शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

त्यानं पुढच्या स्पर्धकाला फिनिशिंग लाइनच्या पुढे ढकललं, आणि  .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:52 IST

जिंकण्याची एक भलतीच भन्नाट गोष्ट !

- सारिका पूरकर -गुजराथी

तयारी जीत की.म्हणत मुलाला सगळ्याच शर्यतीत पहिलंच यायला शिकवणा:या आईची जाहिरात पाहिली असेलच ना?वाट्टेल ते करून जिंकाच असं जाहिराती, मार्केट, व्यवस्था, समाज, पालकही आपल्या मुलांना सतत सांगत असतात.थ्री इडियट्समधला व्हायरसही मुलांना हेच शिकवत असतो, भागो, लाइफ अ रेस! जो दुसरा आता है, उसे कोई याद नही करता.मात्र गेल्या काही दिवसांत तुमच्याही र्पयत एक फॉरवर्ड आलं असेल, ज्यात पहिल्या आलेल्यापेक्षा दुस:याच्या खिलाडू वृत्तीचं, मोठय़ा मनाचं, दिलदारीचं आणि माणूसकीचं दर्शन होतं आहे.बाकी आमजनतेसह आर. माधवननेही त्याची स्टोरी सोशल मीडियात अकाउण्टवर शेअर केली. दरम्यान केरळमधील अलानाल्लूर या गावातील एका प्राथमिक शाळेतील मुलांनी तर त्याला चक्क पत्रं पाठवलीय, त्याच्यावर निबंधदेखील लिहिले.अर्थात 2020 ची नाही, कोविडपूर्व काळातली डिसेंबर 2012 ची ही गोष्ट आहे.तो स्पेनचा धावपटू इव्हान फर्नांडिज अनाया. स्पेनधील बुर्लाडा येथे धावण्याची क्रॉस कंट्री स्पर्धा झाली होती. केनियाचा चॅम्पियन धावपटू हाबेल किप्रोप मुताई हा या रेसमध्ये अग्रभागी होता. निर्विवादपणो स्पर्धेचा तोच विजेता होणार होता; परंतु मुताईला स्पर्धेच्या फिनिशिंग लाइनचा अंदाज आला नाही व स्पर्धा संपली असे समजून 1क् मीटर अंतर आधीच तो थांबला. त्याच्या किंचित मागे दुस:या क्र मांकावर होता स्पेनचा इव्हान फर्नाडिज अनाया. त्याच्या हे लक्षात आलं, की मुताईला स्पर्धेचा शेवट समजलेला नाहीये. आता खरं तर झटकन पुढे जाऊन स्पर्धा जिंकण्याची, सुवर्णपदक पटकाविण्याची नामी संधी इव्हानकडे चालून आली होती; पण इव्हानने तसं केलं नाही. तो मुताईकडे पाहून जोरजोरात ओरडू लागला, थांबू नकोस, तू धावत राहा, स्पर्धेचा शेवट हा नाहीये, तू जिंकू शकतोस. गंमत अशी होती, की मुताईला स्पॅनिश भाषा समजत नव्हती. त्याला समजतच नव्हते हे काय चालेलय ते? इव्हानच्याही लक्षात आले की, मुताईला त्याची भाषा समजत नाहीये. त्याने अखेर मुताईला फिनिशिंग लाइनच्या पलीकडे अक्षरश: स्वत:हून ढकलून दिले. अशा रीतीने मुताईच सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. घडलं ते अचंबित करणारंच होतं उपस्थितांसाठी. खेळाच्या मैदानात सहसा असं होताना पाहिलं नव्हतं कुणी.ज्याला त्याला विजयी व्हायचं असतं. बक्षीस उंचवायचं असतं. इव्हानला चांगली संधी असतानाही त्याने मात्र ते नाकारलं होतं.स्पर्धेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या तू असं का केलंस, तू सहज जिंकू शकला असता?या प्रश्नाला इव्हानने उत्तर दिलं होतं, मी जर तसं केलं असतं तर त्या विजयाला काही अर्थ उरला असता का? त्या सुवर्णपदकाचा मान राखला गेला असता का? माङया आईला काय वाटलं असतं माङयाबद्दल? माङया देशाला माझा अभिमान वाटला असता का? तसंही मी त्याला विजयी केलंच नाहीये, तो विजय, ती स्पर्धा त्याचीच होती. एवढय़ावरच इव्हान थांबला नाही, तर तो म्हणाला, माझं तर स्वप्नं आहे की आपण असं काही करू की आपण स्वत:ला बाजूला फेकत इतरांना विजयी करत जाणारे, एकमेकांना सोबत घेऊन जाणारं समाजमन तयार करू.जिंकणं याहून वेगळं काय असतं?विशेष म्हणजे, ज्या काळात स्पर्धा, स्वत:चं अस्तित्व, जिंकणं अधिक महत्त्वाचं त्या काळात अशा गोष्टी, असे प्रसंगच जगण्याची योग्य वाट दाखवतात.

आता येऊ वर्तमानात.केरळच्या शाळेत शिक्षिका सुमिथा के यांनी मुताई यांनी तो जिंकण्याचा फोटो मुलांना दाखवून ही गोष्टही सांगितली.पाठय़पुस्तकात, कोणत्याही अभ्यासक्रमात या फोटोचा, या गोष्टीचा समावेश नव्हता; पण तरीही या मुलांना यातून जगण्याचा आनंदी धडा मिळाला. सुमिथा यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केरळ राज्याचे वरिष्ठ शिक्षण सल्लागार टी.पी. कलाधरन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये केलं.ुकाळ बदलतो, संदर्भ बदलतात; पण मानवी जगण्यातली ही सच्ची मूल्ये आणि आनंद नव्या काळातही अशी भेटतच राहतात.