शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

HIt Refresh -हा मंत्र नव्या काळात का इतका महत्त्वाचा झाला आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:52 IST

एक डिग्री घेतली, झालं शिक्षण. एक नोकरी लागली, जमलं करिअर असं आता होणार नाही. कधी काम बदलेल आणि कधी नारळ मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यावर उपाय एकच.

ठळक मुद्दे.ताजा हो ले!

- विनायक पाचलग

जॉब कसा मिळवावा ही समस्या फक्त नुकतीच डिग्री घेतलेल्या फ्रेशर्सनाच असते असं नाही! सध्या नोकरी करणार्‍या प्रत्येकालासुद्धा ती असते. कधी कोणाला प्रमोशन पाहिजे असतं म्हणून तो नवा जॉब शोधत असतो, तर कधी कंपनीनं त्यांना ‘कागद टाका’ म्हणजेच नोकरी सोडा असं फर्मान दिलेलं असतं. अशावेळी अंगावर इएमआयचं ओझं असतं आणि समोर मात्न पटकन नवी नोकरी दिसत नसते. ही परिस्थिती सर्वात अवघड कारण. निदान नव्या लोकांना तरी असे काही आर्थिक व्याप नसतात सुरुवातीला. त्यांची शून्यापासून सुरुवात असते; पण करिअरच्या मध्येच असं काही झालं की परत नवी सुरुवात करणं टफ जातं, असा एकूण अनुभव आहे.या परिस्थितीचे अगदी अचूक वर्णन मायक्र ोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला यांनी केलं आहे. फक्त व्यक्तीच नव्हे तर संस्थांनापण कधी कधी अशी स्टॅग्नन्सी येते, पुढचा मार्ग स्पष्ट दिसत नाही. अशावेळी काय करायचं याचं उत्तर  नादेला देतात. ते म्हणतात, ‘हिट रिफ्रेश’. थोडक्यात काय तर जसं आपण संगणकाला रिफ्रेश कमांड देतो तशी आता स्वतर्‍लाही द्यावी लागणार आहे.  पण, रिफ्रेश व्हायचं म्हणजे काय करायचं? तर त्यात दोन-तीन गोष्टी येतात. 1. पहिलं म्हणजे लर्न टू अनलर्न’, म्हणजेच आपल्या डोक्यात ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या काही आपल्या धारणा आहेत. मग त्या आपल्या कामाबद्दल असोत वा आजूबाजूच्या जगाबद्दल किंवा स्वतर्‍बद्दल त्या आपल्याला पटकन सोडता यायला हव्यात. नव्या जगाच्या नव्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. याला कार्पोरेट भाषेत ‘आजाईल’ असं नाव आहे. त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असते की नव्या गोष्टी आपण पटकन शिकायला हव्यात. पद, वय, प्रतिष्ठा हे सारं त्याच्या आड येता काम नये. हे बोलायला सोपं असलं तरी करायला फार अवघड असते.2. यालाच जोडून अजून एक गोष्ट सध्या ‘इन’ आहे ती म्हणजे आपल्याला आपल्याहून 5 वर्षे वयाने लहान असा एकतरी मेंटर असायला हवा. कारण आज दर 5 वर्षाने पिढी बदलते. प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा स्मार्ट असते. आज मोठय़ा मोठय़ा एम एन सीचे सीइओ हा फॉम्यरुला वापरत आहेत.  हा प्रत्येकाला वापरता येणं शक्य आहे. आपला छोटा भाऊ, मित्न किंवा एखादी ओळखीची व्यक्ती हा आपला असा न कळत मेंटर होऊ शकतो. फक्त असा माणूस पटकन पारखायला हवा. ती नजर असायला पाहिजे इतकेच.3. पण असे बदल करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ ऐकायची क्षमता’. एखादी गोष्ट शांतपणे ऐकून घेणं हे आजच्या कोलाहलात अवघड झालं आहे. आज एकतर आपण लगेच वाद घालायला लागतो, प्रतिक्रिया देतो किंवा ‘माझंच कसं खरं’ म्हणतो, नाहीतर मग ऐकून न ऐकल्यासारखं करतो. आजूबाजूला एवढा कण्टेंट आदळत आहे की त्यामधून नक्की शांतपणे ऐकणं हे स्किलच आपण विसरलो आहोत. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू, एखाद्या माणसाचा वेगळा अँगल जर का आपण नीट ऐकू लागलो तर स्वतर्‍ला अपग्रेड करणं खूप सोपं जातं. आजच्या जगात कोणालाच सगळं माहीत नसतं, जे ज्याला माहीत आहे त्याच्याकडून ते ऐकायला काहीच हरकत नाही हे मनापासून मान्य केलं की मग ‘रिफ्रेश’ बटन दाबणं खूप सोपं जातं.मध्यंतरी एक रिपोर्ट आला होता की नव्या जगात एका माणसाला त्याच्या आयुष्याच्या 40 वर्षात कमीत कमी 7 वेळा नोकरी किंवा प्रोफेशन बदलावं लागेल. आणि तसं होणार असेल तर मग आपल्याही आयुष्यात ‘रिफ्रेश’ बटन दाबणं मस्ट आहे. आणि त्यासाठी आतापासून तयारी करणंही गरजेचं आहे.

(विनायक मुळात इंजिनिअर असून, आता एक स्टार्टअप कंपनी चालवतो)