शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या तरुणांना वास्तव छळतं तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:34 IST

रोज अंधारात हरवणारी गावं, त्या गावातली तरणी पोरं, काळोखात उभ्या बाभळीची सळसळ हे सारं गावोगाव काय सांगत असतं?

ठळक मुद्देआमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..

- अरुण तीनगोटे 

गावाकडे प्रचंड लोडशेडिंग. उजळलेले दिवे दिसणं ही दुर्मीळ गोष्ट होती. उन्हाळ्यात लोडशेडिंग आणखी वाढायचं. मग उन्हाळ्याचे दिवस अधिक असह्य होऊन जायचे. दुपारी रणरणत्या उन्हाने जिवाची लाही लाही व्हायची. घरासमोरच्या खळ्यातला चारा आपोआप पेटून जाईल असं वाटायचं. संध्याकाळ होईर्पयत तिथली गाय चारापाण्यासाठी हंबरायची. विजेच्या तारेवर कधीतरी एखादं चुकार पाखरू दिसायचं. दुपार सहन करून संध्याकाळ होण्याची वाट पाहणं मुश्कील व्हायचं. नदीकाठच्या बाभळीवर संध्याकाळी बगळे येऊन बसायचे, हे त्यातल्या त्यात बरं होतं.या अशा अंधारून येणार्‍या संध्याकाळी पुलावर बसून घरी जाणार्‍या बैलगाडय़ांचे आवाज ऐकणं कानाला चांगले वाटायचे. रात्नी जेवण झाल्यानंतर बायाबापडे घरासमोरच्या ओटय़ावर गप्पा मारत बसायचे. कधी कधी थंड हवेची झुळूक यायची, ते शरीराला मस्त वाटायचं. समाजमंदिराजवळ देवीचं एक छोटंसं देऊळ होतं. तिथं रोज रात्नी आदिवासी मुलं गाणी म्हणायची. त्या शांततेत ती गाणी कानाला फार श्रवणीय वाटायची. त्या गाणार्‍या मुलांमध्ये एक सावळ्या रंगाचा दणकट पोरगा होता. तो सावळा होता आणि सर्व त्याला प्रेमाने भोर्‍या म्हणायचे. त्याचा आवाज जाडाभरडा तरीही गोड होता.‘तुझ्याविना मला कुणी नाय, अंबाबाय..’  हे गाणं ते नेहमी म्हणायचे. गावची आठवण आली की, मला नेमकं  हेच गाणं आठवतं. मग मिट्ट काळोखात हरवलेल्या बाभळी आठवतात. मिणमिणता दिवा लागलेलं आमचं घर आठवतं. ओटय़ावर आराम करणारे वडील आठवतात. त्यांचे घट्टे पडलेले हात आठवतात. त्यांच्या पायातली कुरूपं आठवतात. सतत काहीतरी मोजणारी त्यांची बोटं आठवतात. त्यांचं दचकून झोपेतून उठणं आठवतं. मनाशी बोलत राहणं आठवतं..आयुष्यभर संघर्ष करून, अनेक पराभव सहन करून पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी त्यांचं लढणं  आठवत. सतत आनंदी दिसणारी माणसं आतून दुर्‍खानं पोखरलेली असतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधू पाहणारं त्यांचं मन नैराश्य टाळू शकत नाही. काही माणसांच्या लढाया त्यांच्या मरणार्पयत संपत नाहीत. कदाचित मरणानंतरही. कधीतरी सकाळी सकाळीच ‘अच्छो को बुरा साबित करना, दुनिया की पुरानी आदत है..’ या ओळी गाणारे वडील आठवतात. आपण वडिलांचा आवाज विसरत जातो, ही किती वाईट गोष्ट आहे.या विस्मरणाचं काय करायचं असतं? जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ज्वारीच्या भाकरीचा एक कोरडा तुकडा मोडून खाणार्‍या वडिलांचे हात अचानक आठवायला लागतात, तेव्हा नेमकं काय करायचं असतं?कधी कधी वाटतं की, हे आठवणीचं मोहळ कुणीतरी उठवलं पाहिजे. आपली स्मरणशक्ती कुणीतरी हिरावून घेतली पाहिजे. हे मन आणि मेंदू रात्नीच्या काळोखात मिटून का जात नाही? जुन्या दिवसांची पाटी कोरी करकरीत का होत नाही? पण आमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..