शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

गुरुकृपा व्हावी, अजून काय मोठं?

By admin | Updated: July 18, 2016 17:19 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो.

- रोहित नाईक

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो. बोबडे बोल निघेपर्यंत आपल्याला आजूबाजूच्या परिसराच्या तोंडओळखही झालेली असते आणि नंतर आई - बाबांचेच बोट पकडून आपण शाळेतही प्रवेश करतो. येथे आपली ओळख होते ती जगाशी ओळख करुन देणाऱ्या गुरुंशी. आई - वडिलांमुळे आपले पहिले पाऊल या सुंदर विश्वात पडते, तर आपले हेच पाऊल भक्कम करण्याचे काम आपले शिक्षक करीत असतात....

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:!
गुरु: साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:!!

शाळेत प्रत्येक दिवसाची सुरुवात याच प्रार्थनेने व्हायची. आजही शाळेतली प्रार्थना ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर शाळा आणि शाळेतले शिक्षक डोळ्यांसमोर नक्की येतात. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर या प्रार्थनेचा आपल्याला विसर पडलेला असतो. कॉलेज कॅम्पसमध्ये एन्ट्री केल्यावर आपली सुरुवात ‘हाय ड्यूड व्हॉट्स अप?’ अशी सुरुवात होते. शाळेतल्य शिक्षकांसाठी आपल्या मनात भीतीयुक्त आदर असायचा. कॉलेजमध्येही आपण आपल्या ‘प्रोफेसरांचा’ आदर करतोच; मात्र ती भीती अजिबात दिसत नाही. उलट या प्रोफेसरांसोबत प्रत्येकाचे मैत्रीचे रिलेशन झालेले असते. शाळेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ देतानासुध्दा मनात धाकधूक व्हायची आणि कॉलेजमध्ये आम्ही बिनधास्त टिचर्ससह फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना त्यांच्या हातावर ‘बॅण्ड’ बांधून मोकळे होतो. इतकंच नाही, तर टिचर्सना आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एक हटके फोटोही काढतो. स्टुडंट्स आणि प्रोफेसर्स यांच्यात हसते - खेळते वातावरण असावे आणि ते असलेच पाहिजे, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. प्रत्येक कॉलेजियनने आपली जागा ओळखली पाहिजे. आज जर एखाद्या प्रोफेसरने संपुर्ण वर्गासमोर एखाद्याला खडसावले, तरी तो विद्यार्थी आपला ‘अपमान’ झाल्याचे समजून वर्षभर त्या शिक्षकाच्या वाकड्यात शिरतो. आपल्याला हे कळलं पाहिजे की, शिक्षक आपल्याला हौस म्हणून आपल्यावर रागवत नसतात. त्यांनी दाखवलेल्या चुका आपण सुधरल्या, तरंच आपण यशस्वी होतो. त्यांच्यामागे खूप मोठा अनुभव असल्याने त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्याची संधी असते. आई - वडिल हे आपले घरातले पालक असतात, तर शिक्षक हे आपल्या बाहेरच्या जगातले पालक असतात. त्यामुळेच तर टीचर्सच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही...गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.....