शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी, आहे तो टिकवण्यासाठी आवश्यक 10 स्किल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:43 IST

फक्त टेक्नॉलॉजीवाल्यांना काम मिळेल आणि बाकीचे सगळे ‘बिनकामाचे’ असं काही होणार नाही; पण जर ‘ही’ कौशल्यं हातात नसतील तर निभाव लागणं अवघड आहे.

- नितांत महाजन

कोरोनाची भीती, त्याहून मोठी भीती हाताला काम मिळेल की नाही?नोकरी मिळेल की नाही?आहे ती नोकरी टिकेल की नाही?आणि करिअर? पगारवाढ? प्रमोशन?ही सारी तर आता स्वप्नात भेटावेत असे शब्द आहेत. कारण प्रत्यक्ष आयुष्यात पगारकपात घेऊन नोक:या टिकल्या यातच भाग्य मानणारे अनेक आहेत.मात्र मग येत्या काळात नोकरी मिळायची, टिकायची, करिअर करायचं तर हातात काय हुनर हवा?सगळ्यांनाच टेक्नॉलॉजी जॉब्ज मिळतील का?हे कितीही खरं असलं की जग डिजिटल होतं आहे. डिजिटल जगात ऑनलाइन व्यवहार, तंत्रज्ञान यांना मोठं महत्त्व येणार आहे, तरीही सगळेच काही तंत्रज्ञानात काम करूशकत नाहीत.मात्र तेच आणि एकमेव स्कील असलं तर नोक:या मिळतील आणि बाकी काही नको असंही नाही.येत्या काळात एम्प्लॉएबल व्हायचं, नोकरीसाठी पात्र ठरायचं तर अजून काही कौशल्यं आपल्याकडे हवीत.ती कोणती?कोरोनानंतरच्या जगात ही टॉप टेन स्किल्स अनेकांना उत्तम संधी देतील अशी शक्यता आहे.मात्र त्यासाठी ती कौशल्यं आपल्याकडे हवी किंवा ती शिकून तरी घ्यायला हवीत.

1. सेल्फ मोटिव्हेशन

सतत कोण आपल्याला प्रेरणा देणार, कुठून सतत सेल्फ हेल्प बुक्स वाचत बसायची? त्यावर उपाय हाच की आपणच आपल्याला प्रेरणा द्यायचं. हरायचं नाही. लढायचं.आणि अत्यंत पॉङिाटिव्हली, एकेक पाऊल पुढे जात राहायचं.असे स्वयंप्रकाशित दिवेच आपली वाट आणि आपला प्रकाश दीर्घकाळ शोधत पुढे जातात.

2. कल्पकताकल्पकता म्हटलं तर सगळ्यांकडेच असते; पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण वेगळा विचार करत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधताना, नव्यानं विचार करताना जरा डोक्याला चालना दिली तर त्या कल्पकतेतून आपल्याला अनेक पर्याय सापडू शकतात.

3. चिकाटीत्याबाबतीत आपण अगदी राहुल द्रविडला गुरु करावं हे उत्तम. चिकाटी आणि सातत्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी. धरसोड केली, आज मूड आहे, नाहीये, जमतच नाहीये असं म्हणत रडत बसलं तर काहीच होणार नाही.चिकटून राहायचं आपल्या कामाला, विषयाला हे एक उत्तम आणि दीर्घ फलदायी व्रत आहे.

4. टाइम मॅनेजमेंटहा शब्दच फार घिसापिटा आहे. सगळ्यांना कळतं आपलं टाइम मॅनेजमेंट चांगलं नाही, तरीही कुणीच त्यावर धड काम करत नाही.जे करतात ते तुफान वेगानं पुढे निघून जातात आणि तेवढय़ाच वेळात भरपूर काम करतात. जगातल्या सर्व अपयशी आणि यशस्वी लोकांकडे दिवसाचे 24 तासच वेळ असतो हे लक्षात ठेवलेलं बरं.

5. कम्युनिकेशन स्किल्सहे अजून एक दुसरं कौशल्य, ज्याविषयी सतत बोललं जातं. सतत चर्चा, ऑनलाइन कोर्सेस पण करतात काहीजण.पण परिणाम? शून्य असतो. साधं-सोपं, आपण जसं बोलतो तसं, अधिक प्रेमानं, खरं आणि नम्रपणो बोलणं, उत्तम संवाद साधणं म्हणजे नेमकं आणि कमी बोलणं हे जरी करायला सुरुवात केली तरी उत्तम कम्युनिकेशन स्किलच्या दिशेनं आपण जाऊ शकू.

6. लर्न-रीलर्नआता तर पंतप्रधानांनीही सांगितलं आहे की लर्न-रीलर्न-अपस्किलिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.एक डिग्री आहे, येतं मला सगळं, मी नवीन काहीच शिकणार नाही, किंवा सतत काही काही नवीन शिकत राहीन की कशातलंच काही धड येणार नाही असं करूनही चालणार नाही.सतत नव्या गोष्टी शिकायला उत्सुक असणं, पटकन शिकून, त्याप्रमाणो कामाला लागणं ही मनोवृत्तीच महत्त्वाची आहे.

7. मी माझं, नाय नेव्हरटीम स्पिरीट हवं बोलणं वेगळं, पण टीममध्ये काम करणं, लोकांमध्ये राहून उठून दिसणं, टीमला सपोर्ट करणं, क्रेडिट-चुका स्वीकारणं आणि तरीही वैयक्तिक प्रगती करणं ही काही सोपी गोष्ट नाही.त्यामुळे माझं माझं आणि वाही ओझं करण्यातही अर्थ नाही. तर सगळ्यांशी जमवून घेता येणं, त्याला पर्याय नाही. मी-माझं करत बसलात तर फसलात.

8. धोका. रिस्क वगैरे.रिस्क घेतल्याशिवाय करिअर पुढे सरकत नाही हे खरं; पण ती केव्हा घ्यायची हे ठरवताही आलं पाहिजे.मुळात रिस्क नोकरी बदलात घ्यायची की काम बदलात, काम नव्या पद्धतीनं करण्यात हे ठरवा.त्याचं एकदा उत्तर मिळालं की धोका असला तरी चौका मारता येऊ शकतो.

9. स्वीकारकाही लोक फार रडे असतात. सतत रडतात. सतत स्वत:ला व्हिक्टिम समजतात. ते रडणं बंद करा. जे आहे ते स्वीकारा मग ते बदलायचं कसं याचा विचार करा. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेत मग त्यात बदल करणं हे ही एक कौशल्य आहे.जर बदलता आलं नाही तर मागे पडणं वाटय़ाला येतं.

10. इमोशनल इंटिलिजन्सइथंच अनेकजण मार खातात. मन सांभाळता येत नाही, भावनांवर कंट्रोल नाही. त्यामुळे आपलं मन, भावना ओळखून, त्यांना नीट नियंत्रण ठेवून भावनिक शहाणपण शिकून घेणं, त्याप्रमाणो स्वत:च्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन उणिवांवर काम करता येतं.हे जमणं सोपं नाही; पण त्या दिशेनं विचार तरी करायला हवा.