शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?..

By admin | Updated: May 30, 2017 18:09 IST

लग्न करण्यापूर्वी आपल्यावर पडणार्‍या जबाबदार्‍यांचं भान ठेवलं नाही तर ‘फटके’ खावे लागणारच.

 - ऑक्सिजन टीम

 
 
अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही. आपल्या भविष्याचं काय, जबाबदार्‍यांचं काय, त्या आपण कशा पद्धतीने पार पाडणार याचा काहीच विचार त्यांनी केलेला नसतो. ते घरच्यांच्या विरोधात जाऊन ते लग्न तर करतात, पण काही दिवसांतच त्यांना दाल-आटे का भाव समजायला लागतो. बर्‍याचदा त्यावरुनच भांडणंही व्हायला लागतात आणि या प्रेमात खटके उडायला लागतात.
 
अशावेळी नेमकं काय होतं?
 
 
 
जेव्हा प्रेम नवं असतं, तेव्हा सगळा भर असतो, तो त्यानं तिला फिरायला नेणं, गिफ्ट्स देणं यावर. अशा वेळी तो जे कमवत असतो ते त्यांना सहज पुरतं. पण जर का अशात पळून जाऊन लग्न  करायची वेळ आली, तर?
1. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक गणित गडगडतं. कारण एकूण जगण्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा आईवडील उचलत असतात. आणि जेव्हा अचानक स्वतंत्रपणे संसार करायची वेळ येते तेव्हा पैसे पुरेनासे होतात.
2. घरातले आर्थिक व्यवहार, घरखर्चाचे तपशील, प्रायॉरिटीज याचा दोघांनीही विचार केलेला नसतो. त्यामुळेही आर्थिक घोळ होतात.
3. अशावेळी सामान्यपणे मुलाला पैशांचं जास्त टेन्शन येतं. आणि मुलीला भावनिक एकटेपणा जाणवायला लागतो. कारण अजूनही आपल्याकडे कमावण्याची मूळ जबाबदारी पुरुषाची आणि घराची जबाबदारी स्त्रीची असंच समजलं जातं.
 
 
 
4. पळून जाऊन, इच्छेविरुद्ध केलेलं लग्न असेल, तर मुलाकडचे त्याची आर्थिक कोंडी करतात. मुलीकडची माणसं रागावून मुलीशी संबंध तोडतात. आणि त्यामुळे हा धोका अजूनच वाढतो.
5. अशा वेळी प्रत्येक प्रश्न समजुतीनं सोडवला नाही, तर घरचे त्यांच्यात सहज फूट पाडून घरी परत ये, दुकान तुझ्या नावावर करून देतो, असं काही तरी आमिष मुलाच्या घरची मंडळी दाखवतात. जर का बायको आर्थिक चणचणीवरून कटकट करत असेल, तर मुलगा त्याकडे सहज ओढला जाऊ शकतो.
6. कधीकधी मुलीच्या घरचे तिला सांगतात, की ‘वडिलांनी जेवण सोडलंय, आईनं अंथरूण धरलंय, एकदा तरी घरी येऊन जा. आम्ही काही बोलणार नाही’ आता हे खरंही असू शकतं. पण असंही असू शकतं, मुलगी घरच्यांवर विश्वास ठेवून घरी जाते आणि मग भावनिक चक्रात अडकते. किंवा तिला कोंडून ठेवतात आणि ती परत येऊ शकत नाही.
  हे टाळण्यासाठी सांसारिक जबाबदार्‍यांचा आधी विचार करणं आणि त्यासाठी मनाची तयारी हाच सवरेत्तम मार्ग आहे. आपल्या जबाबदार्‍यांचं आपल्याला भान नसलं तर मग मोठीच आफत ओढवते आणि ही लव्ह मॅरेजेस मग निष्फळ ठरतात. परिस्थितीनं दिलेले ‘फटके’ इतके जोरदार ठरतात, की मग आपल्या निर्णयाचा पश्चात्तापही व्हायला लागतो. त्यासाठी या सार्‍या गोष्टींचा मुळातूनच विचार करायला हवा.