शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

..थेट परभणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 08:54 IST

तेलंगणा राज्याच्या सीमेवरचं माझं गाव. ते सोडून आधी परभणीत आणि मग सोलापूरला शिकायला गेलो. तेव्हा कळलं, नुस्तं हार्डवर्क नाही स्मार्टवर्कही करायला हवं.

-योगेश्वर पी.मिरकुटे, मु.पो. नरंगल (बु ), ता.देगलूर, जि.नांदेड

माझं गाव नरंगल (बु.) नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातलं हे गाव. महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे गाव आहे. माझ्या गावापासून तेलंगणा राज्याची सीमा अगदी ३ किलोमीटर अंतरावर आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. दहावीला मी गावातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालो त्यामुळे मी पुढील शिक्षण कुठे घेणार याकडे साऱ्या गावाचं लक्ष होतं.

मला शहरात शिक्षण घ्यायचं होतं. माझा नंबर परभणीच्या एका नामांकित तंत्रनिकेतनला लागला. सुरुवातीला परभणीला कोणत्या मार्गाने जायचं मला कळत नव्हतं. आमच्या गावातले सर परभणीला राहत होते. त्यांच्याकडून सल्ला घेऊन मी परभणीला निघालो. गावातून नांदेड कसंबसं गाठलं, नंतर नांदेड ते परभणी प्रथमच रेल्वेचा प्रवास केला. तो गर्दीचा प्रवास माझ्यासाठी खूप नवा होता.

परभणीत मी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो. तिथं राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेली मुले माझ्या संपर्कात आली. अतिशय चांगले मित्र मिळाले. मोलाचं मार्गदर्शन करणारे शिक्षक मिळाले. वसतिगृहात राहिल्यामुळे समाजात तऱ्हेतऱ्हेचे लोक असतात त्यांच्यासोबत कसं वागावं हा अनुभव आला. माझे रूम पार्टनर तर असे होते की ज्यांच्यामुळे मला कधीच घरची कमतरता वाटत नव्हती. वेळोवेळी ते मदतीला धावून यायचे.

परभणीचे वैशिष्ट्य म्हणजे कृषी विद्यापीठ. आम्ही आवर्जून या विद्यापीठाला भेट द्यायचो. कधी कधी सिनेमा पहायला जायचो. दहीहंडी महोत्सवाला खूप मजा लुटायचो. हसत-खेळत माझे तीन वर्षे कधी उलटून गेली ते कळलेच नाही. त्यानंतर मी अभियांत्रिकीचे शिक्षण सोलापूरमध्ये घेतले. अजून एक स्थलांतर केलं.

अनेकदा शहरातले लोक ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना कमी लेखतात. असे अनुभव आले की खचून न जाता स्वत:च्या मनाला जिद्दीने सावरत आपलं जगणं त्यांच्यापेक्षा अधिक सुखकर कसं बनवता येईल याकडे लक्ष दिलं. ती जाणीवच मला या प्रवासानं दिली. हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देता आली..आणि एका नव्या जगाची ओळख झाली..