शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

फोमो

By admin | Updated: April 28, 2016 13:30 IST

सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात.

- मुक्ता चैतन्य( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

मला पहा फुलं वहाअसं डायरेक्ट तर म्हणता येत नाही.पण लोकांनी आपल्याला भाव तर दिला पाहिजेम्हणून मग काही माणसं सतत इतरांना चिमटे काढतात,वाद घालतात, झुंजी लावतात, नाहीतर मग सतत मी कसा गरीब बिचारा, माझ्यावर कसा अन्याय होतोयम्हणून मलम मागत राहतात.आपण ‘लेफ्ट आउट’ होऊनसायडिंगला लागू नये म्हणून हा अट्टहास!सोशल मीडिया वर्तणुकीचे असे कितीतरी प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन म्हणजेच निष्क्रिय आक्र मकता असं म्हणतात. माणसं प्रत्यक्ष जे वागणार नाहीत तेच वागतात. पण त्याला एक नकारात्मकतेची किनार असते. काहीवेळा तर लोक टोकाचे नकारात्मक असू शकतात. माणसांमधल्या सकारात्मक भावना जशा सोशल नेटवर्किंगवर बघायला मिळतात, तशाच नकारात्मक भावनाही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतात. 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अजिबात संवाद न साधणं, कुणी मेसेज केला तरी त्याला उत्तर न देणं, शुभेच्छांची दखल न घेणं, कुणातरी एकाच व्यक्तीला जाणूनबुजून टाळत राहणं किंवा इग्नोर करणं, कुठल्याही चर्चेत फक्त भांडण करण्यासाठी सहभागी होणं, सतत इतरांशी स्वत:ची तुलना करत राहणं, आपण कसे दुर्दैवी याचा पाढा वाचत राहणं, सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणं आणि स्वत:च्या पोस्टने इतरांना गोंधळून टाकणं किंवा इरीटेट करणं, सगळ्यांकडून अतिरेकी अपेक्षा करणं आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतरांना अप्रत्यक्ष दूषणं देत राहणं, सतत विविध गोष्टींसाठी कारणं देत राहणं, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याच भूमिकेतून सतत वावरणं आणि दुसरी बाजू बघायला नकार देणं, आपण किती दुर्दैवी आहोत याचा सतत पाढा म्हणणं, दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि सतत दु:ख कुरवाळत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत राहणं ही निष्क्रिय आक्र मकतेचीच उदाहरणं आहेत. बारकाईने विचार केलात तर अशा प्रकारे वागणारे अनेकजण सोशल मीडियावर बघायला मिळतात.

 

ज्यावेळी आपण सोशल मीडियावर असतो तेव्हा कुठेतरी आपल्याला खात्री असते की आपल्याला संरक्षण द्यायला कम्प्युटर किंवा मोबाइलचा स्क्र ीन आहे. काय करावं आणि काय नाही याचे जे काही संकेत असतात ते अशावेळी गळून पडतात. आणि मग नकारात्मक भावनाही बाहेर पडायला सुरु वात होते. अनेकांना फोमोची (ऋडटड) बाधा होते. 

 

फोमो म्हणजे ‘दि फिअर आॅफ मिसिंग आउट’. लोक आपल्याला विसरतील, आपल्याला बोलावणं येणार नाही, आपल्याला कुणी काहीच म्हणणार नाही या भीतीपोटी लोक नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतात. ही नकारात्मकता इतकी वाढत जाते की त्यातून ही माणसं स्वत:भोवती नकाराचं एक वर्तुळच तयार करतात. इतरांना अप्रत्यक्षपणे नावं ठेवताना आपणही कधीतरी दुसऱ्या बाजूला असू शकतो हे ही माणसं विसरतात आणि मनातला राग, द्वेष वर्तणुकीतून व्यक्त करत राहतात. ही माणसं थेट शिव्या घालत नाहीत. अद्वातद्वा बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकारात मोडणारी आहे हे चटकन लक्षात येऊ शकत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीकडे बारकाईने बघितले की लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. या लोकांना कशाचाच आनंद नसतो, कशाचंच कौतुक नसतं. दुसऱ्याला चटकन चांगलं म्हणवत नाही, ते काही न बोलता लांबून बघत राहतात आणि मनातली गरळ हळूच ओकून मोकळे होतात. त्यांना सतत इतरांच्या चुका शोधण्याचा छंद जडलेला असतो. निष्क्रिय आक्र मकतेतून निर्माण होणारी नकारात्मकता चटकन दिसत नाही, पण पसरते मात्र पटकन! १.व्यावसायिक आयुष्यात कुणाचं कुणाशीतरी वाजलं, मतभेद झाले किंवा अपेक्षित काम करून मिळालं नाही तर हा जो ‘कुणी’ आहे तो ‘कुणाशी’ विषयी सोशल मीडियावर नाही नाही ती गरळ ओकतो. व्यावसायिक आयुष्यातले मतभेद चव्हाट्यावर आणतो. अर्थात हे आणत असताना तो ‘कुणाशी’चं नाव घेत नाही, की त्याला नावानं टॅग करत नाही. पण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो की साऱ्या जगाला समजतं कुणी कुणाविषयी काय लिहिलं आहे.२.प्रियकर. प्रेयसी.काही कारणांनी ब्रेकअप झाला की, एकमेकांविषयी जाहीर सभा घेतल्यासारखे किंवा सतत जाहीर कुचाळक्या करत एकमेकांविषयी वाईटसाईट बोलत राहतात. तेही एकमेकांचे नाव न घेता. आनंदाचे जे काही क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्याबद्दलचा आदर क्षणार्धात संपून जातो. पुन्हा एकमेकांचे नाव घेऊन लिहिण्याची हिंमत नसते. त्यामुळे आडूनआडून टोमणे मारण्याचा कार्यक्र म होतो आणि अर्थातच ते वाचून जगाला मज्जा येते. हे कमी म्हणून की काय, यातल्या प्रेयसीवर मरणाऱ्या दुसऱ्या कुणाच्या तरी लक्षात येतं की, आता आपल्याला चान्स आहे. आणि प्रेमातलं पहिलं अपयश पचवायला वेळ न देता हा दुसरा लगेच तिला सहानुभूती देण्यासाठी पुढे सरसावतो. आडून आडून प्रेमभावना सांगायला लागतो. जरा थांबण्याची, विचार करण्याची फुरसत त्याला नको असते.३.कसली तरी घमासान चर्चा चालू आहे. लोक एकमेकांशी वाद घालत आहेत. अशावेळी चर्चेत अशीही काही मंडळी असतात जी प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, मात्र मागून चर्चा करणाऱ्यांविषयी बोलत राहतात. किंवा काहीतरी गंभीर चर्चा चालू असताना मध्येच कसला तरी फालतू जोक टाकतात. एखादा स्मायली अगदीच चुकीच्या वेळी पोस्ट करतात. किंवा चर्चेत सहभागी होणाऱ्यांबद्दल स्वत:च्या वॉलवर नाव न घेता वाईटसाईट लिहित राहतात. ४.कुठल्याही आणि कसल्याही पोस्टला लाइक मारणारे तर अगणित असतात. कुणाचे पालक वारले, कुणी जोडीदार गमावला, कुणाला अपघात झाला, कुणा थोर व्यक्तीची पुण्यतिथी अशा कसल्याही पोस्टना ते फक्त लाइक करतात. एखाद्या पार्टीचं आमंत्रण नाही, एखाद्या सोहळ्याला जायला मिळालं नाही, एक्सचं लग्न, साखरपुडा.. कारण काहीही असो, मनातला मत्सरही अनेकांना अनेक गोष्टी लाइक करायला भाग पाडतो.