शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बस इतनासा ख्वाब है!

By admin | Updated: October 23, 2014 15:35 IST

मनापासून जगावं,मनासारखं जगावं अजून वेगळं असतं काय लाईफ?

मै ऐसा  क्यूं हूं.?
 
रणबीर कसला दिसतो ना
आणि वरुण धवन तर यार कसला भारी दिसतो,
अजरुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्र
कसले किलर लूक आहेत त्यांचे.
नाहीतर मी.?
बॉडी नाही, नुस्तं स्केलेटन आहे.
फोटो काढायला गेलं तर ङोरॉक्स येते, असले टिपीकल जोक आपण किती ऐकले याला तर काही सुमारच नाही.
वाट्टेल तेवढे ‘वेटगेनर’ आणले बाजारातून, कितीदा लावलं जीम, केळी तर काय रोज दोन दोन डझन हादडली.
पण नाही, वजनाचा काटा हलायचं नावच घेत नाही, ढीम्म कुठला.
आमच्या कॉलेजातही पोरं कसली स्मार्ट दिसतात, रस्त्यावर मिळणारी पाच-पाच रुपयाची गॉगल लावतात, शे-दीडशे रुपयांचे टाईट टीशर्ट घालतात आणि मिरवतात तरी इतके हॅण्डसम दिसतात.
आपल्याला येतही नाही, त्यांच्यासारखं बोलता, टमाटम बोलतात, भास मारतात, इंग्रजी-हिंदी अशी बेमालूम तडका मारत वापरतात की, त्यांच्या स्मार्टनेसला भलेभले फसतात, दिवाना बना देते है यार हे लोग.
आणि आम्ही? आमचं काही इम्प्रेशनच पडत नाही कुणावर? इम्प्रेसिव्ह असं काहीच नाही आमच्याकडं! ना आमचे आईबाप श्रीमंत, पैसेवाले, स्टायलिश, ते सामान्य. आम्ही तर अतिसामान्य.
मला कंटाळा येतो या अतिसामान्यपणाचा.
गर्दीत जर उभं केलं ना आम्हाला तर त्या गर्दीतल्या टिंबाएवढी किंमत नाही आपली असं वाटतं. 
कुठं गेलोच ग्रुपमध्ये तर आम्ही कायम असून, नसल्यसारखेच. 
तिथं लोकं गातात, गप्पा मारतात, हसतात, मुलींशी फ्लर्ट करतात, तबला वाजवतात, गिटार वाजवतात.तोंड भरुन असं काही गोड बोलतात की लोक पाहतच राहतात तो गोडवा.
आणि आम्ही?
आम्हाला मुलींशी धड बोलताही येत नाही.
त्यात आमचं रूप गबाळं, कुणी आम्हाला भाव देत नाही. गाता येत नाही, नाचता येत नाही, वाजवणं तर दूरच.
एकूण काय तर सिनेमात दिसतो तसा हिरोटाईप एकही गुण आमच्यात नाही.
अभ्यासातही आमचे दिवेच. जेममेत फस्टक्लास. त्याला कोण विचारतो. अभ्यास सोडून दुसरं काय येतं असं कुणी विचारलं तर उत्तर तेच.
विशेष काही नाही.
साला, ही काय आपली जिंदगी आहे?
सगळंच सामान्य. कोमट. मचूळ.
कशालाच चव नाही. आपण कितीही वल्गना केल्या तरी हातात फारसं काहीच नाही हे आपलं आपल्यालाच माहिती असतंच.
मला नेहमी आठवतं ते गाणं, रंगीलातल्या उर्मिलाचं.
(माङया मित्रंना हॉट उर्मिला आठवते, मला गाण्याचे शब्द, बघा आहे की नाही मी बोअर.)
तर, ते गाणं मला नेहमी म्हणतं,
‘कितने चेहरे मे अपने चेहरे की, पहचान तो हो . बडे बडे नामो में अपना भी नामोनिशान तो हो.’
-त्रस होतो मला हे गाणं ऐकलं की, वाटतं आपण किती फडतूस, किती सामान्य असावं माणसानं याला काही अंत आहे की नाही.
झुरळ झालंय आयुष्याचं.रेंगते रहो. आणि लोकं येतील पायाखाली कुस्करुन टाकतील.
नकोय मला हे आयुष्य.
नकोय हे नमककम जगणं.
 
******
यार, मै ऐसा क्यूं हूं.
मे ऐसा क्यूं हूं.
बदलता नाही का येणार हे जगणं?
उचकटून, खरवडून काढता नाही का येणार हे सामान्यपण अंगाला चिकटून बसलेलं.
आपण कुणीच नसणं, आपण ‘बंडल’च असणं,
हे किती काळ सहन करायचं?
आणि का सहन करायचं मी हे सारं?
मला राग येतोय,
सटकलीये आता माझीही.
पण मी हे सारं सांगणार कुणाला?
आणि सांगितलं तरी ऐकणार कोण?
 
******
असा संताप संताप मी नेहमी करुन घेतो.
नेहमीचं आहे हे,
सिनेमातले आवडते हिरो पाहतो तेव्हा,
कॉलेजातले भासमारु पाहतो तेव्हा,
खूप म्हणजे खूप स्मार्ट मुलं पाहतो तेव्हा,
हायफाय इंग्रजीवाल्यांचा रुबाब पाहतो तेव्हा.
श्रीमंती थाट पाहतो तेव्हा
मला खूप राग येतो या सुरकुतल्या
‘गरब्या’ चेह:याचा आणि त्याहून ‘गरीब‘ परिस्थितीचा.
 
******
खरं सांगतो, या सा:याचा चिखल झाला डोक्यात तेव्हा मीच स्वत:ला विचारलं की, हे असं सतत स्वत:ला हाडतूड करत राहिल्यानं काय साधणार आहे?
किती दिवस मी असं कुढत बसणार?
किती दिवस हे असं रडगाणं गाणार?
माङयात काय कमी आहे हे मला माहितीये, पाठ आहे.
पण माङयात काय आहे हे मी कसं बजावणार स्वत:ला? आणि जे आहे त्याचा उपयोग करुन मी कसं पुढे सरकणार?
सामान्य असण्याचा एवढा दुस्वास कशाला?
तो दुस्वास करण्यापेक्षा मी कामच असं काहीतरी खास करीन की, माङयासारख्या बाकीच्या सामान्य माणसांचं आयुष्य ‘खास’ बनून जाईन.
भाई, करने को तो हम भी बहौत कुछ कर सकते है.
अगर हौस्ले बुलंद है, तो क्या नहीं हो सकता.
या दिवाळीत मी ठरवलंय, पुसून टाकायची ही मनावरची काजळी.
आणि लख्खं उजळून टाकायचं आयुष्यही, मनही, मूडही आणि अवतीभोवतीचं जगही.
एक खयाल जिंदगी बदल सकता है.बदलेगा.जरुर!!