शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

तलाश

By admin | Updated: February 15, 2017 18:04 IST

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे.

 - शर्मिष्ठा भोसले

 

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे.मु. पो. उदगीर, जिल्हा लातूर. हा पत्ता बदलायचा विचार मनात यावा असे दिवस नव्हतेच ते. ओळखीचा प्रदेश, लोक, भाषा, जगणं मला आवडत राहायचं. मी अमान्यच केलं असतं, पण माझं गाव माझा ‘कम्फर्ट झोन’ होतं. अनेकांसाठी असेल तसं. उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयात बी.ए.ची पदवी मिळवली आणि सगळे करतात तसं पुढे वाटेत लागणारं एम.ए. करायचं ठरवलं. सुटीच्या काळात आमचे एक सर भेटले. महादेव गंदिगुडे त्यांचं नाव. मी माझा मनसुबा उत्साहात सांगितल्यावर म्हणाले, ‘आता पुढच्या वर्षी अजिबात कॉलेजमध्ये दिसायचं नाही. इथं विद्यार्थी म्हणून नाव कमावलं. नाट्य-वक्तृत्व स्पर्धांतून अनेक मेडल्स जिंकून कॉलेजचंही नाव मोठं केलं. आता हे न सोडवणं साहजिकच आहे; पण इथं थांबशील तर तुझं डबकं होईल. तसं झालेलं मी अनेकांचं पाहिलंय. तू वाहत राहा, साचू नको इथं. शहर सोड.’ मला खूप राग आलता तेव्हा त्यांचा. पण आता नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद या लहानशा गावातून लातूर जिल्ह्यातलं उदगीर, मग पुणे पुन्हा पुण्याहून औरंगाबाद आणि पुढे माहीत नाही... असे स्थलांतराचे थोडे मकाम तय केल्यावर कळतंय, माझी इयत्ता वाढलीय या प्रवासांमधून....शहरात शिकायला आल्यावर पुन्हा काही काळ गावी जायचे तेव्हा मन नकळत तुलना करत राहायचं. समाजशास्त्रात शिकलेलं, की खेडं म्हणजे बंदिस्त समाजरचना. शहर म्हणजे खुली समाजरचना. मात्र खेड्यातलं अनपेक्षित मोकळेपण आणि दुसऱ्या बाजूला शहरातलं बंदिस्तपणही कधी दृश्य तर कधी अदृश्य रु पात अनुभवायला येत राहिलं. म्हणजे असं, की खेड्यात अनेकदा तुमची जात कळत नसेल तर समोरचा ‘तुम्ही कोणच्या लोकाचे?’ असं विचारून मोकळा होतो. पण शहरात एखाद्याच्या जातीची आडूनआडून चाचपणी केली जाते. एका मुस्लीम मित्रानंही त्याला शहराच्या मध्यवर्ती भागात सतत भाड्यानं घर नाकारले जाण्याची सल बोलून दाखवली. मग कळलं, शहर म्हणजे सगळं आदर्श आणि खेडं म्हणजे सगळं टाकून देण्यासारखं असं नसतं. आणि अजून एक, अभ्यासक्र मातली पुस्तकं नेहमीच खरं बोलतात असं नाही. एकदा एका प्राध्यापकाच्या घरी गेले होते. ते मूळ मराठवाड्यातले. एका मोठ्या अलिशान अपार्टमेण्टमधलं घर. गॅलरीत गेले तर समोर मोठी वस्ती दिसली. सगळी कच्ची घरं आणि झोपड्या. मी विचारलं तर प्राध्यापक म्हणाले, ‘ही सगळी ७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून इथं स्थायिक झालेली माणसं. यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया या कॉलनीतल्या लोकांकडे मोलमजुरी, धुणी-भांडी करतात. मी आतल्या आत स्तब्धच झाले. ते प्राध्यापक, मी विद्यार्थी आणि समोरचे सगळे कष्टकरी. एकाच मातीतून आलेल्या आमचं हे असंच असणं वा नसणं कुणी ठरवलं? म्हणजे नुसतं स्थलांतर सगळं काही देणारं असतं असं नाही. ते कोण करतं, कधी करतं आणि दरम्यानच्या प्रवासात त्याच्या हाती काय असतं या गोष्टीही खूप काही ठरवतात...  मी शहराचा द्वेषही करू लागले एका टप्प्यावर. अनेकदा असंही वाटलं, की स्थलांतर म्हणजे आपल्याला उपलब्ध झालेल्या, आपण जन्मलेल्या बऱ्या-वाईट भवतालापासून पळ काढणं, आपल्या प्रदेशाला कमी लेखत कुठल्या तरी अधिक हव्याश्या, नव्याच प्रदेशाची इच्छा धरणं. त्याचा गिल्टही आला काही काळ. गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, कडेच्या पिझ्झा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे. चौकात रोमॅण्टिक सोनचाफा विकणारी मळकट बाई, एखादा वारकऱ्याच्या वेशात खांद्यावर पताका घेतलेला कुणी अनोळखी म्हातारा तेवढा ओळखीचा वाटायचा. त्या भावनेचं काय करावं हेही कळेना. मग एकदा रवीश कुमार बोलून गेला ते कानावर पडलं आणि मनावरही गोंदलं गेलं. त्याचं बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातल्या लहानशा गावातून थेट दिल्लीत दाखल होण्याबाबत तो सांगत होता. त्याच्या स्थलांतराबाबत खुलेपणानं बोलत होता की, ‘पलायन तो नये संभावनाओ की तलाश होती है. हर किसी को अपने जीवन में पलायन करना चाहिये, नई संभावनाओ की तलाश में.’ काहीतरी लख्खक्न चमकलं आत. मग मी शोधू लागले, शहरातल्या मला आणि कदाचित माझ्यातल्या शहरालापण.