शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बस इतनासा ख्वाब है!

By admin | Updated: October 23, 2014 15:35 IST

मनापासून जगावं,मनासारखं जगावं अजून वेगळं असतं काय लाईफ?

मै ऐसा  क्यूं हूं.?
 
रणबीर कसला दिसतो ना
आणि वरुण धवन तर यार कसला भारी दिसतो,
अजरुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्र
कसले किलर लूक आहेत त्यांचे.
नाहीतर मी.?
बॉडी नाही, नुस्तं स्केलेटन आहे.
फोटो काढायला गेलं तर ङोरॉक्स येते, असले टिपीकल जोक आपण किती ऐकले याला तर काही सुमारच नाही.
वाट्टेल तेवढे ‘वेटगेनर’ आणले बाजारातून, कितीदा लावलं जीम, केळी तर काय रोज दोन दोन डझन हादडली.
पण नाही, वजनाचा काटा हलायचं नावच घेत नाही, ढीम्म कुठला.
आमच्या कॉलेजातही पोरं कसली स्मार्ट दिसतात, रस्त्यावर मिळणारी पाच-पाच रुपयाची गॉगल लावतात, शे-दीडशे रुपयांचे टाईट टीशर्ट घालतात आणि मिरवतात तरी इतके हॅण्डसम दिसतात.
आपल्याला येतही नाही, त्यांच्यासारखं बोलता, टमाटम बोलतात, भास मारतात, इंग्रजी-हिंदी अशी बेमालूम तडका मारत वापरतात की, त्यांच्या स्मार्टनेसला भलेभले फसतात, दिवाना बना देते है यार हे लोग.
आणि आम्ही? आमचं काही इम्प्रेशनच पडत नाही कुणावर? इम्प्रेसिव्ह असं काहीच नाही आमच्याकडं! ना आमचे आईबाप श्रीमंत, पैसेवाले, स्टायलिश, ते सामान्य. आम्ही तर अतिसामान्य.
मला कंटाळा येतो या अतिसामान्यपणाचा.
गर्दीत जर उभं केलं ना आम्हाला तर त्या गर्दीतल्या टिंबाएवढी किंमत नाही आपली असं वाटतं. 
कुठं गेलोच ग्रुपमध्ये तर आम्ही कायम असून, नसल्यसारखेच. 
तिथं लोकं गातात, गप्पा मारतात, हसतात, मुलींशी फ्लर्ट करतात, तबला वाजवतात, गिटार वाजवतात.तोंड भरुन असं काही गोड बोलतात की लोक पाहतच राहतात तो गोडवा.
आणि आम्ही?
आम्हाला मुलींशी धड बोलताही येत नाही.
त्यात आमचं रूप गबाळं, कुणी आम्हाला भाव देत नाही. गाता येत नाही, नाचता येत नाही, वाजवणं तर दूरच.
एकूण काय तर सिनेमात दिसतो तसा हिरोटाईप एकही गुण आमच्यात नाही.
अभ्यासातही आमचे दिवेच. जेममेत फस्टक्लास. त्याला कोण विचारतो. अभ्यास सोडून दुसरं काय येतं असं कुणी विचारलं तर उत्तर तेच.
विशेष काही नाही.
साला, ही काय आपली जिंदगी आहे?
सगळंच सामान्य. कोमट. मचूळ.
कशालाच चव नाही. आपण कितीही वल्गना केल्या तरी हातात फारसं काहीच नाही हे आपलं आपल्यालाच माहिती असतंच.
मला नेहमी आठवतं ते गाणं, रंगीलातल्या उर्मिलाचं.
(माङया मित्रंना हॉट उर्मिला आठवते, मला गाण्याचे शब्द, बघा आहे की नाही मी बोअर.)
तर, ते गाणं मला नेहमी म्हणतं,
‘कितने चेहरे मे अपने चेहरे की, पहचान तो हो . बडे बडे नामो में अपना भी नामोनिशान तो हो.’
-त्रस होतो मला हे गाणं ऐकलं की, वाटतं आपण किती फडतूस, किती सामान्य असावं माणसानं याला काही अंत आहे की नाही.
झुरळ झालंय आयुष्याचं.रेंगते रहो. आणि लोकं येतील पायाखाली कुस्करुन टाकतील.
नकोय मला हे आयुष्य.
नकोय हे नमककम जगणं.
 
******
यार, मै ऐसा क्यूं हूं.
मे ऐसा क्यूं हूं.
बदलता नाही का येणार हे जगणं?
उचकटून, खरवडून काढता नाही का येणार हे सामान्यपण अंगाला चिकटून बसलेलं.
आपण कुणीच नसणं, आपण ‘बंडल’च असणं,
हे किती काळ सहन करायचं?
आणि का सहन करायचं मी हे सारं?
मला राग येतोय,
सटकलीये आता माझीही.
पण मी हे सारं सांगणार कुणाला?
आणि सांगितलं तरी ऐकणार कोण?
 
******
असा संताप संताप मी नेहमी करुन घेतो.
नेहमीचं आहे हे,
सिनेमातले आवडते हिरो पाहतो तेव्हा,
कॉलेजातले भासमारु पाहतो तेव्हा,
खूप म्हणजे खूप स्मार्ट मुलं पाहतो तेव्हा,
हायफाय इंग्रजीवाल्यांचा रुबाब पाहतो तेव्हा.
श्रीमंती थाट पाहतो तेव्हा
मला खूप राग येतो या सुरकुतल्या
‘गरब्या’ चेह:याचा आणि त्याहून ‘गरीब‘ परिस्थितीचा.
 
******
खरं सांगतो, या सा:याचा चिखल झाला डोक्यात तेव्हा मीच स्वत:ला विचारलं की, हे असं सतत स्वत:ला हाडतूड करत राहिल्यानं काय साधणार आहे?
किती दिवस मी असं कुढत बसणार?
किती दिवस हे असं रडगाणं गाणार?
माङयात काय कमी आहे हे मला माहितीये, पाठ आहे.
पण माङयात काय आहे हे मी कसं बजावणार स्वत:ला? आणि जे आहे त्याचा उपयोग करुन मी कसं पुढे सरकणार?
सामान्य असण्याचा एवढा दुस्वास कशाला?
तो दुस्वास करण्यापेक्षा मी कामच असं काहीतरी खास करीन की, माङयासारख्या बाकीच्या सामान्य माणसांचं आयुष्य ‘खास’ बनून जाईन.
भाई, करने को तो हम भी बहौत कुछ कर सकते है.
अगर हौस्ले बुलंद है, तो क्या नहीं हो सकता.
या दिवाळीत मी ठरवलंय, पुसून टाकायची ही मनावरची काजळी.
आणि लख्खं उजळून टाकायचं आयुष्यही, मनही, मूडही आणि अवतीभोवतीचं जगही.
एक खयाल जिंदगी बदल सकता है.बदलेगा.जरुर!!