शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीतून थेट खेडय़ात

By admin | Updated: May 21, 2015 19:53 IST

इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग

खेडय़ात काय ठेवलंय?
- नुस्ता अंधार!!
त्यापेक्षा शहरं बरी! 
‘कितीही झाला कहर तरी सोडू नये शहर!’
- अशी म्हण का उगाच पडली असेल? शिक्षण संपलं किंवा शिकायलाच जे शहरात जायचं ते परत खेडय़ात यायचंच नाही, सटीसहामाशी जत्रेला, दिवाळीला यायचं आणि एरव्ही किती सुंदर ते घर कौलारू याचे कढ काढत बसायचे.
- अशा मानसिकतेत काही पिढय़ा जगल्याच! आजची तरुण पिढीही त्याला अपवाद नाही, उलट आता तर कुणालाच खेडय़ात रहायचं नाही, सगळे शहरात निघालेत अशीच स्थिती!
शहरात काही हजारो रुपयांच्या नोक:या नाहीत की जगण्याची सारी सुखं नाहीत. दहा बाय दहाची खोकडी घरं आणि गर्दीतले धक्के, अवास्तव स्पर्धा यासा:यात श्वास गुदमरून घ्यायचा. पण रहायचं शहरातच आणि म्हणायचं खेडय़ात काही पर्यायच नाहीत!
पण,
हे पर्याय शोधायचे कुणी?
- कारण शोधलं 
तर पर्याय आहेत!
आणि ते इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग आणि मल्टिनॅशनल कंपन्या भारतीय ग्रामीण भागाकडे ‘ह्यूज पोटेन्शियल’ म्हणून पाहत आहेत. शाश्वत आणि समविकासाच्या कल्पनेत आता ग्रामीण भागातच नवे उद्योग व्यवसाय सुरू करायला भारत सरकारही चालना देत आहे. कार्पोरेटवाले तर मोठी संधी सापडल्यासारखे शहरांकडून ग्रामीण भागाकडे निघायच्या तयारीत आहेत!
कारण या सा:याच्या मुळाशी आहे एक नवं क्षेत्र, ज्याचं नाव आहे, डेव्हलपमेण्ट सेक्टर!
आणि त्या सेक्टरमधला एक नवाच घटक आहे, ग्रामीण उद्योजकता. सामाजिक उद्योगांनी सुरू झालेला हा प्रवास आता ग्रामीण उद्योगांर्पयत येऊन पोहोचला आहे आणि मुख्य म्हणजे तो पूर्णत: प्रोफेशनल होतो आहे. वाटलं म्हणून जमवलं भांडवल आणि केला एखादा लघु उद्योग सुरू, इतकी ही कल्पना भाबडी नाही. उलट उद्योजकतेचं पूर्ण प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याचं हे एक नवीन करिअरच उदयास येत आहे.
आणि त्या वाटेवर आजतरी काही तरुण स्वत:हून आपलं ग्रामीण उद्योजकतेचं करिअर घडवायला निघाले आहेत.
ग्रामीण भागात ज्याची पायाभरणी होते आहे आणि ग्रामीण उद्योजकता म्हणून जे नवीन क्षेत्र आकार घेतंय त्याचीच ओळख या अंकात आपण करून घेतो आहोत.
मात्र हे नक्की देशभरातल्या नामांकित आयआयटी ते केंद्र सरकार या सर्व टॉपमोस्ट टप्प्यात ग्रामीण भागात जाऊन उद्योग करणं आणि देशात नव्यानं उद्योगांची पायाभरणी करणं, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.