर एखाद्या विचाराची जोड मिळाली तर तो अधिकच अर्थपूर्ण होतो आणि कधीकधी तर हा प्रवास एखादा विक्रमही घडवतो.
पुणेकर डॉ. सतीश पाटील या प्रवासवेड्या शास्त्रज्ञाची अशीच एक कहाणी. थक्क करणारा १७ हजार किलोमीटरचा प्रवास. बुलेटवरून ८ देशांची सफर करत आणि भिन्न संस्कृतीचा, विज्ञानाचा जवळून अनुभव घेऊन सतीश नुकताच परतला आहे. डॉ. सतीश आणि त्यांच्यासह ८ जण या बाइक सफरीवर गेले होते. प्रवास होता पुणं ते सिंगापूर! बाइकवरून निघायचं आपला देश ओलांडत, प्रवासात येणारी राज्यं, नवनवे देश, माणसं पाहत, त्यांच्याशी बोलत पुढं जायचं असं त्यांनी ठरवलं. ते निघाले आणि सलग ७१ दिवसांत त्यांनी हा पुणे, भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया-मलेशिया आणि सिंगापूर असा प्रवास पूर्ण केला. 
सतीश सांगतो, ‘गुवाहाटी-नागालॅण्डमार्गे आम्ही मणिपूरला गेलो. मणिपूर आणि म्यानमार ही बॉर्डर लागून आहे. बॉर्डरवरचं शेवटचं गाव मोर्‍हे. ते गाव ओलांडून पलीकडे गेलं की, समोर म्यानमार. तिथं गेलो तर कसलातरी उत्सव सुरू होता. लोक  नशेत  शस्त्रास्त्र घेऊन रस्त्यावर नाचत होते.  अशावेळी तुम्ही तिकडे फिरकू नका, ‘बाहेरचे’ म्हणून तुमच्या जिवाला धोका आहे, असं स्थानिक मित्रांनी सांगितलं. टेन्शन जाणवत होतंच. जिवाची भीती होती, परक्या नजरा होत्या. झारखंड, नागालॅण्ड, मणिपूर यासार्‍या टप्प्यात आपल्याच देशात ही असुरक्षितता जाणवली याचं वाईटच वाटलं! पण, पुढं शेजारी देशात मात्र बाइकवरून जग पहायला निघालेत म्हणत आम्हाला उत्तम आदरातिथ्य लाभलं. 
म्यानमार,  तिथून पुढे थायलॅण्ड, कंबोडिया, मलेशिया असा प्रवास त्यांनी केला. चकाचक रस्ते, शिस्त तर शहरात होतीच पण, खेड्यातही इको टुरिझम, इंग्रजी शिकण्याची धडपड जाणवली.’ असं सतीश सांगतो.
 म्यानमार-थायलंड-क्वालांलपूर या प्रवासात रोज किमान चार तास त्यांना पावसात बाइक चालवावी लागली. पाऊस, तुफान वारा आणि अनोळखी रस्ते, परका देश यासार्‍यात बाइक चालवणं म्हणजे स्वत:चाच कस पाहणं होतं, असं सतीशला वाटतं; पण फक्त बायकिंगपुरता हा आनंद महत्त्वाचा नाही, तर आपल्यापेक्षा वेगळी संस्कृती, भाषा, लोकजीवन, दुसर्‍या देशातली खेडी, तिथलं जगणं, हे सारं प्रत्यक्ष पाहणं आणि अनुभवणं देखील आपल्याला खूप काही शिकवतं असं सतीश आणि टीमचं ठाम मत आहे.
 
--------------
 आपली नजर बदलते! 
 
सतीश पाटील -
 
‘‘आपली संस्कृती, आपली माणसं तर आपण समजून घेतो; पण त्यापलीकडेही जग आहे, इतर देशात काय सुरू आहे, त्या माणसांचं जगणं कसं बदलतंय, हे स्वत: प्रवास करत अनुभवलं तर नीट कळतं. आपली नजरच विस्तारत जाते.  आपल्या शेजारी देशात राहणार्‍या माणसांची जीवनपद्धती, संस्कृती आपण प्रत्यक्ष पाहिली पाहिजे. देशोदेशी फिरताना हे जाणवतं की, आपली आणि या देशातील संस्कृती बर्‍याच अंशी सारखीच आहे. माणसांचं जगणं, आनंद, वेदना आणि पाहुण्या माणसाला मदत करण्याची वृत्तीही सारखीच आहे! मला वाटतं आपण आपली नजर बदलायची, आपलं आकलन वाढवायचं तर असे प्रवास हवेत, जे खर्‍या अर्थानं जग दाखवतात!’