शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?

By admin | Updated: June 22, 2016 19:05 IST

एका भेटीत लग्नाला होकार/नकार देण्याच्या प्रथेला प्रश्न विचारण्याची धमक कमवतंय का आजचं तारुण्य?

- गजानन दिवाण
 
एका भेटीत लग्नाला होकार/नकार देण्याच्या प्रथेला प्रश्न विचारण्याची धमक कमवतंय का आजचं तारुण्य?
 
 
आई-बाबांनी मुलगी-मुलगा पाहायचा, कांदेपोहे खाण्याचा कार्यक्रम ठरवायचा आणि  नुसते पोहे खावून वा खाऊ घालून लग्नाचा बार उडवून द्यायचा हा ट्रेण्ड आता बदलतोय. 
या बदलत्या ट्रेण्डवर प्रकाश टाकणारी एक जाहिरात सोशल मिडीयावर पाहण्यात आली... 
एका मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी मुलासह त्याचे आई-वडील येतात. मुलगी तयार होण्यासाठी खूप वेळ घेते. अखेर कंटाळून  तिचे बाबा रूममध्ये जाऊन तिला लवकर ये सर्वजण वाट पाहत आहेत, असे सांगतात. यावर ती म्हणते, ‘पापा, सिर्फ समोसे खिलाकर कैसे डिसाईड करू की जिंदगी ईसीके साथ बितानी है...’
वडिलांना कुठलेही उत्तर देता येत नाही. एकही शब्द न बोलता ते खोलीबाहेर येतात. पाठोपाठ तयार होऊन मुलगीही येते. मुलगी पसंत असल्याचे मुलाचे आई-वडिल सांगतात. मुलगाही होकार देतो. तारीख कधीची काढायची, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘तुम्ही आमचे घर पाहिले. आता आम्हालाही तुमचे घर पाहायचे आहे. माझी मुलगी काय करू शकते, हे तुम्ही जाणले. तुमच्या मुलाला काय-काय करता येतं हेही आम्हाला पाहायचं आहे..’
यावर मुलाचे आई-वडिल आश्चर्यचकीत होतात. ते म्हणतात, ‘मुलाला तर किचनमधले काहीच येत नाही. अगदी चहादेखील त्याला करता येत नाही. तो फार फार तर ओव्हनमध्ये नूडल्स बनवू शकतो.’ 
यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘मला माफ करा. माझी मुलगी आयुष्यभर नुडल्स खाऊन नाही जगू शकत...’
वातावरण गंभीर बनते. कोणीच काही बोलत नाही. 
काही क्षणांत स्वत: मुलगाच बोलतो. ‘तुम्ही दहा दिवसांनी याल का आमच्या घरी?’ 
मुलीचे वडील म्हणतात, ‘दहा दिवसांनी का?’
तो म्हणतो, ‘या काळात मी आणखी काहीतरी बनवायला शिकेन’ मुला-मुलीसह सर्वांच्या चेहºयावर हास्य फुलते आणि ही जाहिरात येथे संपते.  
***
आपला जोडीदार निवडताना काय पाहिलं जातं? 
केवळ पोहे-समोसे खाऊ घालून वा खाऊन काय समजतं?
चहा-पान होण्यापुरत्या वेळेत दोन कुटुंब आणि स्वत: मुलगा-मुलगी ‘हो वा नाही’चा निर्णय कशाच्या आधारे घेतात?
मोठं कोडं आहे. 
 इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्वे २०११-१२च्या आकडेवारीनुसार, देशातील ग्रामीण भागातील लग्न झालेल्या आणि ३२ वर्षे वयोगटातल्या अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्नाआधी आपल्या जोडीदारासोबत एकदाही बोलणं झालेलं नाही. समोरासमोर तर नाहीच. फोन-इमेलच्या माध्यमातूनही त्यांचा जोडीदाराशी संपर्क झालेला नाही. एवढंच नाही तर या मुलींनी आपल्या जोडीदाराला लग्नाआधी प्रत्यक्ष पाहिलेलं देखील नाही. केवळ फोटो पाहून त्यांनी होकार दिला. तरूण पिढीतील हे वास्तव. ज्येष्ठांच्या बाबतीत काय असेल? सहापैकी केवळ एका महिलेला आपल्या भावी जोडीदारासोबत लग्नाच्या आधी बोलता आलं. शहरातलं वातावरण यापेक्षा थोडंसं बरं आहे. ते पण समाधानकारक म्हणता येणार नाही. 
 
आकडे काय सांगतात?
१९६०च्या दशकात शहरी भागातील साधारण २० टक्के मुलींचे लग्नाआधी आपल्या जोडीदारांशी बोलणं झाले. म्हणजे ८० टक्के मुलींनी न बोलताच लग्नाला होकार दिला. ग्रामीण भागातील हे प्रमाण केवळ १७ टक्के होते. पुढे १०७० च्या दशकात यात थोडीसी सुधारणा झाली. शहरी भागातील ३२ टक्के मुलींना लग्नाआधी जोडीदारांशी बोलता आले. ग्रामीण भागातील हे प्रमाण २३ टक्के होते. ऐंशीच्या दशकात शहरातील हे प्रमाण ४२ टक्के तर ग्रामीणमधील ३० टक्के होते. पुढे नव्वदच्या दशकात शहरातील प्रमाण ६० टक्क्यांवर पोहचले तर ग्रामीण भागात ४७ टक्के झाले. 
याचा अर्थ अजुनही जवळपास ५० टक्के मुली आपल्या भावी जोडीदाराशी न बोलताच आयुष्यभराचा निर्णय घेऊन मोकळ्या होतात. 
 
लग्नाचं वय वाढतेय...
मुलींच्या लग्नाचं वय आता वाढत आहे, त्यातल्या त्यात हे एक समाधान. संयुक्त राष्टÑाच्या आकडेवारीनसाुर भारतातील मुलींच्या लग्नाचं वय १९९१ साली १९.३ वर्षे होते. २०११ मध्ये हे वय २१ वर्षांवर पोहोचलं आहे. इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्वेनुसार २०११-१२ साली साधारण ४१ टक्के विवाहित महिलांचा वयोगट हा १५ ते ३२ वर्षे असा होता. याचाच अर्थ, १९८० नंतर जन्मलेला मुलींनी १६ ते १८ वयादरम्यान लग्न केले. १९ ते २१ या वयोगटात २४ टक्के मुलींनी लग्न केले आणि २२ ते २५ या वयोगटात ११.५ टक्के मुलींनी लग्न केले. 
१९७०च्या दशकात १५ वर्षांखालील वयात लग्न केलेल्या मुलींची टक्केवारी २९ टक्के होती. १६ ते १८ वयोगटातील ३८ टक्के, १९ ते २१ वयोगटातील २०, २२ ते २५ वयोगटातील १० आणि २६ ते ३० वयोगाटातील ४ टक्के इतकी होती. १९७० ते ९७च्या दरम्यान यात थोडीसी सुधारणा झाली. १५ पेक्षा कमी वय असलेल्या विवाहित मुलींची टक्केवारी २०, १६ ते १८ वयोगटातील टक्केवारी ४१, १९ ते २१ वयोगटातील टक्केवारी २५, २२ ते २५ वयोगटातील टक्केवारी ११ आणि २६ ते ३० वयोगटातील टक्केवारी चार इतकी आहे. 
याचा अर्थ १६ ते १८ वर्षे वयोगटात मुलींचे लग्न करण्याचे प्रमाण अजूनही ४१ टक्क्यांवर असून ते धोकादायक आहे. युनिसेफने २०११ साली भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार गरिबीमुळे पालक आपल्या पाल्याचे अल्पवयात लग्न करतात. सामाजिक दबाव, शाळा सोडण्याचं प्रमाण आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ही देखील यामागची कारणं असल्याचं हा सर्वे सांगतो. 
 
मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतोय...
समाजाचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत आहे. वंशाचा दिवा आणि म्हातारपणाचा केवळ मुलाचाच आधार असतो, हे चित्र आता हळूहळू बदलत आहे. २००४-०५ मध्य आईला मुलीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याचे प्रमाण ३२.८ टक्के होते. ते वाढून २०११-१२मध्ये ४४.७५ टक्क्यांवर गेले आहे. एवढंच नाही तर याच काळातील सर्वेक्षणानुसार म्हातारपणी मुलीकडे राहणाºया आई-वडिलांचे प्रमाण तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहे.