शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

आयआयटीतून थेट खेडय़ात

By admin | Updated: May 21, 2015 19:53 IST

इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग

खेडय़ात काय ठेवलंय?
- नुस्ता अंधार!!
त्यापेक्षा शहरं बरी! 
‘कितीही झाला कहर तरी सोडू नये शहर!’
- अशी म्हण का उगाच पडली असेल? शिक्षण संपलं किंवा शिकायलाच जे शहरात जायचं ते परत खेडय़ात यायचंच नाही, सटीसहामाशी जत्रेला, दिवाळीला यायचं आणि एरव्ही किती सुंदर ते घर कौलारू याचे कढ काढत बसायचे.
- अशा मानसिकतेत काही पिढय़ा जगल्याच! आजची तरुण पिढीही त्याला अपवाद नाही, उलट आता तर कुणालाच खेडय़ात रहायचं नाही, सगळे शहरात निघालेत अशीच स्थिती!
शहरात काही हजारो रुपयांच्या नोक:या नाहीत की जगण्याची सारी सुखं नाहीत. दहा बाय दहाची खोकडी घरं आणि गर्दीतले धक्के, अवास्तव स्पर्धा यासा:यात श्वास गुदमरून घ्यायचा. पण रहायचं शहरातच आणि म्हणायचं खेडय़ात काही पर्यायच नाहीत!
पण,
हे पर्याय शोधायचे कुणी?
- कारण शोधलं 
तर पर्याय आहेत!
आणि ते इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग आणि मल्टिनॅशनल कंपन्या भारतीय ग्रामीण भागाकडे ‘ह्यूज पोटेन्शियल’ म्हणून पाहत आहेत. शाश्वत आणि समविकासाच्या कल्पनेत आता ग्रामीण भागातच नवे उद्योग व्यवसाय सुरू करायला भारत सरकारही चालना देत आहे. कार्पोरेटवाले तर मोठी संधी सापडल्यासारखे शहरांकडून ग्रामीण भागाकडे निघायच्या तयारीत आहेत!
कारण या सा:याच्या मुळाशी आहे एक नवं क्षेत्र, ज्याचं नाव आहे, डेव्हलपमेण्ट सेक्टर!
आणि त्या सेक्टरमधला एक नवाच घटक आहे, ग्रामीण उद्योजकता. सामाजिक उद्योगांनी सुरू झालेला हा प्रवास आता ग्रामीण उद्योगांर्पयत येऊन पोहोचला आहे आणि मुख्य म्हणजे तो पूर्णत: प्रोफेशनल होतो आहे. वाटलं म्हणून जमवलं भांडवल आणि केला एखादा लघु उद्योग सुरू, इतकी ही कल्पना भाबडी नाही. उलट उद्योजकतेचं पूर्ण प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याचं हे एक नवीन करिअरच उदयास येत आहे.
आणि त्या वाटेवर आजतरी काही तरुण स्वत:हून आपलं ग्रामीण उद्योजकतेचं करिअर घडवायला निघाले आहेत.
ग्रामीण भागात ज्याची पायाभरणी होते आहे आणि ग्रामीण उद्योजकता म्हणून जे नवीन क्षेत्र आकार घेतंय त्याचीच ओळख या अंकात आपण करून घेतो आहोत.
मात्र हे नक्की देशभरातल्या नामांकित आयआयटी ते केंद्र सरकार या सर्व टॉपमोस्ट टप्प्यात ग्रामीण भागात जाऊन उद्योग करणं आणि देशात नव्यानं उद्योगांची पायाभरणी करणं, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.