शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

एका पायावर उंच उडी

By admin | Updated: September 22, 2016 18:41 IST

आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच, त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं, मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, यानं काय फरक पडतो?

- विश्‍वास चरणकर
 
आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच,
त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं,
मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, 
यानं काय फरक पडतो?
- पॅरालिम्पिक स्पर्धेत 
सुवर्णपदक जिंकणार्‍या 
मरिअप्पनची एक जिद्दी गोष्ट.
 
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण झेप घेण्याचं काळीज जन्माला येताना घेऊन यावं लागतं, असं टिपिकल घिसंपिटं वाक्य कितीदा कानावर पडतं.
फॉरवर्ड मारायला बरी पडतात अशी वाक्यं, मात्र एखादा माणूस अशी वाक्यं जेव्हा खरी करून दाखवतो, जगतो तेव्हा चकित होण्यापलीकडे दुनियेच्या हातात दुसरं काही नसतंच. 
मरिअप्पन थांगवेलू. हे नाव त्याच पराक्रमाची साक्ष देतंय. वयाच्या पाचव्या वर्षी अपघातात पाय गेला; पण जगण्याची आणि जिंकण्याची ऊर्मी काही तो अपघात अधू करू शकला नाही.
तामिळनाडूतलं सालेम (दक्षिणेत त्याचा उच्चार सेलम असा करतात) शहराजवळच्या पेरियावादमगाती नावाच्या अगदी छोट्या गावातला हा मुलगा. वडिलांनी आईला टाकून दिलेलं. सोबत तीन भावंड. पाच वर्षांचा मरिअप्पन रमत-गमत शाळेत चालला होता. भरधाव आलेल्या एका बसने त्याला धडकच दिली. ती इतकी भयानक होती की त्याचा उजवा पाय बसच्या चाकाखाली सापडला आणि कायमचा अधू झाला.  अपघातानं शरीर अधू झालं, पण  खेळाकडील त्याची ओढ मात्र कमी झाली नव्हती. त्याला व्हॉलिबॉलची आवड होती. मात्र सुरुवातीला खेळताना मैदानाबाहेर गेलेला चेंडू आणून देण्यातच त्याला धन्यता मानावी लागे. मात्र मरिअप्पन हळूहळू संघात खेळू लागला. व्हॉलिबॉल स्मॅश करण्यासाठी मोडक्या पायानं उडी मारणारा मरिअप्पन क्रीडाशिक्षक आर. राजेंद्रन यांच्या नजरेत भरला. त्यांनी त्याला उंच उडी या खेळाकडे वळविले. 
वयाच्या १५ व्या वर्षी त्याने जीवनातील पहिल्या स्पर्धेत भाग घेतला, तोही शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंसोबत. या स्पर्धेत त्यानं दुसरा क्रमांक मिळवला. पुढे २0१३ च्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत सत्यनारायण यांच्या नजरेस हा हिरा पडला. त्यांनी त्याला आणखी पैलू पाडण्याचं ठरवलं. त्यासाठी ते त्याला बेंगळुरूला घेऊन गेले. तेथे दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २0१५ मध्ये तो त्याच्या कॅटेगिरीतील जगात क्रमांक एकचा खेळाडू बनला होता. 
आता त्याचं ध्येयं होतं रिओ पॅरालिम्पिक. 
ती स्पर्धा तो कशासाठी खेळला?
अनेकजण सांगतात, देशासाठी, पदकासाठी?
पण मरिअप्पन खरंखुरं उत्तर देतो. 
तो म्हणतो, हे मोठ्ठं मेडल मला का हवंय? तर त्यानं मला नोकरी मिळेल आणि माझ्या आईची मला नीट देखभाल करता येईल!
भाजी विक्रीचा व्यवसाय करून आईनं मरिअप्पनला वाढवलं. त्याच्या पायावर उपचार करण्यासाठी तिनं घेतलेलं तीन लाख रुपयांचं कर्ज अजूनही ती फेडतेच आहे. तिच्या कष्टाचं, हालअपेष्टांचं चीज करायचं एवढाच त्याचा खरंतर ध्यास होता.
२१ वर्षांच्या मरिअप्पनने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात भारताला सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू ठरला.
आणि त्यापुढची गोष्ट. त्याला मिळालेल्या बक्षिसातून त्यानं ३0 लाख रुपये रक्कम त्यानं तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेला भेट म्हणून दिली.
सुवर्णउडी यालाही म्हणतातच.
 
मरिअप्पन म्हणतो,
 आता वाटतं, आपल्या सगळ्यांमध्ये एक सुपरहिरो आहेच, त्याला जगवायचं, मग हातपाय आहेत की नाही, यानं देखील काय फरक पडतो?
 
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)