शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

चिडके, भडके, स्मार्ट कडके

By admin | Updated: May 20, 2016 09:59 IST

स्मार्ट फोन हातात आला, आपण सोशली अॅक्टिव्ह झालो, त्यानंतर आपलं वागणं कसं कसं बदललं? आपण चिडतो कधी, उखडतो कधी, कधी उदास होतो, कधी हायपर? कधी धीर सुटतो नी कधी आणि कसा आपला दिनक्रमच बदलतो याकडे जरा लक्ष द्या, आपणच आपल्याला वेगळे दिसू!

स्मार्टफोन आपल्या हातात आल्यानंतर आपल्याच जगण्यात झालेले बदल टिपण्याचा प्रयत्न आपण गेले काही आठवडे या कॉलमच्या निमित्तानं करत होतो.
एकमेकांशी फोनवर बोलणं यापलीकडे जाऊन आपण अनेक गोष्टी या स्मार्टफोनच्या मदतीनं करायला लागलो. सोशल होण्याच्या नव्या पद्धती आपल्याशा करत आहोत. अॅप्सच्या अवतीभोवती आपले आयुष्य आपण गुंफण्याचा प्रयत्न करत आहोत. नव्या ओळखी होत आहेत, जुनी काळाच्या ओघात हरवलेली नाती शोधून शोधून पुन्हा ताजी करतो आहोत. जगाशी मैत्री करण्याच्या नादात अनेक गोष्टींचं अवलंबत्वही पत्करत आहोत. आजर्पयत कपडे, दागिने, गाडय़ा या गोष्टी स्टेटस दाखवण्याच्या होत्या. हल्ली सोशल नेटवर्किग साइट्सवर आपण काय, किती आणि कसं बोलतोय हा स्टेटसचा विषय बनला आहे. कुठलाही नवीन ग्रुप तयार झाला की लगेच त्या ग्रुपवर विविध मेसेजेसचा पाऊस पडतो. कोण सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात करतंय याची चढाओढ चालू होते. एखाद्या ग्रुपवर सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवू नयेत अशा सूचना दिलेल्या असतील तरीही तसे मेसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. अगदी ग्रुपमधून काढून टाकलं तरीही दुस:या एखाद्या ग्रुपवर जाऊन मेसेजेस पाठवण्याचा मोह पूर्ण केला जातो. शिवशिवणा:या बोटांना रोखता येत नाही. मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणं झाली तरीही चालतात, पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणं अनेकांना कठीण होऊन बसतं.
सुविचार, सुप्रभात आणि जगभरातल्या फॉरवर्ड माहिती पुढे ढकलत आपण किती ‘इण्टेलेक्चुअल’ आहोत, हे आपल्या सगळ्या परिचितांना आणि जेवढय़ा ग्रुपमध्ये आपण आहोत त्या प्रत्येक ग्रुपमधल्यांना दाखवण्याचा सोस संपत नाही. 
एक नव्या व्यसनाच्या जाळ्यात आपण अलगद अडकत चाललोय आणि त्यामुळे आपल्या वर्तनात बरेच बदल होत आहेत हे अनेकांना चटकन जाणवतही नाहीत.
पण व्यसन म्हटलं की त्याचे दुष्परिणाम आलेच. म्हणून या व्यसनापासून स्वत:ला वेळीच दूर करणं गरजेचं आहे. आपल्या वर्तणुकीत होणारे हे बदल आज सूक्ष्म आहेत, पण ते रोजच्या रोज होत आहेत म्हणून त्यांच्याकडे बारकाईनं पाहायला हवं, आणि यापैकी कुठले बदल आपल्याही संदर्भात झाले आहेत हे जरा तपासून पाहायला हवं!
 
आपल्या नेमक्या कुठल्या सवयी बदलल्या आहेत?
 
* अनेकांना रात्री झोप येत नाही. मग मोबाइलवर सोशल नेटवर्किग अपडेट्स बघत बसतात किंवा  मोबाइलवर गेम्स खेळत बसतात. ते सगळं बघता बघता झोप लागते. झोप येत नाही म्हणून मोबाइल आणि मोबाइल म्हणून झोप येत नाही या चक्र ात अनेक जण अडकले आहेत.
* उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाइल चेक करताना काल केलेल्या स्टेटस अपडेट्स ना किती आणि काय काय प्रतिक्रि या आल्या आहेत, लाइक्सची संख्या वाढली आहे का याकडे लक्ष लागून असते. सकाळी उठल्यावर आजूबाजूची सकारात्मकता मनात शिरण्याआधी सोशल नेटवर्किंग डोक्यात शिरते आहे.
*  सोशल नेटवर्किंगचा जगभर चाललेला अभ्यास सांगतो की, सोशल नेटवर्किंगमुळे माणसांमधल्या पेशन्स कमी होतायेत, नकारात्मक भावना वाढतायेत, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याचं प्रमाण वाढतं आहे, घटना किंवा व्यक्तीविषयी माणसांचं भलंबुरं मत आता सोशल नेटवर्किग साइटवरचे मेसेजेस ठरवतात. 
* माणसं खूप बोलतात पण विचार करतातच असं  नाही. विचार करून बोलतात किंवा सोशल साइट्सवर लिहितात असंही नाही.
* खोटी स्तुती करण्याचं आणि कारण नसताना संतापण्याचं प्रमाण वाढलं आहे. सतत सोशली ऑनलाइन अॅक्टिव्ह असणा:या माणसांमध्ये तीव्र भावनिक चढउतार बघायला मिळतात.
* असुरक्षिततेची भावना बळावते आहे. लहानसहान गोष्टींमध्ये असुरक्षितता निर्माण होते, ज्यामुळे मत्सर, अकारण स्पर्धेची भावना जोर धरते. ज्याचा थेट परिणाम म्हणजे मनातील वाढती नकारात्मकता.
* लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील याच माध्यमावर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्यामुळे जोडप्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होतो आहे. लैंगिक वर्तणुकीत बदल होतो आहे. 
* पालक सतत मोबाइलवर असतात त्यामुळे लहान मुलांनाही मोबाईलची चटक लागली आहे. म्हणजे वर्तणुकीचे बदल फक्त पालक, आजीआजोबा आणि तरुण पिढीत झाले आहेत असं नाही, तर ते पुढच्या पिढय़ांमध्येही होतायेत. हे अधिकच धोकादायक आहे.
* खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपण खूप वेगळे आहोत, हटके गोष्टी करतो आहोत, आपण जे नाही ते दाखवण्यासाठी जगाला सतत ओरडून ओरडून सांगण्याच्या नादात लोक सर्रास खोटे बोलत आहेत. 
* खासगी क्षण शेअर करण्याच्या नादात आपलं आणि खासगी असं काही शिल्लक ठेवायला हवं याचं भान सुटतं, संपतं आहे. 
* संवाद प्रत्यक्ष नसल्यानं अनेक प्रकारचे गैरसमज होताना दिसतात. समोरच्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याची तयारी कमी होतेय, इतकंच नाही तर, चटकन गैरसमज होणं त्यातून नात्यात ताण निर्माण होणं या गोष्टी सर्रास होत आहेत.
* या सगळ्याचा अर्थ असा होतो की संवादाचं हे माध्यम अजून आपल्याला नीट वापरता येत नाही. कारण ते नेमकं वापरायचं कसं याबाबतची साक्षरता आपल्यात निर्माण होत नाही. त्यातून या माध्यमाची चटकन सवय जडते आणि या सवयीतून बाहेर पडता येत नाही. सतत मोबाइलला नाक चिकटून राहणा:यांनी ताबडतोब आपल्या या सवयीचा विचार करायला हवा. आणि स्मार्टफोनच्या या जाळ्यातून स्वत:ला बाहेर काढायचं कसं याबद्दलही काही गोष्टी तातडीनं करायला हव्यात.
त्या काय?
वाचा पुढच्या !
 
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
 
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)