शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

गुरू है ,तो जीवन है!

By admin | Updated: July 18, 2016 17:00 IST

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील.

-  भक्ती सोमण

उद्या गुरूपोर्णिमा. गुरूंविषयी काय वाटतं त्याविषयी मेसेजेस, चर्चा आणि फोटोजही या काळात सोशल मिडीयावर भरपूर झळकतील. ही गुरूंविषयी चर्चा फक्त एकच दिवस होत राहील. पण त्यानंतर.... आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आईनंतर आपल्यावर जगण्याचे अगदी पहिले संस्कार करणारे शिक्षक हे आपले गुरू तर आहेतच. पण जगण्याच्या आनंदात अचानक आलेल्या अडचणींचा गुंता सोडवताना आयुष्यात आलेली समदु:खी व्यक्ती त्याचं दु:ख बाजूला सारून किती पॉझिटिव्हली आयुष्य जगता येते ते दाखवते. त्याच्याकडून ती कला आत्मसात करताना तो मित्र कधी गुरू होऊन जातो ते कळतही नाही. गुरूची अशी कितीतरी रूप सांगता येतील. कधी तो जीवनातल्या महत्वाच्या टप्यात मदत करणारा मित्र होतो. तर कधी जगण्याची नेमकी दिशा दाखवणारा वाटाड्या होतो. आपल्या करीअरमध्येही आपल्याला घडवणारे अनेक गुरू आपल्याला टप्याटप्यात भेटत जातात. पण आयुष्यभरासाठी ज्यांच्याशी आपली नाळ जोडली जाते ते म्हणजे शाळेतले गुरू. आज माझ्या आर्यन हायस्कूल या शाळेतल्या प्री-प्रायमरी शाळेच्या सुषमा ताई, मोठ्या वर्गातल्या नरसाळे बाई, लवाटे बाई, श्रोत्री बाई, कोळंबेकर बाई, महाले सर, अक्रे सर अशा असंख्य शिक्षकांबर आमच्या वर्गातल्या सर्वांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. केवळ, आम्ही आहोत तुमच्यासाठी! हे त्यांचे वाक्य मनाला उभारी देते. शिक्षकांनी आपल्याला एका टप्यावर घडवलय म्हटल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेच. पण त्यांना काहीतरी होतय म्हटल्यावर आपलाही जीव कासावीस होतो. मध्यंतरी आमच्या कोळंबेकर बाईंना खूप मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सागर, समीर, रोहन स्नेहा, स्नेहल, कोमल, स्मिता यांनी त्यांना आर्थिक मदत देण्यापासून पुढे केलेली थोडी थोडकी धावपळही बाईंना खूप उभारी देऊन गेली. विद्यार्थांचे हे रूप बाईंना नव्याने कळले असणार. पण, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या धावपळीत शिक्षकांची विचारपूस करणे हेच किती सुखावह वाटले असेल त्यांना. नाही का? फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही असे ठामपणे आपल्या पाठीशी संकटे आल्यावर उभारी देण्यासाठी उभे राहतात याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या शिक्षकांना पुन्हा भेटायला मिळावे म्हणून रियुनीयन करण्यावरही आता विद्यार्थी भर देतात. मात्र यात आघाडीवर असतात ते शाळांचेच विद्यार्थी. याचा अर्थ कॉलेजमधले शिक्षक काहीच घडवत नाहीत असा होत नाही. त्यांनीही आपल्याला जगण्याचं संचित दिलेलं असतचं. भरकटलेल्या मनाला योग्य मार्गावर आणलेलं असतं. असे अनेक शिक्षक वेगवेगळ््या पद्धतीने आपल्यावर संस्कार करत असतात. पण का कोण जाणे, शिक्षक या विषयावर संवाद साधला की सगळ्यांनाच शाळेतले शिक्षकच आठवतात. कारण हेच की जगण्याचा पहिला धडा १० ते १२ वर्षे त्यांच्याकडून मिळतो. म्हणूनच... गुरू है तो जीवन है... बरोबर ना!