शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

IOT- जागोजागी इंटरनेट जोडणारा हा कोणता स्मार्ट जॉब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 07:00 IST

वस्तू, यंत्र, उपकरणं स्मार्ट होतील आणि ते परस्पर माणसांची कामं करून टाकतील! त्यांना कामाला लावणारं एक नवीन ‘कुशल’ जग

ठळक मुद्देमाहितीची सुरक्षितता जपू शकणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

अतुल  कहाते  

जगामधली जवळपास प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू आपण इंटरनेटला जोडू शकलो तर? असं शक्य झालं तर जगातली प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधू शकेल. म्हणजेच अक्षरशर्‍ जागोजागी इंटरनेट असेल. याचा सोपा अर्थ म्हणजे कुठलीही वस्तू कुणीही कुणालाही माहिती किंवा संदेश पाठवू शकेल किंवा कुणाकडूनही माहिती किंवा संदेश मिळवू शकेल. सगळे एकमेकांना जोडलेले असतील. म्हणूनच अशा सगळ्या गोष्टी चतुर म्हणजेच ‘स्मार्ट’ झालेल्या असतील. या संकल्पनेला इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) असं म्हणतात. यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादी गोष्ट किंवा वस्तू ‘स्मार्ट’ होण्यासाठी तिच्यामध्ये खूप शक्तिशाली संगणक असणं गरजेचं नसतं. फक्त अशा शक्तिशाली संगणकाला जोडलं जाण्याची क्षमता या वस्तूमध्ये आली की काम झालं! असं कुठं होतं का, तर होतं. तशी अनेक उदाहरणं घेता येतील. शेतामध्ये गरज नसताना पिकांना जास्त पाणी देणं किंवा पिके वाळलेली असूनसुद्धा त्यांना पाणी न देणं या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी शेतजमिनीमध्ये नेमकी किती आद्र्रता आहे याची सातत्यानं मोजणी करून पाणी देण्याची वेळ होताच शेतकर्‍याला तसा संदेश गेला तर शेतकर्‍याचं काम किती सोपं होईल! यासाठी आता जमिनीची आद्र्रता मोजू शकणारी मापकं म्हणजे ‘सेन्सर्स’ मिळतात. ती जमिनीत खोचली आणि इंटरनेटला जोडली की आपल्या मोबाइल फोनवर शेतकरी केव्हाही शेतजमिनीमधल्या ओलाव्याचं प्रमाण बघू शकतो. इतकंच नव्हे तर असं मापक समजा शेतामधल्या पाणीपुरवठा करणार्‍या अशाच ‘स्मार्ट’ यंत्राला जोडलं तर गरज असेल तेव्हा पिकाला आपोआप पाणी घातलं जाईल!

हे भविष्यात महत्त्वाचं का ठरेल?

तंत्रज्ञानाचा वाढता झपाटा आणि लोकांचा यंत्रावरचा वाढत असलेला विश्वास या गोष्टींमुळे अधिकाधिक कामं यंत्राकडून करून घेण्याकडचा कल वाढत चालला आहे. निदान लौकिक अर्थानं आपलं आयुष्य आणखी सोपं आणि सुखासीन करण्याच्या दृष्टीनं माणूस सातत्यानं यंत्रांकडून आत्तार्पयत अशक्यप्राय वाटत असलेली कामं करून घेण्यासाठी धडपडताना दिसतो. आपण यंत्रांकडून काम करून घेत असताना त्या यंत्राला सतत माहिती पुरवणं किंवा सूचना देणं याऐवजी निरनिराळ्या यंत्रांनीच एकमेकांशी संवाद साधला तर किती बरं होईल असा विचार माणसानं केला आणि त्यातून हे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ जन्माला आलं. याचा वापर आज कल्पनेपलीकडच्या अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ- मधुमेह असलेल्या माणसाला नियमित रक्तामधल्या ग्लुकोजची पातळी मोजून त्यानुसार गोळ्या-औषधं किंवा इन्स्युलिनची मात्रा यामध्ये बदल करावे लागतात. नजीकच्या भविष्यात ही कटकट दूर होण्याची दाट चिन्हं आहेत. आपल्या शरीरात बसवलेला एक छोटासा सेन्सर आपल्या शरीरातल्या रक्तामधल्या ग्लुकोजची पातळी आपण ठरवून दिलेल्या वेळी मोजेल आणि त्यानुसार आपल्याच शरीरात बसवलेल्या इन्स्युलिनचा साठा असलेल्या दुसर्‍या सेन्सरला आपल्या शरीरात किती इन्स्युलिन सोडायचं हे सांगेल. हा दुसरा सेन्सर त्यानुसार आपल्याला इन्स्युलिन पुरवेल. त्याच्याकडचा इन्स्युलिनचा साठा संपत आला की तोच औषधांच्या दुकानाला कळवून इन्स्युलिन मागवून घेईल! अशा किती गोष्टींमध्ये आपण ‘आयओटी’चा वापर करू शकतो याचा फक्त विचार केला तरी या तंत्रज्ञानाचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे आपल्या लक्षात येईल.

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

आयओटी ही संकल्पना तशी खूप मोठी आहे. म्हणूनच ‘आयओटी शिकणं’ असं काही नसतं. आयओटीमधल्या अनेक क्षेत्रांपैकी नेमक्या कुठल्या क्षेत्रात आपण काम करायचं हे ठरवणं गरजेचं असतं. एकूणच दोन यंत्रं एकमेकांशी थेट संवाद साधणार असतील तर हे संभाषण कसं होईल हे समजून घेणं त्यासाठी आवश्यक ठरतं. म्हणजेच मानवविरहित संवादाची संकल्पना जाणून घेणं यासाठी गरजेचं असतं. हे थेटपणे सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये अजून शिकवलं जात नसलं तरी काही ठिकाणी तशी सोय उपलब्ध झालेली आहे. अर्थातच या सगळ्याच्या मुळाशी संगणकीय कामकाज कसं चालतं याची जाण आवश्यक ठरते. म्हणूनच आयओटीसाठी लागणारं सॉफ्टवेअर लिहायचं असेल तर त्यासाठी संगणकाची भाषा, संगणकाची रचना, संगणकाच्या जाळ्यांचं कामकाज हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं आहे. संगणकशास्त्राच्या बहुतेक सगळ्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये या संकल्पना शिकवल्या जातात. त्या पायावर आयओटीशी संबंधित उर्वरित संकल्पना शिकणं शक्य होतं. खासकरून यंत्रांमधला थेट संवाद म्हणजे एक वेगळंच आव्हान असतं. याचं कारण म्हणजे यंत्रांमध्ये किंवा नेहमीच्या उपकरणांमध्ये संगणकीय यंत्रणा बसवायची तर त्यावर अनेक मर्यादा असतात. अशा संगणकीय यंत्रणेचा मेंदू म्हणजे ‘सीपीयू’ फार ताकदीचा नसतो. अशा यंत्रणेची मेमरीही मर्यादित असते. या सगळ्या अडचणींवर मात करून आयओटीसाठीचं सॉफ्टवेअर लिहिणं हे कौशल्याचं काम असतं. म्हणूनच ज्याला चांगलं प्रोग्रॅमिंग जमतं तो आयओटीमध्ये जास्त सहजपणे काम करू शकतो. याखेरीज लिहिलेलं सॉफ्टवेअर तपासणं आणि त्याच्या चाचण्या घेणं म्हणजेच सॉफ्टवेअरचं ‘टेस्टिंग’ करणं हीसुद्धा आयओटीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची गरज असते.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1. भविष्यात सगळ्या वस्तू आणि सगळी उपकरणं हे सगळं एकमेकांना जोडलेलं असेल, त्यांच्यामध्ये संवाद होत असला तर त्यातून निर्माण होणारा एक महत्त्वाचा प्रश्न या संवादाच्या सुरक्षिततेचा आहे. उदाहरणार्थ समजा एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये हे तंत्रज्ञान वापरून दररोज पाणी किती अशुद्ध आहे याचं आपोआप मोजमाप करून त्यानुसार त्यात ठरावीक प्रमाणात क्लोरिन मिसळलं जाईल. आता एखाद्या विकृत विचारांच्या हल्लेखोरानं या आयओटीवर हल्ला करून क्लोरिनची मात्रा बदलून टाकली तर त्या सगळ्या भागाला रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होईल! म्हणजेच आयओटी तंत्रज्ञानाची सुरक्षितता जपणं हा अत्यंत गंभीर मुद्दा ठरणार आहे. साहजिकच यामध्ये खूप संधी उपलब्ध होतील. माहितीची सुरक्षितता जपू शकणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.2. याखेरीज इतक्या वस्तू आणि इतकी उपकरणं सातत्यानं माहितीची देवाणघेवाण करत असतील तर त्यातून निर्माण होत असलेल्या माहितीच्या अफाट साठय़ाचं पृथक्करण करणं, त्यांचं विश्लेषण करणं म्हणजेच ‘आयओटी अ‍ॅनॅलिटिक्स’ हे क्षेत्रही अतिशय महत्त्वाचं ठरेल. 3. ‘स्मार्ट’ वस्तूंची, यंत्रांची आणि उपकरणांची निगा राखणं, त्यांची देखभाल करणं यासाठीही मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागेल. खास उल्लेख न केलेली एक गोष्ट म्हणजे सगळ्या वस्तूंनी आणि उपकरणांनी एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेलं हार्डवेअर तयार करणं, त्या हार्डवेअरचा वापर करू शकणारं सॉफ्टवेअर लिहिणं यासंदर्भात आयटी कंपन्यांनाही कुशल लोक लागतील. 4. सर्वसाधारण सॉफ्टवेअर लिहू शकणार्‍या लोकांना आयओटीशी संबंधित असलेली कौशल्यं आत्मसात करावी लागतील.