शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

तासांवर विकली जाणारी मैत्री

By admin | Updated: March 11, 2016 11:56 IST

आपल्या स्वभावाचं, आपला आनंद शेअर करणारं, ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य?

एकटेपणावर बाजारपेठेचा जालीम उपाय! 
 
जमाना स्टार्टअपचा आहे. कुणाला  काय उद्योग, कल्पना सुचेल याचा नेम नाही.
विशेष म्हणजे, नुस्ता उद्योग सुचून उपयोग  नाही, तर लोकांची गरज अचूक ओळखून, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून त्यातून आपला उद्योग वाढीस लावण्याचं कसबही अंगी हवंच.
त्यातून अमेरिकेतल्या काही तरुणांनी आता नवीनच उद्योग सुरू केला आहे. त्याचं नाव आहे, ‘रेण्ट अ फ्रेण्ड’.
आणि एकटी अमेरिका कशाला, आता जगभरात ही नवीन इंडस्ट्रीच सुरू होणार अशी चर्चा आहे. तिचं नाव आहे फ्रेण्ड रेण्टल इण्डस्ट्री.
जपानमध्ये या अजब उद्योगाची सुरुवात झाली, पण त्यानं मूळ धरलं ते अमेरिकेत. सध्या अमेरिका आणि कॅनडात या उद्योगाची बरीच चर्चा आहे. ‘रेण्टअफ्रेण्ड डॉट कॉम’ या वेबसाइटच्या माध्यमातून चालणा:या या उद्योगात सध्याच दोन लाखांवर अनेक लोकांनी स्वत:ला सदस्य म्हणून ( पैसे देऊन) नोंदवलं आहे. स्कॉट रोजबम यानं ही वेबसाइट सुरू केली. तो म्हणतो, ‘मैत्री अशी भाडय़ानं कशी देताघेता येईल याची तात्त्विक चर्चा करण्यात मला रस नाही. मोठय़ा शहरात अनेकजण एकेकटे आहेत. साधं पबमध्ये, बाहेर जेवायला, कुठं सिनेमाला, लॉँग ड्राइव्हला जायचं तर कुणी सोबत नाही. मग ते एकेकटे कुढत घरात बसतात. त्यापेक्षा थोडे पैसे दिले आणि आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेलं कुणी ‘सोबत’ म्हणून स्वीकारलं तर काय बिघडतं? यातून अनेक माणसांमध्ये पुढे मैत्रीही होऊ शकते. मुळात जे असे भाडय़ानं मित्र म्हणून जातात त्यांच्यासाठी काही नियम असतात. कुठल्याच प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही, शारीरिक लगट नाही, ‘तस्लं’ काही नाही. फक्त निखळ मैत्रीनी आवडीनिवडीचं शेअरिंग इतपतच हे सारं मर्यादित ठेवणं अपेक्षित नाही तर कॉण्ट्रॅक्टनुसार कायदेशीररीत्या बंधनकारकही असतं. त्यामुळे काळाची गरज म्हणून या उद्योगाकडे पाहायला हवं!’
आता तर अमेरिकेपासून दूर पूर्वेला ऑस्ट्रेलियातही हे ‘फ्रेण्ड्स फॉर हायर’ नावाचे उद्योग सुरू झाले आहेत. आणि तिकडे या विषयावरून बरीच चर्चा झडते आहे, वाद आहेत, तरुण मुलांच्या एकटेपणाची चर्चा आहे असं इंटरनेट धुंडाळलं तर दिसतं!
पण मुख्य मुद्दा म्हणजे गरज काय ही अशी काही तासांची मैत्रीपूर्ण सोबत भाडय़ानं घेण्याची?
तर त्याचं एका शब्दात उत्तर आहे ते लाइफस्टाइल.
अतिवेगवान जीवनशैली. मोठय़ा शहरातले बडे जॉब्ज. लांबच लांब कामांचे तास. रात्र होऊन जाते पण ऑफिसच्या बाहेर अनेकांना पडता येत नाही. कुठं कुणाकडे जाता येत नाही की सोशलायङिांग नाही. त्यातल्या काहींचे मित्रंचे ग्रुप्सही नसतात नवख्या शहरात. सहका:यांशी आताशा मैत्री होईनाशी झाली आहे अशी गत. त्यामुळे सुटीच्या दिवशी कुठं बाहेर जायचं, अगदी शॉपिंगलाही जायचं तर सोबत कुणी नाही. कार आहे पण लॉँग ड्राइव्हला एकटय़ानंच जायचं, पैसे आहेत पण हॉटेल-सिनेमा-पबमध्ये जायचं तर सोबत नाही.
जे मुलग्यांचं तेच मुलींचंही!
त्यात एकेकटय़ानं जायचं तर मजा येत नाही. आणि जे सोबत आहेत त्यांना आपल्या विषयात रस असेलच असंही नाही. म्हणजे म्युङिायम, गाण्याचे कार्यक्रम, जिम, शॉपिंग, बर्ड वॉचिंग. असे किती प्रकार. त्यात मित्रमैत्रिणींना रस नसला तरी हळूहळू अनेक जणांचं एकेकटय़ानं हे सारं करणं बंद होतं.
मग त्यावर उपाय काय?
काही सूज्ञ लोकांना गरज आहे की, यांना मित्रंची गरज आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशा ‘गरजू’ची गाठ घालून द्यायला सुरुवात केली. त्यातून काहींना सोबत मिळाली, तर काहींना पैसे. दोन तास ते दोन दिवस असे आता मित्र भाडय़ानं घेणं सुरू झालं. 
आपण अशा रेण्ट केलेल्या ‘मित्र’ सोबत म्युङिायम कसं पाहिलं, शॉपिंग कसं केलं याचे किस्से अनेकजण आता जगजाहीर शेअरपण करत आहेत.
मुख्य म्हणजे आपल्याला जिवाभावाचे मित्र नाहीत, अपेक्षाविरहित मैत्री आपल्या वाटय़ाला आलेली नाही याचा खेद किंवा खंत कुणी व्यक्त करताना दिसत नाही. उलट आपला ‘एकटेपणा’ संपायला आणि आपल्या आवडीनिवडीतला आनंद नव्यानं जगायला आपण यातून सुरुवात केली असं अनेकजण सांगत आहेत!
हे सारं असं ‘घडत’ असताना प्रश्न मात्र पडतोच की, असं का व्हावं? आपल्या स्वभावाचं, आपलाच आनंद शेअर करणारं, आपण ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य?
प्रश्न आहेच.
आणि माणसांच्या गरजांची आणि प्रश्नांची तड लावत त्यातून पैसे कमवण्याची बाजारपेठेची तयारीही आहे.
म्हणून मग बाजारपेठ कामाला लागलेली दिसते.
आणि मैत्री भाडय़ानं देण्याचे स्टार्टअप्सही कामाला लागलेले दिसताहेत.
जागतिकीकरण अनेक गोष्टी बदलून टाकेल अशी चर्चा पूर्वी होतीच.
पण म्हणजे किती आणि काय काय बदलेल.
याची ही एक फक्त झलक आहे!
 
 
स्वकेंद्री जगणारं पैसेफेकू जग
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, नव्या जगात मानवी जगण्याची ही शोकांतिका आहे!
 
या ‘रेण्टल’ मैत्रीविषयी जगभरातले मानसोपचारतज्ज्ञ मात्र अत्यंत गंभीर मत व्यक्त करत आहेत. त्यांना काळजी आहे मेट्रो शहरातल्या तारुण्याच्या बदलत्या मानसिकतेची!
अनेक मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मोठय़ा शहरात ‘एकेकटे’ राहण्याचे प्रश्न जगभरच गंभीर होत चालले आहेत. कुठं बाहेर जायचं तर, काही सेलिब्रेट करायचं तर ‘आपली’ वाटावी अशी अनेक माणसं अवतीभोवती नसल्याची समस्या अनेकांची आहे. दुसरीकडे ही ‘एकेकटी’ माणसं सतत कानाला आणि हाताला चिकटलेल्या मोबाइलमध्ये हरवलेलीही दिसतात. सतत कनेक्टेड. व्हच्यरुअल माणसांनी वेढलेले. मात्र तरीही अत्यंत एकेकटे. ही अशी ‘भाडय़ानं’ घेतली जाणारी मैत्री हे समाजस्थितीचं अत्यंत दु:खद रूप आहे. मानवी नाती किती पोकळ होत चालली आहेत हे तर यातून दिसतं आहेच; पण अति स्वकेंद्री जगणं माणसांना कुठवर घेऊन जाणार याचीही ही एक झलक आहे. आपल्याच आनंदात वाटेकरी हवेत, दुस:याशी जुळवून घेत आपला आनंद जगणं हे आता कालबाह्य होईल की काय, अशी भीतीही अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
माणसाला सच्चे मित्र मिळू नयेत, आणि पैसे फेकून या ‘सेवा’ विकत घ्याव्या लागाव्यात हे अत्यंत भयाण चित्र आहे, असंही मत काहीजण व्यक्त करत आहेत.
 
 
- चिन्मय लेले