शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुरू है ,तो जीवन है!

By admin | Updated: July 18, 2016 17:00 IST

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील.

-  भक्ती सोमण

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील. ही गुरूंविषयी चर्चा फक्त एकच दिवस होत राहील. पण त्यानंतर.... आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आईनंतर आपल्यावर जगण्याचे अगदी पहिले संस्कार करणारे शिक्षक हे आपले गुरू तर आहेतच. पण जगण्याच्या आनंदात अचानक आलेल्या अडचणींचा गुंता सोडवताना आयुष्यात आलेली समदु:खी व्यक्ती त्याचं दु:ख बाजूला सारून किती पॉझिटिव्हली आयुष्य जगता येते ते दाखवते. त्याच्याकडून ती कला आत्मसात करताना तो मित्र कधी गुरू होऊन जातो ते कळतही नाही. गुरूची अशी कितीतरी रूप सांगता येतील. कधी तो जीवनातल्या महत्वाच्या टप्यात मदत करणारा मित्र होतो. तर कधी जगण्याची नेमकी दिशा दाखवणारा वाटाड्या होतो. आपल्या करीअरमध्येही आपल्याला घडवणारे अनेक गुरू आपल्याला टप्याटप्यात भेटत जातात. पण आयुष्यभरासाठी ज्यांच्याशी आपली नाळ जोडली जाते ते म्हणजे शाळेतले गुरू. आज माझ्या आर्यन हायस्कूल या शाळेतल्या प्री-प्रायमरी शाळेच्या सुषमा ताई, मोठ्या वर्गातल्या नरसाळे बाई, लवाटे बाई, श्रोत्री बाई, कोळंबेकर बाई, महाले सर, अक्रे सर अशा असंख्य शिक्षकांबर आमच्या वर्गातल्या सर्वांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. केवळ, आम्ही आहोत तुमच्यासाठी! हे त्यांचे वाक्य मनाला उभारी देते. शिक्षकांनी आपल्याला एका टप्यावर घडवलय म्हटल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेच. पण त्यांना काहीतरी होतय म्हटल्यावर आपलाही जीव कासावीस होतो. मध्यंतरी आमच्या कोळंबेकर बाईंना खूप मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सागर, समीर, रोहन स्नेहा, स्नेहल, कोमल, स्मिता यांनी त्यांना आर्थिक मदत देण्यापासून पुढे केलेली थोडी थोडकी धावपळही बाईंना खूप उभारी देऊन गेली. विद्यार्थांचे हे रूप बाईंना नव्याने कळले असणार. पण, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या धावपळीत शिक्षकांची विचारपूस करणे हेच किती सुखावह वाटले असेल त्यांना. नाही का? फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही असे ठामपणे आपल्या पाठीशी संकटे आल्यावर उभारी देण्यासाठी उभे राहतात याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या शिक्षकांना पुन्हा भेटायला मिळावे म्हणून रियुनीयन करण्यावरही आता विद्यार्थी भर देतात. मात्र यात आघाडीवर असतात ते शाळांचेच विद्यार्थी. याचा अर्थ कॉलेजमधले शिक्षक काहीच घडवत नाहीत असा होत नाही. त्यांनीही आपल्याला जगण्याचं संचित दिलेलं असतचं. भरकटलेल्या मनाला योग्य मार्गावर आणलेलं असतं. असे अनेक शिक्षक वेगवेगळ््या पद्धतीने आपल्यावर संस्कार करत असतात. पण का कोण जाणे, शिक्षक या विषयावर संवाद साधला की सगळ्यांनाच शाळेतले शिक्षकच आठवतात. कारण हेच की जगण्याचा पहिला धडा १० ते १२ वर्षे त्यांच्याकडून मिळतो. म्हणूनच... गुरू है तो जीवन है... बरोबर ना!