शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

थांबला तो संपला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 09:02 IST

गाव सोडलं, शिकत गेलो त्यानं मला घडवलं

- प्रा. डॉ. सतीश मस्के, मराठी विभागप्रमुख, कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळेस्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. पण हा म्हटलं तर लहानसा बदल माणसाच्या जीवनात भली मोठी क्र ांती करत असतो. जीवन घडवतही असतो. थांबला तो संपला असं म्हणतात ते खरं आहे. अनेकजण शिक्षणासाठी, कामासाठी, नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि मग त्यांचं जीवनमान बदललेलं दिसून येतं. बीड जिल्ह्यातल्या भाटुंबा गावात माझं नववीपर्यंतचं शिक्षण झाले. गावातील काही मुलं होळ केज या तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी होते. ते सणाच्या निमित्तानं किंवा सुटीच्या निमित्तानं गावाकडे यायचे. आम्ही समवयस्क गप्पा मारत बसायचो. गप्पात ते त्यांच्या शाळेविषयी, शिस्तीविषयी खूप काही सांगायचे, बोलायचे. मलाही त्या शाळेचं आकर्षण वाटू लागलं. पण दहावीला प्रवेश मिळू शकत नव्हता. मग माझे चुलते दासू मस्के व संस्थाचालक इस्थळकर दादा यांची ओळख होती. त्यांनी चिठ्ठी दिली; ती चिठ्ठी घेऊन वडील गेले. त्यांनी मला वसतिगृहातही राहण्याची परवानगी दिली. मी आलो, सुरुवातीला करमलं नाही. हळूहळू जीव रमायला लागला. तिथली शिस्त पाहून जीवनात बदल होऊ लागले. सकाळी लवकर उठणं, प्रार्थनेला उपस्थित राहणं, व्यायाम करणं, स्वत:च स्वत:चे कपडे धुणं, मित्रांबरोबर मिळून-मिसळून राहणं, एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी होणं, वेळच्या वेळी अभ्यास करणं अशा कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या.नंतर कॉलेजचं शिक्षण घ्यायला अंबाजोगाईला स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयात गेलो. प्राचार्य भ. की. सबणीस, प्रा. एम झेड. इंगोले व विजय भटकर यांचं सहकार्य मिळालं. लिहण्या, वाचण्यात आणि राहणीमानात बदल होऊ लागला. वेगवेगळ्या कार्यक्र मात आणि स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. ओळखी होऊ लागल्या. चळवळीशी जोडलो गेल्यानेही सामाजिक जाणीव निर्माण होऊ लागली. मराठी विषयाची गोडी प्राचार्य डॉ. शैला लोहिया यांच्यामुळे लागली. हळूहळू साहित्य चळवळीकडेही वळलो जाऊ लागलो. एम.ए.चं शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात प्रवेश घेतला. विभागात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. बाळकृष्ण कवठेकर, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. उमेश बगाडे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सुरेश पैठणकर अशा अनेक माणसांच्या सहवासात राहता आलं. ऐकता आलं, शिकता आलं. नंतर मिलिंद कला व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्त्वावर सेवा करण्याची संधी मिळाली. एम. ए. वाहूळ, प्राचार्य डॉ. बी. सी. घोबले, प्रा. अविनाश डोळस, डॉ. रमेश जाधव अशा अनेकांचं सहकार्य लाभलं. हळूहळू स्वत:मध्ये बदल होऊ लागला. नंतर याच विद्यापीठात पीएच.डी. पदवी मिळवली आणि सध्या कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. स्थलांतरांनं माझं जीवन घडवलं, जीवनाला एक आकार आणि अर्थ प्राप्त करून दिला.