शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

तलाश

By admin | Updated: February 15, 2017 18:04 IST

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे.

 - शर्मिष्ठा भोसले

 

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे.मु. पो. उदगीर, जिल्हा लातूर. हा पत्ता बदलायचा विचार मनात यावा असे दिवस नव्हतेच ते. ओळखीचा प्रदेश, लोक, भाषा, जगणं मला आवडत राहायचं. मी अमान्यच केलं असतं, पण माझं गाव माझा ‘कम्फर्ट झोन’ होतं. अनेकांसाठी असेल तसं. उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयात बी.ए.ची पदवी मिळवली आणि सगळे करतात तसं पुढे वाटेत लागणारं एम.ए. करायचं ठरवलं. सुटीच्या काळात आमचे एक सर भेटले. महादेव गंदिगुडे त्यांचं नाव. मी माझा मनसुबा उत्साहात सांगितल्यावर म्हणाले, ‘आता पुढच्या वर्षी अजिबात कॉलेजमध्ये दिसायचं नाही. इथं विद्यार्थी म्हणून नाव कमावलं. नाट्य-वक्तृत्व स्पर्धांतून अनेक मेडल्स जिंकून कॉलेजचंही नाव मोठं केलं. आता हे न सोडवणं साहजिकच आहे; पण इथं थांबशील तर तुझं डबकं होईल. तसं झालेलं मी अनेकांचं पाहिलंय. तू वाहत राहा, साचू नको इथं. शहर सोड.’ मला खूप राग आलता तेव्हा त्यांचा. पण आता नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद या लहानशा गावातून लातूर जिल्ह्यातलं उदगीर, मग पुणे पुन्हा पुण्याहून औरंगाबाद आणि पुढे माहीत नाही... असे स्थलांतराचे थोडे मकाम तय केल्यावर कळतंय, माझी इयत्ता वाढलीय या प्रवासांमधून....शहरात शिकायला आल्यावर पुन्हा काही काळ गावी जायचे तेव्हा मन नकळत तुलना करत राहायचं. समाजशास्त्रात शिकलेलं, की खेडं म्हणजे बंदिस्त समाजरचना. शहर म्हणजे खुली समाजरचना. मात्र खेड्यातलं अनपेक्षित मोकळेपण आणि दुसऱ्या बाजूला शहरातलं बंदिस्तपणही कधी दृश्य तर कधी अदृश्य रु पात अनुभवायला येत राहिलं. म्हणजे असं, की खेड्यात अनेकदा तुमची जात कळत नसेल तर समोरचा ‘तुम्ही कोणच्या लोकाचे?’ असं विचारून मोकळा होतो. पण शहरात एखाद्याच्या जातीची आडूनआडून चाचपणी केली जाते. एका मुस्लीम मित्रानंही त्याला शहराच्या मध्यवर्ती भागात सतत भाड्यानं घर नाकारले जाण्याची सल बोलून दाखवली. मग कळलं, शहर म्हणजे सगळं आदर्श आणि खेडं म्हणजे सगळं टाकून देण्यासारखं असं नसतं. आणि अजून एक, अभ्यासक्र मातली पुस्तकं नेहमीच खरं बोलतात असं नाही. एकदा एका प्राध्यापकाच्या घरी गेले होते. ते मूळ मराठवाड्यातले. एका मोठ्या अलिशान अपार्टमेण्टमधलं घर. गॅलरीत गेले तर समोर मोठी वस्ती दिसली. सगळी कच्ची घरं आणि झोपड्या. मी विचारलं तर प्राध्यापक म्हणाले, ‘ही सगळी ७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून इथं स्थायिक झालेली माणसं. यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया या कॉलनीतल्या लोकांकडे मोलमजुरी, धुणी-भांडी करतात. मी आतल्या आत स्तब्धच झाले. ते प्राध्यापक, मी विद्यार्थी आणि समोरचे सगळे कष्टकरी. एकाच मातीतून आलेल्या आमचं हे असंच असणं वा नसणं कुणी ठरवलं? म्हणजे नुसतं स्थलांतर सगळं काही देणारं असतं असं नाही. ते कोण करतं, कधी करतं आणि दरम्यानच्या प्रवासात त्याच्या हाती काय असतं या गोष्टीही खूप काही ठरवतात...  मी शहराचा द्वेषही करू लागले एका टप्प्यावर. अनेकदा असंही वाटलं, की स्थलांतर म्हणजे आपल्याला उपलब्ध झालेल्या, आपण जन्मलेल्या बऱ्या-वाईट भवतालापासून पळ काढणं, आपल्या प्रदेशाला कमी लेखत कुठल्या तरी अधिक हव्याश्या, नव्याच प्रदेशाची इच्छा धरणं. त्याचा गिल्टही आला काही काळ. गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, कडेच्या पिझ्झा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे. चौकात रोमॅण्टिक सोनचाफा विकणारी मळकट बाई, एखादा वारकऱ्याच्या वेशात खांद्यावर पताका घेतलेला कुणी अनोळखी म्हातारा तेवढा ओळखीचा वाटायचा. त्या भावनेचं काय करावं हेही कळेना. मग एकदा रवीश कुमार बोलून गेला ते कानावर पडलं आणि मनावरही गोंदलं गेलं. त्याचं बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातल्या लहानशा गावातून थेट दिल्लीत दाखल होण्याबाबत तो सांगत होता. त्याच्या स्थलांतराबाबत खुलेपणानं बोलत होता की, ‘पलायन तो नये संभावनाओ की तलाश होती है. हर किसी को अपने जीवन में पलायन करना चाहिये, नई संभावनाओ की तलाश में.’ काहीतरी लख्खक्न चमकलं आत. मग मी शोधू लागले, शहरातल्या मला आणि कदाचित माझ्यातल्या शहरालापण.