शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

ये कहलो की, बस फोनभर की दास्ता है, और क्या है जिंदगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:15 IST

मनापासून हाका मारणारे दोस्तांचे काही कट्टे असतात. पण आयुष्यभर कसे पुरावेत हे कट्टे? त्या कट्टयांवरचे जुने चेहरे जातात, नवे येतात. आपले कट्टे आपल्यालाच जुने, परके वाटायला लागतात. पण ‘शेअरिंग’ची गरज तर काही बदलत नाही.

ठळक मुद्देभले माझे सगळे मित्र उंचच उंच पुलावरून त्या अथांग डोहात उडी मारणार असतील, पण मी मारणार नाही. मी त्या डोहाच्या तळाशी जाऊन उभा राहीन, त्यांना झेलण्यासाठी!

- चिन्मय लेले

‘जाने तू..’ नावाचा सिनेमा पाहिलात? त्यात एक प्रसंग आहे. सिनेमाची नायिका डोळ्यात पाणी आणून नायकाच्या आईला सहज सांगते, ‘कॉलेज के पाच साल कहाँ चले गऐ, पता ही नही चला..!’ नायकाची आई शांतपणे म्हणते, ‘फोन पें बेटा फोन पें!’ - काय खोटंय त्यात? तरूण म्हणवणार्‍या कुणालाही भेटा. तासन्तास फोन सुरु. आता तर दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर टुकटुक सुरुच. काय बोलतात एवढे? - माहित नाही! का बोलतात? - या प्रश्नाला तर काहीच लॉजिकल उत्तर नाही! फोन बंद पडेर्पयत बोलुनही जे बोलायचं तेच राहून गेलं अशी भावना फोन बंद होताच छळायला लागते. 

मस्त गप्पा रंगल्या आहेत. छान हलकं-हलकं मस्त वाटतंय, असं कितीदा होतं? - तसं नेहमीच! पण चुकार क्षणी कशी कोण जाणे बोलता बोलता चिडचिडच व्हायला लागते.

आणि भांडण? - ते तर हमखास होतं! होतंच! शब्दाने शब्द वाढतो, कारण म्हणायचं वेगळचं असतं, शब्द वेगळचं म्हणतात!

हे सारं सरावानं असंच होतं होत राहतं.

दिन-महिने-रात गुजरते जाते है. फोनची बिलं वाढत राहतात.

कानाला नव्यानं फुटलेल्या फोन नावाच्या अवयवाशिवाय जगता येतं याचाच विसर पडतो. हॅण्ड्स-फ्रीच्या माळा गळ्यात घातल्या की अवतीभोवतीच्या जगाचं अस्तित्वच नाहीसं होतं आणि आपण ज्याच्याशी बोलतोय त्या आवाजापलीकडे काहीच ऐकु येत नाही. समजत नाही.

दुरुन कुठून तरी येणारा तो आवाज त्यातून होणारा संवाद.

म्हटलं तर बिनचेहर्‍याचाच.

पण हा संवाद कसा कोण जाणे मनाची कवाडं उघडत थेट मैत्रीच्या केंद्रात जाऊन पोहोचतो. बोलता बोलता मैत्री होते. बोलणं ही गरज बनत जाते. हळूहळू गरजेचं रूपांतर ‘सवयीत’ होतं आणि सवयीतून पुन्हा मैत्रीची डोर आणखी मजबूत होते.

‘व्हच्यरुअल मैत्री’ असा एक गोंडस शब्द सध्या प्रचलित आहे. मैत्रीच पण अत्याधुनिक उपकरणांनी बांधलेली. मोबाइल-लॅण्डलाइन, नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपवरचं चॅटिंग. या उपकरणांच्या साक्षीनेच फुलणारी-बहरणारी-भांडणारी-रुसणारी आणि हसणारीही!

मुद्दा असा आहे की, ही मैत्री व्हच्यरुअल आहे की फॅक्च्युअल असा शब्दाचा कीस कशाला पाडायचा?

मैत्रीचे फायदे-तोटे तराजूत मोजत वाटय़ाला काय आलं याचा हिशेब कशाला घेऊन बसायचं समोर?

सोपंय ना, दोन व्यक्ती भेटतात. एकदा-दोनदा भेटतात. त्यांच्या वाटा भिन्न असतात, प्रवास भिन्न असतात आणि दिशाही. पण त्या भेटीत डोक्यात काय केमिकल लोचा होतो माहित नाही.

काही केल्या परस्परांशी बोलायचे विषय संपत नाही. (मुख्य म्हणजे विश्वासानं बोलावंसं वाटतं, ही सगळ्यात महत्त्वाची पायरी!) ओळख होते, ती वाढते, परस्पर आवडींइतक्याच नावडत्या विषयांच्या चर्चाही सुरु होतात. होत राहतात. पण थेट भेटायला वेळ असतो कुणाला?

मग फोन आणि इंटरनेट येतात बिचारे मदतीला धावून!

सुरुवातीला पाच मिनिटांत संपणारे फोन तासतासभर सुरुचअसतात. हे समजेर्पयत परस्पर ‘शेअरिंग’ इतकं वाढत गेलेलं असतं की ‘आता पुरे’ असं हज्जारदा ठरवूनही फोन काही बंद होत नाही! जे फोनचं तेच व्हॉट्सअ‍ॅपवरचं!

 सतत ऑनलाईन असणारे अनेकजण तर समोरासमोर असावेत तसे एकमेकांशी बोलत असतात. चेष्टा-टाइमपासपासून अत्यंत गंभीर विषयावरही चर्चा ऑनलाईन चालतात. कीबोर्डवरची बोटं सरावानं धडाधड चालतात, त्या बोलण्याची भाषा बदलते, भावना व्यक्त करण्यासाठीची एक स्वतंत्र चॅट लिपीही तयार होते.

बोलण्यासारखं असतं म्हणून बोलत राहण्याची माध्यमं शोधली जातात. परस्परांबरोबर राहण्याचा आनंद हा असा कमावलाच जातो.

ही अशी मैत्री ज्या दोघांत किंवा एकाच वेळी अनेकांत असते त्यांच्यात कुठलाच भेट अडसर ठरत नाही. अशी मैत्री असणार्‍या दोन व्यक्ती म्हणजे ‘स्त्री-पुरूष’ असा झापडबंद विचारही या टप्प्यावर गळून पडतो. अशी मैत्री ‘तो-ती’ यांच्यात जशी असते तशी ‘ती-ती’ किंवा ‘तो-तो’ मध्येही असू शकते. असतेच! दिवसाकाठी कधीतरी होणारा तो एक फोन दिवसभराच्या कटकटींचा, वैतागाचा सारा भार उचलून फेकून देतो. ताजंतवानं वाटतं, उमेद वाढते आणि मुख्य म्हणजे आपली परस्पर भेटीची आणि शेअरिंगची गरज तो फोन भागवतो. अनेकदा तर केवळ बोलूनच आपल्याला छान वाटतं!

माध्यम बदललं इतकंच, दोस्ती तशीच आहे.

 एक फोन फिरवला तर पलीकडे आपली हक्काची जागा आहे, माणुस आहे हे वाटणं किती श्रीमंत करणारं आहे!

ये कहलो की,

बस फोनभर की दास्ता है..

और क्या है जिंदगी

जो सुलझती-उलझती रहती है।