शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

फोमो

By admin | Updated: April 28, 2016 13:30 IST

सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात.

- मुक्ता चैतन्य( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

मला पहा फुलं वहाअसं डायरेक्ट तर म्हणता येत नाही.पण लोकांनी आपल्याला भाव तर दिला पाहिजेम्हणून मग काही माणसं सतत इतरांना चिमटे काढतात,वाद घालतात, झुंजी लावतात, नाहीतर मग सतत मी कसा गरीब बिचारा, माझ्यावर कसा अन्याय होतोयम्हणून मलम मागत राहतात.आपण ‘लेफ्ट आउट’ होऊनसायडिंगला लागू नये म्हणून हा अट्टहास!सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात. माणसं प्रत्यक्ष जे वागणार नाहीत तेच वागतात. पण त्याला एक नकारात्मकतेची किनार असते. काहीवेळा तर लोक टोकाचे नकारात्मक असू शकतात. माणसांमधल्या सकारात्मक भावना जशा सोशल नेटवर्किंगवर बघायला मिळतात, तशाच नकारात्मक भावनाही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतात. 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अजिबात संवाद न साधणं, कुणी मेसेज केला तरी त्याला उत्तर न देणं, शुभेच्छांची दखल न घेणं, कुणातरी एकाच व्यक्तीला जाणूनबुजून टाळत राहणं किंवा इग्नोर करणं, कुठल्याही चर्चेत फक्त भांडण करण्यासाठी सहभागी होणं, सतत इतरांशी स्वत:ची तुलना करत राहणं, आपण कसे दुर्दैवी याचा पाढा वाचत राहणं, सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणं आणि स्वत:च्या पोस्टने इतरांना गोंधळून टाकणं किंवा इरीटेट करणं, सगळ्यांकडून अतिरेकी अपेक्षा करणं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतरांना अप्रत्यक्ष दूषणं देत राहणं, सतत विविध गोष्टींसाठी कारणं देत राहणं, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याच भूमिकेतून सतत वावरणं आणि दुसरी बाजू बघायला नकार देणं, आपण किती दुर्दैवी आहोत याचा सतत पाढा म्हणणं, दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि सतत दु:ख कुरवाळत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत राहणं ही निष्क्रिय आक्र मकतेचीच उदाहरणं आहेत. बारकाईने विचार केलात तर अशा प्रकारे वागणारे अनेकजण सोशल मीडियावर बघायला मिळतात.

 

ज्यावेळी आपण सोशल मीडियावर असतो तेव्हा कुठेतरी आपल्याला खात्री असते की आपल्याला संरक्षण द्यायला कम्प्युटर किंवा मोबाइलचा स्क्र ीन आहे. काय करावं आणि काय नाही याचे जे काही संकेत असतात ते अशावेळी गळून पडतात. आणि मग नकारात्मक भावनाही बाहेर पडायला सुरु वात होते. अनेकांना फोमोची (ऋडटड) बाधा होते. 

 

फोमो म्हणजे ‘दि फिअर आॅफ मिसिंग आउट’. लोक आपल्याला विसरतील, आपल्याला बोलावणं येणार नाही, आपल्याला कुणी काहीच म्हणणार नाही या भीतीपोटी लोक नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतात. ही नकारात्मकता इतकी वाढत जाते की त्यातून ही माणसं स्वत:भोवती नकाराचं एक वर्तुळच तयार करतात. इतरांना अप्रत्यक्षपणे नावं ठेवताना आपणही कधीतरी दुसऱ्या बाजूला असू शकतो हे ही माणसं विसरतात आणि मनातला राग, द्वेष वर्तणुकीतून व्यक्त करत राहतात. ही माणसं थेट शिव्या घालत नाहीत. अद्वातद्वा बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकारात मोडणारी आहे हे चटकन लक्षात येऊ शकत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीकडे बारकाईने बघितले की लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. या लोकांना कशाचाच आनंद नसतो, कशाचंच कौतुक नसतं. दुसऱ्याला चटकन चांगलं म्हणवत नाही, ते काही न बोलता लांबून बघत राहतात आणि मनातली गरळ हळूच ओकून मोकळे होतात. त्यांना सतत इतरांच्या चुका शोधण्याचा छंद जडलेला असतो. निष्क्रिय आक्र मकतेतून निर्माण होणारी नकारात्मकता चटकन दिसत नाही, पण पसरते मात्र पटकन! १.व्यावसायिक आयुष्यात कुणाचं कुणाशीतरी वाजलं, मतभेद झाले किंवा अपेक्षित काम करून मिळालं नाही तर हा जो ‘कुणी’ आहे तो ‘कुणाशी’ विषयी सोशल मीडियावर नाही नाही ती गरळ ओकतो. व्यावसायिक आयुष्यातले मतभेद चव्हाट्यावर आणतो. अर्थात हे आणत असताना तो ‘कुणाशी’चं नाव घेत नाही, की त्याला नावानं टॅग करत नाही. पण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो की साऱ्या जगाला समजतं कुणी कुणाविषयी काय लिहिलं आहे.२.प्रियकर. प्रेयसी.काही कारणांनी ब्रेकअप झाला की, एकमेकांविषयी जाहीर सभा घेतल्यासारखे किंवा सतत जाहीर कुचाळक्या करत एकमेकांविषयी वाईटसाईट बोलत राहतात. तेही एकमेकांचे नाव न घेता. आनंदाचे जे काही क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्याबद्दलचा आदर क्षणार्धात संपून जातो. पुन्हा एकमेकांचे नाव घेऊन लिहिण्याची हिंमत नसते. त्यामुळे आडूनआडून टोमणे मारण्याचा कार्यक्र म होतो आणि अर्थातच ते वाचून जगाला मज्जा येते. हे कमी म्हणून की काय, यातल्या प्रेयसीवर मरणाऱ्या दुसऱ्या कुणाच्या तरी लक्षात येतं की, आता आपल्याला चान्स आहे. आणि प्रेमातलं पहिलं अपयश पचवायला वेळ न देता हा दुसरा लगेच तिला सहानुभूती देण्यासाठी पुढे सरसावतो. आडून आडून प्रेमभावना सांगायला लागतो. जरा थांबण्याची, विचार करण्याची फुरसत त्याला नको असते.३.कसली तरी घमासान चर्चा चालू आहे. लोक एकमेकांशी वाद घालत आहेत. अशावेळी चर्चेत अशीही काही मंडळी असतात जी प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, मात्र मागून चर्चा करणाऱ्यांविषयी बोलत राहतात. किंवा काहीतरी गंभीर चर्चा चालू असताना मध्येच कसला तरी फालतू जोक टाकतात. एखादा स्मायली अगदीच चुकीच्या वेळी पोस्ट करतात. किंवा चर्चेत सहभागी होणाऱ्यांबद्दल स्वत:च्या वॉलवर नाव न घेता वाईटसाईट लिहित राहतात. ४.कुठल्याही आणि कसल्याही पोस्टला लाइक मारणारे तर अगणित असतात. कुणाचे पालक वारले, कुणी जोडीदार गमावला, कुणाला अपघात झाला, कुणा थोर व्यक्तीची पुण्यतिथी अशा कसल्याही पोस्टना ते फक्त लाइक करतात. एखाद्या पार्टीचं आमंत्रण नाही, एखाद्या सोहळ्याला जायला मिळालं नाही, एक्सचं लग्न, साखरपुडा.. कारण काहीही असो, मनातला मत्सरही अनेकांना अनेक गोष्टी लाइक करायला भाग पाडतो.