शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुकलो तर, चुकू द्या ना आम्हाला!

By admin | Updated: November 10, 2016 13:46 IST

१३ ते १५ वयोगटातली, तरुण होऊ घातलेली मुलं. काय चालतं त्यांच्या मनात? त्यांच्या जगात?

- शुभदा चौकर 

Institute for Psychological Health (IPH) आणि ‘वयम्’ मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच ‘बहुरंगी बहर’ या व्यक्तिमत्त्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून सातवी ते नववी इयत्तातील सुमारे १२५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. वयात येणाऱ्या मुलांच्या जगात आणि मनात डोकावू पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उपक्रमातून हाती लागलेलं हे त्या पिढीचं व्यक्तिमत्त्व. सातवी ते नववी, या वयोगटातली मुलं. वयात येणारी, थोडी स्वतंत्र डोक्यानं चालणारी. काय चालतं त्यांच्या मनात? काय म्हणायचंय त्यांना? हे काही अंशी कळले. त्यांच्या मतांची व विचारांची चुणूक मिळाली ती आम्ही राज्यभर केलेल्या एका उपक्रमातून. आणि मुलांनी भरून पाठवलेल्या प्रश्नावल्या वाचून, त्यांच्याशी बोलून एक लक्षात आलं की ही मुलं त्यांचं म्हणणं विनासंकोच व्यक्त करतात. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल- अशा संकोचांचे काच त्यांना जाणवत नाहीत. जे वाटतं ते असं आहे, या खाक्याने ते स्वत:चं मत मांडतात. भले त्यांचे विचार अजून पक्के नसतील, त्यात बदल व्हायला वाव असेल, पण आता जो काही विचार त्यांच्या मनात येतोय, तो ते स्पष्टपणे मांडू पाहताहेत. अनेक मुलांचा शब्दसंग्रह अजून तोकडा आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी शब्दांची सरमिसळ करत ते लिहितात, पण त्याचाही गंड त्यांच्या मनात नाही. जमेल तसं बिनधास्तपणे व्यक्त करण्याचा मोकळेपणा त्यांच्यात आहे. या मुलांना आपण यंग अ‍ॅडल्ट म्हणू शकू, कारण ते स्वतंत्रपणे विचार करताहेत. पालक, शिक्षकांपेक्षा किंवा मोठ्यांपेक्षा त्यांच्या धारणा वेगळ्या असल्या तरी त्या मांडण्याचा धीटपणा त्यांच्यात आहे. हल्ली लोक सर्रास म्हणतात की आजची मुलं हट्टी आहेत, ती आई-वडिलांचं ऐकत नाहीत. पण खरं तर अशी स्थिती आहे की, आई वडिलांच्या आग्रहाबद्दलच मुलांना काही आक्षेप आहेत. उदाहरणार्थ, घरोघरी सर्रास होणारा एक वाद. कौटुंबिक लग्नसमारंभाला आपल्या मुलांनी यावं असा आई-वडिलांचा आग्रह असतो आणि मुलं मात्र अशा ठिकाणी यायला तयार नसतात. याबाबत या मुलांनी अतिशय तर्कशुद्ध विचार मांडले आहेत. एक तर या समारंभाचे स्वरूप त्यांना जुनाट वाटते. तिथे त्यांना आवडेल, पचनी पडेल असं काहीच घडत नाही. तिथे पोचल्यानंतर मोठी माणसं स्वत:च्या घोळक्यात मश्गुल असतात, त्यावेळी आपली मुले कंटाळत आहेत, याचं भान त्यांना राहत नाही. काही मोठी माणसं या मुलांना उगाच कोणत्यातरी विषयावरून पिडत राहतात. शिवाय या मुलांचे पालक किंवा अन्य नातेवाईक त्या मुलांना किंवा समस्त पिढीला टीकेच्या धारेवर धरतात. अभ्यास नीट करायला नको, टीव्ही-मोबाइलवर फार वेळ घालवतात, जरा शिस्त म्हणून नाही... वाद होतो तो इथंच. ही मुले तिथे चरफडत बसतात. अजून एक म्हणजे या मुलांना चुका करत शिकण्याचं स्वातंत्र्य बहुदा पुरेसे मिळत नाहीये. शूज कोणते घ्यावे, ट्यूशन क्लासला जायचं की नाही, डान्स क्लासचा कंटाळा आला तर तो सोडून द्यायचा- असे निर्णय त्यांना स्वत: घ्यावेसे वाटतात. मग भले तो निर्णय चुकीचा आहे, असं लक्षात आलं तरी चालेल, नंतर बदलता येईल! पण आईबाबांना ते पटत नाही. मात्र याउलट या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे, अभ्यासेतर विषयांत रुची असली तरी रूढ शिक्षण सोडून अन्य विषयांत करिअर करण्याचं धाडस करणे शहाणपणाचं नाही, याची जाण त्यांना आहे. त्यासोबतच ज्यात त्यांना रु ची आहे, त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी कष्ट करणारी ही मुले आहेत. अभ्यास असो वा एखादी कला, ती कष्टपूर्वक जोपासण्याची जाणीव त्यांच्यात आहे. यातील काही मुलांचे पालक अल्पशिक्षित आहेत, पण आपल्या मुलांचे समजूतदार पालकत्व निभावण्याचा समंजसपणा त्यांच्यात आहे. भविष्यकाळात समाजात भरीव योगदान करू शकतील अशा क्षमतेची कितीतरी मुले आम्हाला ‘बहुरंगी बहर’च्या निमित्ताने भेटली. हे चित्र खूप आश्वासक आहे!

 * मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांची मुलं सहभागी झाली. मराठी माध्यमात शिकणाऱ्यांचा सहभाग खूपच जास्त होता. इंग्लिश मीडियमच्या बहुतांश मुलांनी मराठीत उत्तरे लिहिली.

* शूज घ्यायला मॉलमध्ये गेल्यावर आई-बाबांचे म्हणणे ऐकाल की तुमच्या मित्रांसारखे ब्रॅण्डेड पॉश शूज घ्याल, अशा आशयाचा एक प्रश्न होता. त्याचे उत्तर लिहिताना बहुतेक मुलांनी प्रांजळपणे म्हटले की आम्हाला आमच्या मित्रांसारखे ब्रॅण्डेड पॉश शूज घ्यावेसे वाटतात. पालकांनी त्यांचे म्हणणे आमच्यावर लादू नये. आमचा निर्णय एकदा चुकला तर त्यातून आम्ही धडा घेऊ. पण तेवढी रिस्क आम्हाला घेऊ द्या.

* देव- संकल्पनेच्या बाजूने एक वेगळाच मुद्दा एका मुलाने मांडला- ‘देवळात देव नसता तर आपला देश फार मोठ्या परंपरेला मुकला असता! आपल्याकडे अनेक देव आहेत, त्यांची देवळे आहेत. काही देवळांच्या इमारती म्हणजे वेगवेगळ्या स्थापत्यकलेचे नमुने आहेत. तसेच अनेक देवळांनी संगीत, नृत्य या कलांना प्रोत्साहन दिले आहे. जर देवळे नसती तर आपला देश या सांस्कृतिक वारशाला मुकला असता...’ या उत्तरावर आम्ही सर्व थक्क!

cshubhada@gmail.com