शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

मिताली राज- सातत्य म्हणजे काय असतं?- तिला विचारा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 06:00 IST

मुलींचं क्रिकेट म्हणजे भातुकली असं म्हणणार्‍यांचे तमाम बाउन्सर डक करत ती परिस्थितीच्या पीचवर टिच्चून उभी राहिली, आणि विक्रमांच्या वाटेवर निघाली म्हणून ती ‘खास’ आहे!

ठळक मुद्दे* 200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू* वन डे क्रि केटमध्ये 6000 धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू* ट्वेंटी-20 क्रि केटमध्ये 2000 धावा करणारी पहिली भारतीय (महिलाच नाही तर पुरु ष क्रि केटपटूतही तीच अव्वल आहे.)

स्वदेश घाणेकर

मिताली राज. भारतीय महिला क्रि केट संघाचा कणा असलेली नव्हे कणा बनलेली ही खेळाडू. क्रि केट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे भारतीय मानसिकतेला ठणकावून सांगत तिनं आपली कारकीर्द घडवली. महिला क्रि केटपटूच्या हक्कांसाठी जागृत असणारी आणि गरज पडल्यास त्यासाठी बंडाचं शस्त्नही उपसणारी, रोखठोक भूमिका घेऊन लढणारी लीडर कॅप्टन. जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही (अनेक तरुणांना अजूनही  वाटतं की, बायकांचं क्रिकेट म्हणजे भातुकली म्हणून हा उल्लेख) महिला क्रि केटपटूंचा आणि क्रिकेटचा आदर करावासा वाटला. महिला क्रि केटपटूही विक्रमी कामगिरी करू शकतात, प्रसंगी विक्र मात पुरुष क्रि केटपटूंनाही त्या मागे टाकू शकतात असा विश्वास वाटावा, अशी कामगिरी मिताली राजने केली आहे.200 वन डे सामने खेळणारी भारतीय खेळाडू म्हणून तिचा गौरव अलीकडेच झाला. त्या रेकॉर्डच्या आणि बातम्यांच्या पलीकडे जाऊन मिताली राजची नोंद घेणं भाग आहे.मितालीने नुकताच वन डे कारकिर्दीतला 200 वा सामना खेळला. हा पल्ला गाठणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरली. 19 वर्षे 218 दिवस; इतका प्रदीर्घ काळ ती भारतीय संघात खेळतेय. सलग खेळतेय. संघाला जोर्पयत आपली गरज वाटते तोर्पयत आपल्यातील शंभर टक्के देत राहण्याची तिची वृत्ती आजवर कायम आहे. संघात अनेक तरुण मुली आल्या मात्र ती आजही सार्‍यांची मितालीदीदी म्हणून खंबीरपणे खेळते आहे.अर्थात सध्याची युवा कर्णधार हरमनप्रीत कौरशी सारेकाही आलबेल नसेल, नाही. प्रसंगी त्यातून मितालीला संघाबाहेर बसावे लागले.  पण या गोष्टीचा तिने संघातील एकजुटीवर परिमाण होऊ दिलेला नाही. क्रिकेट सार्‍याच्या पुढे तिला ठेवता येतं.कारण क्रिकेट तिच्या आयुष्यात आलं तेच तिचं जगणं बदलायला. तसं ते बदलत गेलंही! खरं पाहता मितालीचं पहिलं प्रेम भरतनाटय़म होतं. त्याकाळी तिनं भरतनाटय़मचे कार्यक्र मही केले. वयाच्या दहाव्या वर्षी ती क्रि केट खेळायला लागली. क्रि केटकडे वळण्याचा किस्साही थोडा विचित्न आहे. मितालीला झोपा काढायची सवय. तिची ही सवय मोडण्यासाठी व ती सकाळी लवकर उठावी यासाठी तिच्या वडिलांनी तिला क्रि केट खेळण्यासाठी पाठवले. मितालीचे वडील दोराई राज हे भारतीय वायुसेनेत अधिकारी असल्यानं ते शिस्तीचे पक्के होते. त्यात मितालीचा भाऊ क्रि केट खेळायचा. मितालीची उशिरार्पयत झोपण्याची सवय मोडण्यासाठी क्रिकेट खेळणं सुरू झालं.पण हळूहळू ती क्रि केटच्या प्रेमात पडली. भरतनाटय़म व क्रि केट यांच्यापैकी एकाची निवड करणं हे तिच्यासमोरचं मोठं आव्हानचं होतं. एकच निवडायची वेळ आल्यावर तिनं क्रिकेटची निवड केली. मितालीचा जन्म राजस्थानातील असला तरी तिचे सर्व बालपण हे हैदराबादमध्ये गेलं. वयाच्या दहाव्या वर्षी तिनं क्रि केट खेळण्यास सुरुवात केली. 16 वर्षे 250 दिवस इतकं वय असताना भारतीय संघात तिनं स्थान पटकावलं. वन डे पदार्पणातच तिनं शतक ठोकलं आणि सर्वात कमी वयात शतक करणारी ती पहिली महिला क्रि केटपटू ठरली. रेल्वेकडून खेळताना तिला पुर्णिमा राव व अंजुम चोप्रा या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळालं. विसडेन क्रिकेटिअर ऑफ द इअर हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कारही तिला लाभले.हे सारं नोंदवणं का महत्त्वाचं आहे तर ज्या काळी आजच्या इतकं पाठबळ महिला क्रिकेटला नव्हतं, जेव्हा महिला क्रिकेट लाइव्हही दिसत नसे त्या काळाच्या खेळपट्टीवर मिताली टिच्चून उभी राहिली, परिस्थितीचे बाउन्सर डक करत राहिली, तेव्हा कुठं आजचे दिवस दिसत आहेत.आता काळ बदलला. महिला क्रि केटमधूनही कमाई होऊ शकते हे क्रिकेट धुरीणांच्या लक्षात आलं, आयसीसीने नियम बदलले, आता नव्या काळात महिला क्रिकेटपटूंचा झगडा तुलनेनं कमी झाला. मात्र महिला क्रिकेटला आपलं योगदान देणार्‍या मिताली, झुलन यांचं योगदान म्हणूनच पायाचा दगड ठरत आहे. 2017 सालचा एक किस्सा सांगावासा वाटतो. भारतीय महिला वन डे वर्ल्डकपचं उपविजेतेपद नावावर करून मायदेशी परतल्या. तेव्हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्नकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी आयुष्यात प्रथमच आपल्याला ( पुरुष क्रिकेटपटूंना मिळते तशी) रॉयल ट्रीटमेंट मिळाल्याची भावना मितालीनही व्यक्त केली होती. 20 वर्षाच्या कारकिर्दीत ग्लॅमरच्या मागे ती कधी पळाली नाही, अजूनही ती तशीच आहे. मी मी करून मिरवणार्‍यांत मिताली कधी दिसली नाही. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू (अनुभवी झुलन गोस्वामी वगळता) मितालीचा खेळ पाहूनच मोठी झाली आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही युवा पिढी घडली आहे. मितालीनं भारतीय महिला क्रिकेटचा पाया मजबूत केला. म्हणून तिची जागा खास आहे. संघातही, संघाबाहेरही!