शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जग बदलाल तेव्हा बदलाल, गाव बदलायची संधी सोडू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:06 IST

जग बदलून टाकू म्हणता, ते नंतर बदला, आधी तुमच्या गावच्या ग्रामसभेत जा, तिथं पुढच्या 5 वर्षासाठी गावात काय काय कामं करायची, कशी करायची याचा आराखडा तयार होतोय.

ठळक मुद्देयू-टय़ूबवर ‘माहिती अधिकार’ असे मराठीत सर्च करा.

-मिलिंद थत्ते

आता पंधरा ऑगस्ट झाला. गेलात की नाही ग्रामसभेला? काय काय विषय होते अजेंडय़ावर? ‘ग्रामपंचायत विकास आराखडय़ाकरिता कामे सुचवणे’ - हा विषय होता ना? दिमाग की बत्ती जली की नही? आपण सुरुवातीच्या एका लेखात बोललो होतो याबद्दल. केंद्र सरकारचा एक ‘वित्त आयोग’ असतो. हा वित्त आयोग दरवर्षी काही निधी पंचायतराज संस्थांना - म्हणजेच ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना देत असतो. गेली 5-6 वर्षे आयोगाने आपले धोरण बदलले आणि ग्रामपंचायतींना अधिक वाटा व पं. स.-जि.प. ला कमी वाटा द्यायला सुरुवात केली. आमचे एक पुढारी मित्र म्हणालेसुद्धा ‘कुठून जि.प.मध्ये निवडून आलो आसं झालंय, पैसा तर समदा ग्रामपंचायतीत गेलाय!’’ त्यांचा हिशेब चुकला; पण मतदार म्हणून म्हणजेच ग्रामसभेचे खासदार म्हणून आपला हिशेब सुधारला. सुधारायला पाहिजे. कारण ग्रामसभेत तुम्ही गेलाच नाहीत, तर आंधळं दळतंय नि पुढारी पीठ खातंय, असं होतंय बगा! पाच वर्षापूर्वी केंद्र शासनाने हट्ट धरून राज्य सरकारांना ग्रामपंचायत विकास आराखडे लोकसहभागी पद्धतीने करायला लावले. ग्रामपंचायत सदस्यांच्या (किमान) दुप्पट संख्येत गावातल्या इतर नागरिकांचा समावेश असलेला संसाधन गट करून तीन दिवस नियोजन करण्याची प्रक्रिया  करायची होती. जिथे लोक जागे होते, तिथली युवक मंडळी, महिला बचत गट वगैरे या संसाधन गटात सामील झाले. जिथे लोक झोपून राहिले, तिथे ही प्रक्रि या कागदावर झाली. या प्रक्रियेत दोन आराखडे तयार झाले - 1 वर्षाचा डिटेल आराखडा आणि 5 वर्षाचा ढोबळ आराखडा. ग्रामपंचायतीला जो जो पैसा उपलब्ध असतो, त्यातून करण्याची सर्व कामं या आराखडय़ात लिहायची असतात. ग्रामपंचायतीला कुठून कुठून पैसा मिळतो. 1) वित्त आयोग 2) मनरेगा (रोजगार हमी योजना) 3) स्वच्छ भारत मिशन 4) अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामपंचायतींना मिळणारा टीएसपी पाच टक्के निधी 5) दिवाबत्ती कर, बाजार कर, घरपट्टी, पाणीपट्टी यातून येणारे ग्रा.पं.चे स्वतर्‍चे उत्पन्न किंवा स्वनिधी. या सार्‍यातून कोणकोणती कामे करायची हे सगळे आराखडय़ात आले पाहिजे. त्यात नसेल आणि तुम्हाला (म्हणजे ग्रामसभेला) नवे काम घालायचे असेल तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची परवानगी लागते. म्हणून आराखडा करतानाच शक्य तितका विचार करून सर्व कामं त्यात आली पाहिजेत. मागील 5 वर्षाचा आराखडा आता संपला आहे व आताच्या ग्रामसभेत पुढील 5 वर्षे ठरवायची आहेत. तेव्हा ही संधी सोडू नका मित्रांनो! आपल्या गावात काय घडावं आणि किती विकास व्हावा, याची सूत्रं गावकर्‍यांनीच हातात घ्यायला हवीत. त्यात तुम्ही आलातच. 

************

माहिती अधिकाराची अधिक माहिती हवी आहे?

माहिती अधिकार वापरण्यासंबंधी  लेखानंतर अनेक शंका/प्रश्न विचारणार्‍या ई-मेल्स आल्यात. तर त्यासंदर्भात ही अधिक माहिती. *mr.vikaspedia.in    या वेबसाइटवर ‘ई-शासन’  या बटणावर क्लिक करा. * तिथे ‘माहिती अधिकार कायदा 2005’ या पर्यायावर जा. * अर्ज कसा लिहावा, अपील कुठे करावे, वगैरे प्रश्नांची उत्तरं आणि माहिती तिथे सोप्या मराठी भाषेत मिळेल. (आणि ही वेबसाइट शासकीय आहे बरं!) * इतरही मोबाइल-गव्हर्नन्सची माहिती तिथे मिळेल. * तसेच यू-टय़ूबवर ‘माहिती अधिकार’ असे मराठीत सर्च करा. त्यात ‘दूरदर्शन सह्याद्री’ चॅनलवरील 50 मिनिटांची दोन व्याख्यानं मिळतील. ती पाहा. * सर्व प्रश्नांचे सही जवाब मिळून जातील.