शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गुरू है ,तो जीवन है!

By admin | Updated: July 18, 2016 17:00 IST

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील.

-  भक्ती सोमण

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील. ही गुरूंविषयी चर्चा फक्त एकच दिवस होत राहील. पण त्यानंतर.... आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आईनंतर आपल्यावर जगण्याचे अगदी पहिले संस्कार करणारे शिक्षक हे आपले गुरू तर आहेतच. पण जगण्याच्या आनंदात अचानक आलेल्या अडचणींचा गुंता सोडवताना आयुष्यात आलेली समदु:खी व्यक्ती त्याचं दु:ख बाजूला सारून किती पॉझिटिव्हली आयुष्य जगता येते ते दाखवते. त्याच्याकडून ती कला आत्मसात करताना तो मित्र कधी गुरू होऊन जातो ते कळतही नाही. गुरूची अशी कितीतरी रूप सांगता येतील. कधी तो जीवनातल्या महत्वाच्या टप्यात मदत करणारा मित्र होतो. तर कधी जगण्याची नेमकी दिशा दाखवणारा वाटाड्या होतो. आपल्या करीअरमध्येही आपल्याला घडवणारे अनेक गुरू आपल्याला टप्याटप्यात भेटत जातात. पण आयुष्यभरासाठी ज्यांच्याशी आपली नाळ जोडली जाते ते म्हणजे शाळेतले गुरू. आज माझ्या आर्यन हायस्कूल या शाळेतल्या प्री-प्रायमरी शाळेच्या सुषमा ताई, मोठ्या वर्गातल्या नरसाळे बाई, लवाटे बाई, श्रोत्री बाई, कोळंबेकर बाई, महाले सर, अक्रे सर अशा असंख्य शिक्षकांबर आमच्या वर्गातल्या सर्वांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. केवळ, आम्ही आहोत तुमच्यासाठी! हे त्यांचे वाक्य मनाला उभारी देते. शिक्षकांनी आपल्याला एका टप्यावर घडवलय म्हटल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेच. पण त्यांना काहीतरी होतय म्हटल्यावर आपलाही जीव कासावीस होतो. मध्यंतरी आमच्या कोळंबेकर बाईंना खूप मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सागर, समीर, रोहन स्नेहा, स्नेहल, कोमल, स्मिता यांनी त्यांना आर्थिक मदत देण्यापासून पुढे केलेली थोडी थोडकी धावपळही बाईंना खूप उभारी देऊन गेली. विद्यार्थांचे हे रूप बाईंना नव्याने कळले असणार. पण, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या धावपळीत शिक्षकांची विचारपूस करणे हेच किती सुखावह वाटले असेल त्यांना. नाही का? फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही असे ठामपणे आपल्या पाठीशी संकटे आल्यावर उभारी देण्यासाठी उभे राहतात याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या शिक्षकांना पुन्हा भेटायला मिळावे म्हणून रियुनीयन करण्यावरही आता विद्यार्थी भर देतात. मात्र यात आघाडीवर असतात ते शाळांचेच विद्यार्थी. याचा अर्थ कॉलेजमधले शिक्षक काहीच घडवत नाहीत असा होत नाही. त्यांनीही आपल्याला जगण्याचं संचित दिलेलं असतचं. भरकटलेल्या मनाला योग्य मार्गावर आणलेलं असतं. असे अनेक शिक्षक वेगवेगळ््या पद्धतीने आपल्यावर संस्कार करत असतात. पण का कोण जाणे, शिक्षक या विषयावर संवाद साधला की सगळ्यांनाच शाळेतले शिक्षकच आठवतात. कारण हेच की जगण्याचा पहिला धडा १० ते १२ वर्षे त्यांच्याकडून मिळतो. म्हणूनच... गुरू है तो जीवन है... बरोबर ना!