शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या तालसुरांच्या शोधात पाकिस्तानी तरुणाचा प्रवास : बागी फनकार!

By meghana.dhoke | Updated: May 9, 2019 17:21 IST

जवाद शरीफ. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. सिंधू नदीच्या खोर्‍यात एकेकाळी समृद्ध असलेलं संगीत, वाद्यं आणि कलाकार यांच्या शोधात तो फिरलाय. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय.

ठळक मुद्दे पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. 

- मेघना ढोके

कुछ ना कुछ तो करना ही था, तो बगावत कर दी.- तो दिलखुलास हसून म्हणाला; पण त्या म्हणण्यात एक असहाय हतबलता जाणवते. विषण्ण. उदास स्वर.विचारलंच त्याला, ‘फिर क्यूं किया यह मॅडनेस? आया कहॉँसे ये पागलपन?’तसा तो पटकन म्हणाला, ‘कोई कुछ भी कहें, गाली दे, इसका मतलब यें नहीं की हम रुक जाए.’थांबलं - नाकारलं आणि झापडं बांधून बसलं की काय होतं समाजाचं, माणसांचं आणि कलेचंही त्याचीच तर गोष्ट तो सांगतोय. आजच्या घडीला त्याची ही गोष्ट दुनियेनं डोक्यावर घेतली आहे; पण त्याच्या देशात मात्र त्याच्या त्या गोष्टीवरही ‘हराम’ लेबल चिकटलं आहे.जवाद शरीफ त्याच नावं. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. असं काय आहे त्याच्या फिल्ममध्ये?खरं तर काहीही ‘स्फोटक’ किंवा विशेष खास नाही.एक दिवस हा तरुण मुलगा उठला, त्यानं काही आपल्यासारखेच पागल जमवले आणि कॅमेरा घेऊन सिंधू नदीच्या खोर्‍यात फिरला. उभाआडवा फिरला. त्या एकेकाळच्या समृद्ध खोर्‍यात कोणे एकेकाळी सूरसाज झंकारले. लोकगीतांपासून ते गीत-संगीत ते थेट वाद्यवादनार्पयत माणसं तालात जगली. आज ते ताल-सूर हरवलेत, नुस्ते हरवलेच नाहीत तर संपण्याच्या वाटेवर आहेत, आणि जे उरलेत ते धर्मानुसार निषिद्ध आहे असं ठरवून ते वाजवणार्‍या साजिंद्याना भ्रष्ट ठरवणं सुरू झालं आहे. मात्र तरीही या मुलानं ठरवलं की, जे फनकार उरलेत त्यांना तर भेटू.कॅमेर्‍यासह त्यानं सिंधू नदीचं खोरं, ते अरबी समुद्राचा किनारा ते कराकोरम पर्वत रांगा पिंजून काढल्या आणि पाकिस्तानातल्या काही अनवट सुरील्या हरवल्या जागाही शोधल्या. तिथं भेटलेली मौसिकी, फनकार आणि त्यांचं आजचं जगणं, धर्माध माणसांनी जगण्यातून पुसून टाकलेले सूर हे सारं तो या आपल्या फिल्ममधून मांडत राहतो. त्या फिल्मचा यू टय़ूबवर उपलब्ध ट्रेलर पाहिला तरी कळतं की, हजारो वर्षाची संस्कृती, सांझी लोकसंस्कृती आणि लोकजीवन नाकारलं की माणसांचं काय होतं, जे कधीकाळी  समृद्ध होतं त्याला कसा चूड लागतो.

त्याच आगीत जगणार्‍या काही फनकारांना जवाद या फिल्ममधून भेटवतो. 9 वाद्यं, 11 संगीतकार यांची ही भेट. मात्र ते शुट करणंही सोपं नव्हतं. त्या फनकारांच्या गरीब फाटक्या घरांत तर सहज शूटिंग झालं; पण बाहेर शूटिंग होतंय, गाना-बजाना सुरू आहे असं कळताच अनेकदा कुठून कुठून तरुण जमा होत. हे बंद करा, म्हणून दादागिरी करत. त्यांचं एकच म्हणणं की, ‘ये बंद कर दो, ये हमारी सकाफत (संस्कृती) नहीं है!’ जवादला विचारलं की, का असं म्हणतात लोक? का नाकारतात हे सारं संस्कृती म्हणून.?तो सांगतो, ‘पाकिस्तानातली मोठी शहरं कराची, लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद सोडून जरा आत जा, गावखेडय़ांत संगीत, वादन, गायन हे सारं निषिद्धच ठरवलं गेलेलं आहे. त्यात स्वातंत्र्यानंतर आमच्या पिढय़ांत मेंदूत असं रुजवण्यात आलेलं आहे की, जे जे भारताशी संबंधित ते ते आपलं नाही. कधी काळी जे संस्कृतीचा भाग होतं, जे आपल्याच मातीत जन्मलं, वाढलं तेही आपलं नाही असं म्हणून अनेक गोष्टी आम्ही ‘नाकारल्या’! संस्कृती नाकारली, इतिहास नाकारला, लोकजीवनात घट्ट रुतलेल्या गोष्टी नाकारल्या, मालकीच सोडून दिली. उरलं काय, डोक्यात काहीतरी टोकाचं, भलतंच.जवाद म्हणतो, ‘हुआ ये की ना फनकार बचें, ना मौसिकी, ना इज्जत और ना ही कुछ लगाव !’

आणि हे सारं जवाद फक्त सांगत नाही, तर त्यानंही स्वत:  वाढताना, हे सारं अनुभवलेलं आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा. ही फिल्म बनवण्याचा त्याचा ट्रिगरही त्याच्या वाढीच्या दिवसांत त्याला आलेल्या अनुभवातला असावा. त्याच्या घरच्यांना वाटायचं मुलानं चारचौघांसारखं काम करावं. जवाद सांगतो , ‘घरवाले कहते थे बेटा कुछ अच्छा काम कर, कुछ और कर, कुछ ऐसा कर जिससे इज्जत मिले.’ आपला मुलगा कलेशी संबंधित काही करणार आहे हे घरच्यांनाच मान्य नव्हतं, तिथं समाजात विरोध झाला याचं जवादला काहीही वाटलं नाही. तो सांगतोच, ‘हमारे दिमाग में ही ये पुश कर देते है, की मौसिकी इज्जतवाला काम नहीं है! मैने सोचा चलो, ना सहीं कर लेते है!’सिंधू नदीच्या खोर्‍यात मग तो फिरला. हरवलेली मरणपंथाला लागलेली वाद्यं त्यानं शोधली. असे लोक भेटले की, ते वाद्यं वाजवणारी तर आता शेवटची एकेक माणसं उरली आहेत. (पिढी नव्हे !) त्यातलंच एक उदाहरण सारंगीचं. संपूर्ण पाकिस्तानात आता सारंगी वाजवणारे दोन-तीनच कलाकार उरलेत. एकेक लोकवाद्यं तर अशी की, ती बनवणारी माणसंच नाहीत, वाजवणारा कुणी एकेकटा, एकांडा फनकार भेटतो. तोही गुपचूप वाजवतो. कुणाला कळलं तर काय ही भीती असतेच.ही माणसं एकेक करून संपली की, संपलं सगळं असं जवाद म्हणतो.  सिंधू नदीच्या काठांवरून ते संपू नये अशी त्याची कळकळ आहे. त्या कळकळीपोटीच त्यानं ही फिल्म केली आणि आता तो जगभर आणि पाकिस्तानातही आपली फिल्म दाखवत फिरतो आहे..

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com