शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दिल ढुंढता है.

By admin | Updated: October 23, 2014 15:31 IST

चल ना यार, उद्या सकाळी, मिसळ खायला जाऊ? नेहमीचा अड्डा!’

चल ना यार, उद्या सकाळी, मिसळ खायला जाऊ? नेहमीचा अड्डा!’
माङया मैत्रिणीनं, प्रियानं परवाच आमच्या व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर मेसेज टाकला.
धडाधड सगळ्यांनी थम्स अप करत नाईस आयडिया म्हणत आयडिया उचलूनही धरली.
मग पुढचा टप्पा.
कुणाकुणाला जमेल?    
झालं, एकेक करत सगळ्याजणी गळायला लागल्या.
कॉलेज संपून दोन-दोन वर्ष झाली,
जी ती नोकरीला लागली.
पैसे बरे मिळायला लागले, कुणी कुणी प्रेमात पडल्या, कुणाची लगA झाली.
सगळ्या म्हणायला मार्गी लागल्या, सेटल झाल्या.
करिअर करायचं म्हणत धावत सुटल्या.
आणि उद्या सकाळी भेटायचं या प्रश्नाच्या उत्तरादाखल मिळू लागली ती फक्त कारणं.
उद्या? उद्या नाही गं-डेडलाइन आहे डोक्यावर?
उद्या नको, परवा माझंही एक प्रेङोंटेशन आहे.
ऑडिट सुरूये आमचं, मरायला फुरसत नाही.
माझी तर उद्या महत्त्वाची मिटिंग आहे, बॉस नुस्ता रगडा मारतोय, नको जीव करुन सोडलंय आम्हाला.
किती कारणं, इतकी मोठी यादी की,
प्रियालाच असं झालं की झक मारलं आणि मिसळ खाऊ म्हटलं.  
 
******
हे असं आता नेहमीच होतं.
सध्या काय विशेष असं कुणी विचारलंच तर, उत्तर साच्यातलंच, काही नाही नेहमीचंच.
विशेष काही नाही.
पण रोजच्या आयुष्यात कुणालाच मरायलाही फुरसत नाही.
ढकलतोय रोजचा दिवस असं कधीतरी वाटतं, 
पण एरव्ही दिवस कधी उजाडला कधी मावळला कळतही नाही.
कित्येक दिवसांत सकाळी सूर्योदय पाहिलेला नाही,
संध्याकाळ कशी होते हे तर माहितीच नाही.
कित्येक दिवसांत मित्रंशी निवांत फोनवरसुद्धा गप्पा मारलेल्या नाही, कट्टय़ावर भेटलेलो नाही, कुठला प्रवास नाही.टाइमपास म्हणून काहीच केलेलं नाही.
कॉलेजात असताना तासंतास गप्पा व्हायच्या, खिदळणं व्हायचं, विषय संपायचे नाहीत, आता मित्रमैत्रिनींशी भेटले तरी किंवा फोनवर बोलत असलो तरी चारदोन वाक्यांनंतर लगेच एकच प्रश्न येतो,
‘और क्या?’ ‘काय विशेष?’
आणि मग तीच टेप पुन्हा लागते, करिअर, तिथली स्पर्धा काम, आपल्यावर असलेला कामाचा भार, स्ट्रेस, न संपणारं काम, पाय ओढणारे कलिग्ज, छळणारा बॉस, ऑफिसातलं पॉलिटिक्स.
आणि सा:यांच्या शेवटी एकच भरतवाक्य.
कॉलेजातले दिवस काय भारी होते नाही, नुस्ती धमाल, आता काय नुस्तं पळतोय.
 
******
पण पळून पळून कुठं पळतोय आपण.
स्वत:ला बर्न करतोय म्हणजे किती बर्न करतोय, कशासाठी करतोय.
किती ती हूसहूस, किती ती दमछाक.
किती तो भयंकर आटापिटा सगळंच करण्याचा.
हा असा विचार केला की मला आठवतं, ये जवानी है दिवानीमधला तो एक सीन आठवतो. उदयपूरमधला. बनी आणि नयना आदितीच्या लगAासाठी उदयपूरमध्ये आलेले असतात. सारं उदयपूर पहायचं म्हणून फिरत असतात.आणि मग एका संध्याकाळी सनसेट पहायला एका टेकडीवर जाऊन बसतात.
नयना शांतपणो मावळता सूर्य पाहत असते.बनी मात्र रेस्टलेस होतो म्हणतो अमूक एक पहायचं राहिलंय, ते ही राहिलंय, लेझर शो मिस होईल चल लवकर..
नयना मात्र म्हणते, ‘बस रे, कंपलसरी आहे का आपण सारं पाहणं.’
बनी तिला ही भलीमोठी लिस्ट दाखवतो, हे एवढं सारं पाहणं बाकी आहे म्हणतो.
नयना ती लिस्ट त्याच्या हातातून घेते आणि फेकून देते म्हणते, बघ आता काहीच नाही उरलं पहायचं, संपली यादी. त्याला ते कळत नाही. 
मात्र ती सांगते त्याला, ‘ कशासाठी एवढा अट्टाहास, सगळंच पहायची आणि करायची घाई, त्यापेक्षा आपण आज जिथं आहोत ते, तो क्षण आपण पूर्ण आनंदानं जगू नाही शकत नाही.जिथं आहोत, ते अनुभवू नाही शकलो तर या यादीइतकंच कोरडं होईल ना सारं.’
नयनाचं म्हणणं आपल्याला पटतं, पण वळत नाही. कारण आपल्यातला बनी आपल्या शांत बसू देत नाही.
त्याला सतत धावायचंय.
त्या धावण्यालाच तो जगणं म्हणतोय.
आणि काहीच न अनुभवता, न जिरवता तो त्या सगळ्या धकाधकीत ‘बर्न आउट’ होतोय.
थकतोय. कंटाळतोय आणि गमावून बसतोय आपल्यातलं कोवळेपण.
 
******
सो बॉस, नो मोअर बर्नआउट फिलिंग.
मी जरा तरी रिलॅक्स करणार आहेच.
कामाच्या वेळी काम, जीव तोडून काम.
पण म्हणजे कुतरओढ नव्हे.
मी मस्त सिनेमे पाहणार, फिरायला जाणार, एक नाही वाटलं तर दोन प्लेट मिसळ चोपणार, मित्रंना खिलवणार.
मैत्रिणींशी भरपूर गॉसिपही करणार.
मी जगून घेणार.
सोडणार मोकळं स्वत:ला.
मला आता वाटू लागलंय की, मोठं होणं, यशस्वी होणं म्हणजे जळून कोळसा होणं नव्हे.
मला नकोय ही बर्नआउट राख.
त्यापेक्षा मी फुल होऊन उमलेल.
आणि ‘फुरसत’ शोधेल आयुष्यात.
अजिबात कुढत नाही बसणार की,
दिल ढुंढता है फिर वहीं, फुरसत के रान दिन.