शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

एका पायावर उंच उडी

By admin | Updated: September 22, 2016 18:41 IST

आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच, त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं, मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, यानं काय फरक पडतो?

- विश्‍वास चरणकर
 
आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच,
त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं,
मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, 
यानं काय फरक पडतो?
- पॅरालिम्पिक स्पर्धेत 
सुवर्णपदक जिंकणार्‍या 
मरिअप्पनची एक जिद्दी गोष्ट.
 
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण झेप घेण्याचं काळीज जन्माला येताना घेऊन यावं लागतं, असं टिपिकल घिसंपिटं वाक्य कितीदा कानावर पडतं.
फॉरवर्ड मारायला बरी पडतात अशी वाक्यं, मात्र एखादा माणूस अशी वाक्यं जेव्हा खरी करून दाखवतो, जगतो तेव्हा चकित होण्यापलीकडे दुनियेच्या हातात दुसरं काही नसतंच. 
मरिअप्पन थांगवेलू. हे नाव त्याच पराक्रमाची साक्ष देतंय. वयाच्या पाचव्या वर्षी अपघातात पाय गेला; पण जगण्याची आणि जिंकण्याची ऊर्मी काही तो अपघात अधू करू शकला नाही.
तामिळनाडूतलं सालेम (दक्षिणेत त्याचा उच्चार सेलम असा करतात) शहराजवळच्या पेरियावादमगाती नावाच्या अगदी छोट्या गावातला हा मुलगा. वडिलांनी आईला टाकून दिलेलं. सोबत तीन भावंड. पाच वर्षांचा मरिअप्पन रमत-गमत शाळेत चालला होता. भरधाव आलेल्या एका बसने त्याला धडकच दिली. ती इतकी भयानक होती की त्याचा उजवा पाय बसच्या चाकाखाली सापडला आणि कायमचा अधू झाला.  अपघातानं शरीर अधू झालं, पण  खेळाकडील त्याची ओढ मात्र कमी झाली नव्हती. त्याला व्हॉलिबॉलची आवड होती. मात्र सुरुवातीला खेळताना मैदानाबाहेर गेलेला चेंडू आणून देण्यातच त्याला धन्यता मानावी लागे. मात्र मरिअप्पन हळूहळू संघात खेळू लागला. व्हॉलिबॉल स्मॅश करण्यासाठी मोडक्या पायानं उडी मारणारा मरिअप्पन क्रीडाशिक्षक आर. राजेंद्रन यांच्या नजरेत भरला. त्यांनी त्याला उंच उडी या खेळाकडे वळविले. 
वयाच्या १५ व्या वर्षी त्याने जीवनातील पहिल्या स्पर्धेत भाग घेतला, तोही शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंसोबत. या स्पर्धेत त्यानं दुसरा क्रमांक मिळवला. पुढे २0१३ च्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत सत्यनारायण यांच्या नजरेस हा हिरा पडला. त्यांनी त्याला आणखी पैलू पाडण्याचं ठरवलं. त्यासाठी ते त्याला बेंगळुरूला घेऊन गेले. तेथे दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २0१५ मध्ये तो त्याच्या कॅटेगिरीतील जगात क्रमांक एकचा खेळाडू बनला होता. 
आता त्याचं ध्येयं होतं रिओ पॅरालिम्पिक. 
ती स्पर्धा तो कशासाठी खेळला?
अनेकजण सांगतात, देशासाठी, पदकासाठी?
पण मरिअप्पन खरंखुरं उत्तर देतो. 
तो म्हणतो, हे मोठ्ठं मेडल मला का हवंय? तर त्यानं मला नोकरी मिळेल आणि माझ्या आईची मला नीट देखभाल करता येईल!
भाजी विक्रीचा व्यवसाय करून आईनं मरिअप्पनला वाढवलं. त्याच्या पायावर उपचार करण्यासाठी तिनं घेतलेलं तीन लाख रुपयांचं कर्ज अजूनही ती फेडतेच आहे. तिच्या कष्टाचं, हालअपेष्टांचं चीज करायचं एवढाच त्याचा खरंतर ध्यास होता.
२१ वर्षांच्या मरिअप्पनने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात भारताला सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू ठरला.
आणि त्यापुढची गोष्ट. त्याला मिळालेल्या बक्षिसातून त्यानं ३0 लाख रुपये रक्कम त्यानं तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेला भेट म्हणून दिली.
सुवर्णउडी यालाही म्हणतातच.
 
मरिअप्पन म्हणतो,
 आता वाटतं, आपल्या सगळ्यांमध्ये एक सुपरहिरो आहेच, त्याला जगवायचं, मग हातपाय आहेत की नाही, यानं देखील काय फरक पडतो?
 
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)